शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

व्हाईटपेपर V/s ब्लॅकपेपर... सत्ताकाळातील कारभारावरुन युपीए अन् एनडीए आमने-सामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 09:52 IST

शनिवारी राज्यसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील अर्थव्यवस्थेची चिरफाड करणारी ‘श्वेतपत्रिका’ आज केंद्र सरकारने लोकसभेत सादर केली. यूपीए सरकारच्या काळात निर्माण झालेल्या आर्थिक संकटांवर एनडीए सरकारने यशस्वीरीत्या मात केल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या श्वेतपत्रिकेत म्हटले आहे. त्यावर उद्या, शुक्रवारी दुपारी लोकसभेत, तर शनिवारी राज्यसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

यूपीए सरकारला वारशात धडधाकट आणि मोठ्या सुधारणांसाठी सज्ज झालेली अर्थव्यवस्था लाभूनही २००४ ते २०१४ या दहा वर्षांत अर्थव्यवस्था अनुत्पादक बनल्यामुळे देशाचा आर्थिक पाया कमकुवत झाला, असा आरोप त्यात करण्यात आला.  त्यानंतर एनडीए सरकारने विविध आव्हानांचा सामना करीत त्यावर कसा विजय मिळविला, याचाही विस्तृत तपशील तीन भागांतील ६९ पानांच्या या ‘श्वेतपत्रिके’त दिला आहे. 

भांडवली खर्चात पाचपट वाढअर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारला कठोर निर्णय घेणे भाग पडले. आमच्या सरकारने दहा वर्षांत अर्थव्यवस्थेला धक्का न लागू देता अर्थसंकल्पातील भांडवली खर्चात पाच पटींनी वाढ केली, असा दावा सीतारामन यांनी केला.

१० वर्षांच्या कारभारावर बाणnयूपीए सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया खिळखिळा केला. यूपीएच्या काळात रुपया मोठ्या प्रमाणावर गडगडला. n२०१४ साली बँकिंग क्षेत्र संकटात सापडले. परकीय चलन लक्षणीय घटले हाेते.  nअर्थसंकल्पाच्या तुलनेत २७ टक्के जास्त कर्ज घेण्यात आले. महसुलाचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात आला. nमहागाईने सामान्यांना होरपळून काढले. वित्तीय तुटीचे संकट वाढले, कर्जाचा वापर अनुत्पादक कारणांसाठी केला. nधोरणांच्या सुमार नियोजनामुळे सामाजिक क्षेत्राच्या असंख्य योजनांवर निधीचा वापर होऊ शकला नाही.

दहा वर्षांचा काळ हा अन्यायाचा काळनवी दिल्ली : केंद्र सरकारने यूपीए कार्यकाळातील अर्थव्यवस्थेवर जारी केलेल्या ‘श्वेतपत्रिके’ला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने आज लगेचच ‘ब्लॅकपेपर’ काढला. ‘दस साल, अन्याय काल’ असे या ब्लॅकपेपरला नाव देण्यात आले. त्यात एनडीए सरकारच्या दहा वर्षांतील अपयशाचा पाढा वाचण्यात आला.महागाई, बेरोजगारी, सामाजिक न्याय, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि इतर अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकारला आलेले अपयश या ब्लॅकपेपरमध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. मोदी सरकार आपले अपयश लपवत असल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. देशातील बेरोजगारांचा आकडा ४ कोटींवर पोहोचला आहे. प्रत्येक तासाला दोन आत्महत्यांची नोंद केली जात आहे. पदवीधरांमध्ये ३३ टक्के बेरोजगार आहेत. ईडी, सीबीआय, आयकरच्या माध्यमातून धमकावून दहा वर्षांत ४११ आमदारांना भाजपने आपल्या पक्षात आणले, असा आरोप करण्यात आला.

किती दिवस नेहरू-गांधींची तुलना?दहा वर्षांपासून तुम्ही सत्तेत आहात, तरी तुम्ही अद्यापही जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळाशी तुलना करता. मग तुम्ही तुमच्या कार्यकाळात काय केले, असा सवाल खरगे यांनी उपस्थित केला.

बेरोजगारी, महागाईने छळलेnकेंद्र सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली. बेरोजगारी वाढल्याने युवावर्गात प्रचंड रोष आहे.nमहागाईवर सरकार गप्प आहे. पेट्रोल-डिझेलसह दैनंदिन गरजेच्या वस्तू वधारल्या. महागाई रोखण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत. n२०१६ मध्ये झालेल्या नोटबंदीचे परिणाम आजही देशाला भोगावे लागत आहेत. nजातजनगणना करण्यात सरकार अपयशी ठरले, तर महिलांवरील अत्याचार वाढले आहे.nशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन अद्याप पूर्ण केले नाही.

 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसBJPभाजपाEconomyअर्थव्यवस्थाlok sabhaलोकसभा