शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 05:12 IST

राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तानची अवस्था अशी झाली आहे की, जिथे तो उभा राहातो, तिथून भीक मागणाऱ्यांची रांग सुरू होते. त्याउलट भारताची गणना ही आयएमएफला निधी देणाऱ्या देशांमध्ये होते. 

लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीनगर : पाकिस्तान हे दुष्ट प्रवृत्तीचे राष्ट्र असल्याने त्याच्या ताब्यात असलेली अण्वस्त्रेही सुरक्षित नाहीत. त्यामुळे ही अण्वस्त्रे आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्थेच्या (आयएइए)च्या देखरेखीखाली ठेवली पाहिजेत, अशी मागणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी केली. ऑपरेशन सिंदूरनंतर त्यांनी प्रथमच जम्मू - काश्मीरमध्ये येऊन तेथील स्थितीचा आढावा घेतला. 

पाकने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे कर्जासाठी पुन्हा हात पसरले होते. त्याबद्दल राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तानची अवस्था अशी झाली आहे की, जिथे तो उभा राहातो, तिथून भीक मागणाऱ्यांची रांग सुरू होते. त्याउलट भारताची गणना ही आयएमएफला निधी देणाऱ्या देशांमध्ये होते. 

राजनाथसिंह म्हणाले की, अण्वस्त्रांच्या वापराच्या पाकिस्तानने सातत्याने दिलेल्या धमक्यांकडे भारताने लक्ष दिले नाही. पाकिस्तानसारख्या बेजबाबदार व दुष्ट प्रवृत्तीच्या देशाच्या ताब्यात अण्वस्त्रांसारख्या गोष्टी असाव्यात का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही अण्वस्त्रे आयएइएच्या देखरेखीखाली ठेवायला हवीत.  ते म्हणाले की, गेल्या ३५-४० वर्षांपासून भारताला सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कृत्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र, आता दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारत कोणत्याही टोकाला जाऊन कारवाई करू शकतो, हे साऱ्या जगाने पाहिले आहे. 

भारतावर घाव घालण्याचा, सामाजिक ऐक्य बिघडविण्याचा प्रयत्न पहलगाम हत्याकांडाद्वारे करण्यात आला. त्याला आम्ही चोख प्रत्युत्तर दिले. पाकने दहशतवाद्यांना पोसणे बंद करावे तसेच आपल्या भूमीचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. 

पाकने भारताला वारंवार फसवले

राजनाथसिंह म्हणाले की , आमच्या भूमीतून दहशतवादी कारवाया करण्यात येणार नाहीत, असे आश्वासन २१ वर्षांपूर्वी वाजपेयींच्या पाकिस्तान दौऱ्याप्रसंगी त्या देशाने दिले होते. तो शब्द कधीच पाळण्यात आला नाही. पाकने भारताला वारंवार फसविले आहे. त्यामुळे यापुढे देशावर कोणताही दहशतवादी हल्ला झाला तर ती युद्धजन्य कृती मानली जाईल.

पाकला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला दणका

पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला भारताने गुरुवारी अजून एक दणका दिला. देशातील विविध विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग सेवा पुरविण्यासाठी निवडलेल्या तुर्कीच्या सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि. या कंपनीकडून राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून हे काम आता केंद्र सरकारकडून काढून घेण्यात आले आहे.

मी मध्यस्थी नव्हे, तर मदत केली : ट्रम्प यांचे घूमजाव

भारत व पाकिस्तानमध्ये अमेरिकेने मध्यस्थी केल्यामुळेच शस्त्रसंधी झाली, असे वारंवार सांगून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मूळ भूमिकेपासून गुरुवारी घूमजाव केले. या दोन्ही देशांतील तणाव कमी होण्यासाठी मी मध्यस्थी केली, असे म्हणणार नाही; पण शस्त्रसंधी होण्यासाठी त्या देशांना मदत नक्की केली, असे आता ट्रम्प म्हणाले आहेत.

ते म्हणाले की, पहलगाम हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू झाला. त्यामध्ये डागण्यात आलेली क्षेपणास्त्रे, परस्परांवर केला जाणारा मारा यातून खूप मोठ्या संघर्षाची शक्यता दिसू लागली. त्यामुळे अमेरिकेने हा तणाव कमी व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले.

सिंधू जलवाटप करारावर  पाकिस्तानची चर्चेची तयारी

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने १९६० सालचा सिंधू जलवाटप करार स्थगित केला. मात्र, त्यानंतर काही आठवड्यांतच पाकिस्तानने या करारावर भारताशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती सुत्रांनी गुरुवारी दिली. 

पाकिस्तानचे जलसंपदा सचिव सय्यद अली मुर्तजा यांनी भारताने बजावलेल्या नोटिशीला उत्तर दिले आहे. भारताने उपस्थित केलेल्या आक्षेपांवर चर्चेची तयारी असल्याचे मुर्तजा यांनी भारताच्या जलशक्ती खात्याचे सचिव देवश्री मुखर्जी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयाला कायदेशीर आधार नसल्याचे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानRajnath Singhराजनाथ सिंह