शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा मुख्यमंत्री हाती घेतात बैलांचा कासरा...

By admin | Updated: January 10, 2016 23:27 IST

जळगाव : डॉ.आप्पासाहेबपुरस्कार वितरण सोहळ्याच्यानिमित्ताने जळगावात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अधिकाधिक वेळ जैनहिल्स येथील संशोधन केंद्रात शेतकरी व शेततज्ज्ञांशी चर्चेत घालविला. शेताच्या मातीत पाय पडताच फडणवीस हे मुख्यमंत्रीपद विसरून आपल्या मूळ कास्तकाराच्या भूमिकेत शिरले. बैलजोडीच्या सहाय्याने चालणार्‍या या पेरणी यंत्राचा कासरा हाती घेण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही.

जळगाव : डॉ.आप्पासाहेबपुरस्कार वितरण सोहळ्याच्यानिमित्ताने जळगावात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अधिकाधिक वेळ जैनहिल्स येथील संशोधन केंद्रात शेतकरी व शेततज्ज्ञांशी चर्चेत घालविला. शेताच्या मातीत पाय पडताच फडणवीस हे मुख्यमंत्रीपद विसरून आपल्या मूळ कास्तकाराच्या भूमिकेत शिरले. बैलजोडीच्या सहाय्याने चालणार्‍या या पेरणी यंत्राचा कासरा हाती घेण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही.
कृषि संशोधन केंद्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजल्या जाणार्‍या पद्मश्री डॉ.आप्पासाहेब पवार आधुनिक कृषि उच्च-तंत्र पुरस्कार सोहळ्यासाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावी मुक्कामी राहिले. रविवारी अधिकाधिक वेळ त्यांनी जैन हिल्स येथील संशोधन केंद्रात घालविला. संत्रा व लिंबूवर्गीय पिकांमध्ये प्रक्रिया योग्य असलेल्या स्वीट लेमन अर्थात मोसंबीच्या संशोधन केंद्राला त्यांनी भेट देऊन सर्व माहिती घेतली. टिश्युकल्चर लॅब, बायोटेक लॅब, संशोधन केंद्राच्या शेतीवर लावण्यात आलेली केळी, डाळींब, आंबा, पेरू, मोसंबी आदी पिकांची माहिती घेत त्याच ठिकाणी कांदा पेरणी यंत्राची पाहणी केली.
जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन व व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी त्यांना माहिती दिली.
वेळ, पैसा, श्रम वाचविणारे कांदा पेरणी यंत्र
कांदा पेरणी यंत्राच्या सहाय्याने केवळ एक व्यक्ती २ तासात एक एकर क्षेत्रावर कांदा पेरणी करू शकतो. तर पारंपरिक कांदा पेरणीला एक एकरासाठी साधारणत: ४० मजूर एका दिवसाकरीता लागतात. त्यावर ५ हजार रुपये खर्च येतो व पेरणीसाठी पूर्ण दिवस खर्ची पडतो. मात्र साधारण ७० किलो वजनाच्या या यंत्रामुळे केवळ एक बैलजोडीच्या सहाय्याने एक व्यक्ती फक्त दोन तासात एक एकरावर कांदा बी पेरतो. अवघ्या १७ हजार रुपये किंमतीत येणारे हे यंत्र पेरणी झाल्यावर इतर शेतकर्‍यांनाही उपलब्ध करून देता येऊन त्यातूनही उत्पन्न मिळविता येते. विशेषत: परंपरिक पद्धतीत कांदा नर्सरीत लावून नंतर त्याची लागवड करावी लागते. त्यामुळे ३० दिवसांचा अतिरिक्त कालावधी लागतो. मात्र १८० दिवसांत येणारे कांदापीक यंत्राद्वारे लागवड केल्यास अवघ्या १५० दिवसांत येते. वेळ, श्रम व पैशाची मोठ्या प्रमाणावर बचत या यंत्रामुळे होत असल्याने शेतकर्‍यांसाठी ते वरदान ठरले आहे. या यंत्राने पेरणी केल्यामुळे रोपांची संख्या, अंतर योग्य राखता येऊन त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन वाढते. शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेल्या या यंत्रापाठोपाठ जैन इरिगेशनने कांदा काढणी किंवा कांदा हार्वेस्टर देखील तयार केला आहे.
-----
फोटो कॅप्शन-११जळगावसीएमव्हीजीट- बैलजोडीच्या सहाय्याने चालणार्‍या कांदा पेरणी यंत्राचा कासरा हाती घेऊन बैलजोडी हाकताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.