शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 06:44 IST

आमच्या आघाडीच्या मतांमध्ये काहीही फरक नव्हता. लोकसभा निवडणुकीत आम्हाला जितकी मते मिळाली, तितकीच विधानसभा निवडणुकीत मिळाली, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

 

नवी दिल्ली : २०२४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित आघाडीला सर्वांत मोठा विजय महाराष्ट्रात मिळाला होता; पण त्यानंतर चार महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकांत त्या राज्यात भाजपने विजय मिळविला. हा निकाल आश्चर्यकारक होता. त्या गोष्टींचा शोध घेतल्यानंतर आम्हाला लक्षात आले की, एक कोटी नवीन मतदारांनी तिथे मतदान केले होते. या मतदारांची नावे लोकसभा निवडणुकांच्या वेळी मतदारयाद्यांमध्ये नव्हती. अशा लोकांनी विधानसभा निवडणुकांत मतदान केले. ही सर्व मते भाजपकडे गेली. हे काहीतरी चुकीचेे घडत असल्याचे लक्षण आहे. जिथे-जिथे नवीन मतदारांनी मतदान केले, तिथे-तिथे भाजप जिंकला आहे. आमच्या आघाडीच्या मतांमध्ये काहीही फरक नव्हता. लोकसभा निवडणुकीत आम्हाला जितकी मते मिळाली, तितकीच विधानसभा निवडणुकीत मिळाली, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

आयोगाने सॉफ्ट कॉपी, व्हिडीओ दिले नाहीतराहुल म्हणाले की, कर्नाटकामध्ये लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला १५ ते १६ जागा मिळतील, असा आमच्या पक्षाने केलेल्या सर्वेक्षणांचा निष्कर्ष होता. आम्ही या निवडणुकांत १६ जागांवर पुढे होतो; पण प्रत्यक्षात फक्त नऊ जागा जिंकलो. आम्ही इतर जागांवर का हरलो, या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडे मतदार यादीची सॉफ्ट कॉपी मागितली; पण ती मागणी फेटाळली गेली.

महाराष्ट्रातील मोहोळ, नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर यांसारख्या मतदारसंघांमध्ये मतदारांची संख्या वाढली. पण, तिथे काँग्रेस व मित्रपक्षांनीच विजय मिळवला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचे आरोप फोल ठरले आहेत. भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री

भाजपकडून लोकशाही यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. या यंत्रणा नष्ट करण्याचा त्यांचा डाव आहे.  त्यामुळे लोकशाही टिकेल का असा प्रश्न आहे. पैशाच्या बळावर भाजप गैरप्रकार करतो, त्यातून स्वत:चा फायदा करून घेतो हे अतिशय धोकादायक आहे. अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री, राजस्थान

निवडणूक आयोग मशीन-रिडेबल फॉरमॅटमध्ये मतदार यादी का देत नाही? त्याऐवजी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगत आहेत. संसदेमध्ये घेतलेल्या शपथेपेक्षा आणखी कोणती शपथ मोठी असते? आम्ही ती शपथ घेतली आहे. आमचे म्हणणे जनतेसमोर मांडले  आहे. प्रियांका गांधी, खासदार, काँग्रेस  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPriyanka Gandhiप्रियंका गांधी