शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

PoK बाबत लष्करप्रमुखांनी केले मोठे विधान, म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 1:49 PM

संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा भाग आहे असा संकल्प आपल्या संसदेने केलेला आहे.

नवी दिल्ली  - नवनियुक्त लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत मोठे विधान केले आहे. संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असा संसदीय संकल्प आपण केलेला आहे. पीओकेभारतात आला पाहिजे अशी जर संसदेची इच्छा असेल तर त्याबाबत आम्हाला योग्य आदेश मिळाल्यानंतर आम्ही योग्य ती कारवाई करू, असे सूचक विधान लष्कप्रमुख मुकुंद नरवणे यांनी केले आहे.  लष्करप्रमुख पदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या मुकुंद नरवणे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पाकव्याप्त काश्मीर भारतात सामील करून घेण्याविषयी राजकीय नेतृत्वाने केलेल्या विधानाबाबत लष्करप्रमुख म्हणाले की, ''संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा भाग आहे असा संकल्प आपल्या संसदेने केलेला आहे. जर संसदेची इच्छा असेल तर त्याबाबत आम्हाला योग्य आदेश मिळाल्यानंतर आम्ही योग्य ती कारवाई करू,''  

यावेळी लष्करप्रमुखांनी भारतीय लष्कराच्या सज्जतेविषयीसुद्धा माहिती दिली. ''लष्कर नियंत्रण रेषेवर बऱ्यापैकी सक्रिय आहे. आम्हाला रोज विविध प्रकारची गोपनीय माहिीत मिळत असते. अशा माहितीची गंभीर दखल घेतली जाते. असा सतर्कतेमुळेच BAT या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीच्या कारवाया हाणून पाडण्यात आम्हाला यश मिळाले आहे,''असे त्यांनी सांगितले.  आता पूर्वीच्या तुलनेत भारतीय लष्कराची तयारी चांगली आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नियुक्ती आणि सैनिकी व्यवहार विभागाची निर्मिती एकिकरणाच्या दिशेने टाकण्यात आलेले मोठे पाऊल आहे. आता ही योजना यशस्वी व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे लष्करप्रमुख म्हणाले. तसेच पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर लष्कराचे संतुलन करण्याची आवश्यकता असल्याचेही लष्करप्रमुखांनी सांगितले.   

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPOK - pak occupied kashmirपीओके