शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Karunanidhi Death Update : जेव्हा करुणानिधींना मध्यरात्री फरपटत घराबाहेर आणले होते... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 06:09 IST

Karunanidhi Death Update : दक्षिण भारतातील राजकारणामध्ये फिल्मी दुनियेतल्या लोकांचा वरचष्मा राहिलेला आहे. त्यामुळे तेथील नेत्यांच्या जीवनामध्येही नाट्यमय प्रसंग घडण्याची अनेकदा वेळ आलेली दिसते.

चेन्नई : दक्षिण भारतातील राजकारणामध्ये फिल्मी दुनियेतल्या लोकांचा वरचष्मा राहिलेला आहे. त्यामुळे तेथील नेत्यांच्या जीवनामध्येही नाट्यमय प्रसंग घडण्याची अनेकदा वेळ आलेली दिसते. कधी कधी राजकीय वैर आणि वैमनस्याने नेत्यांनी टोकाची पावले उचलल्याचेही तामिळनाडूतील लोकांनी पाहिले आहे. आपल्या आवडत्या नेत्याचे दर्शन होताच रस्त्याच्या दुतर्फा लोटांगणे घालणारे लोक असोत वा आपल्या आवडत्या नेत्याची तुरुंगातून सूटका व्हावी यासाठी प्रायश्चित्त म्हणून जमिनीवर अन्न वाढून जेवणारे लोकही याच राज्यामध्ये आहेत. विधानसभेत एकमेकांवर शब्दांबरोबर शारीरिक हल्ले करणे, मुख्यमंत्री झाल्यावर प्रतिस्पर्धी, विरोधीपक्षनेत्याला अटक करणे या तामिळनाडूतील अगदी नेहमीच्या घटना आहेत.

करुणानिधी यांच्या आयुष्यात मात्र अशीच एक घटना घडली होती. भारतीय राजकारणात सहसा अशा घटना घडत नाहीत. 30 जून 2001 रोजी मध्यरात्री 78 वर्षांच्या करुणानिधी यांना अटक करण्यासाठी चेन्नईमधील पोलीस त्यांच्या घरी गेले. करुणानिधी यांनी मुख्यमंत्रीपदावर असताना 10 उड्डाणपुलांची कामे देताना भ्रष्टाचार केला असा त्यांच्यावर आरोप ठेवून ही कारवाई केली जात होती. रात्री अचानक केलेल्या या कारवाईला विरोध करणाऱ्या करुणानिधी यांना आजिबात न जुमानता घराबाहेर अक्षरशः फरपटत नेण्यात आले होते. त्यानंतर वेपेरी पोलीस स्टेशनमध्ये थोडा वेळ बसल्यानंतर त्यांना मुख्य सत्र न्यायाधीश एस. अशोक कुमार यांच्यासमोर उभे करण्यात आले व कोठडी सुमावल्यानंतर चेन्नई मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले होते. याचवेळेस करुणानिधी यांचे पूत्र एम. के. स्टॅलिन चेन्नई शहराचे महापौर होते. अशा कारवाईचा सुकाणू त्यांच्या दिशेने येण्याआधीच स्टॅलिन यांनी न्यायाधीशांसमोर समर्पण केले होते. हे सर्व तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी केल्याचा आरोप करुणानिधी व द्रमुकपक्षाने केला होता.

करुणानिधी यांनी यावेळेस अत्यंत संतप्त होऊन पत्रकारांसमोर आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाचे वर्णन केले होते. पोलिसांनी आपल्याला कोणतेही वॉरंट दाखवले नाही. वॉरंटची गरज नाही असे पोलिसांनी सांगितल्याचा त्यांनी पोलिसांवर आरोप केला होता. ''पोलिसांनी माझा शर्ट फाडला. जेव्हा आम्ही तिला (तत्कालीन मुख्यमंत्री जयललीता) अटक केली होती तेव्हा अत्यंत सन्मानाने वागवले होते'' असेही ते म्हणाले होते. करुणानिधी यांच्याबरोबर तत्कालीन केंद्रीय मंत्रिमंडळात व्यापार मंत्री असणारे मुरासोली मारन आणि पर्यावरण मंत्री टी. आर. बालू यांनाही अटक करण्यात आली होती. करुणानिधी यांच्या अटकेस विरोध करणार्या बालू व मारन यांनाही अशाच बळाचा वापर करुन अटक झाली. यानंतर चेन्नईतील वातावरण चांगलेच बिघ़डले आणि द्रमुक व राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सदस्यपक्षांनी बंद पाळला होता.

टॅग्स :KarunanidhiकरुणानिधीChennaiचेन्नईTamilnaduतामिळनाडू