शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

क्या बात है...  कुटुंबात 5 मुली, 3 IAS-IRS अधिकारी तर 2 इंजिनिअर

By महेश गलांडे | Published: December 12, 2020 4:01 PM

उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील चंद्रसेन सागर आणि मीना देवी यांना पहिले कन्यारत्न प्राप्त झाले. त्यानंतर, एका पाठोपाठ एक अशा 5 मुली कुटुंबात जन्मास आल्या.

ठळक मुद्देफरीदपूर तालुक्यातील या कुटुंबात 5 मुलींचा जन्म झाल्यानंतरही आनंद होता. पण, गावातील आणि समाजातील काही लोकांकडून मुलींच्या जन्मामुळे टोमणे मारण्यात येत होते

बरेली - मुलगी नको मुलगा पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे, अशी धारणा समाजामध्ये आहे. मुलाच्या जन्मासाठी आजही महिलांना दोन पेक्षा जास्त अपत्यांना जन्म द्यावा लागतो. स्त्री भ्रूण हत्यासारख्या घटना आजही आपल्या समाजात घडताना दिसत आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील एका कुटुंबांतील मुलींनी मुलीही मुलांपेक्षा कमी नाहीत, मुलीही मुलांप्रमाणेच, त्यांच्यापेक्षाही मोठं यश मिळवू शकतात हे दाखवून दिलंय. येथील एकाच कुटुंबातील 5 मुलींपैकी 2 आयएएस अधिकारी व 1 मुलगी आयआरएस अधिकारी आहेत. तर, उर्वरीत दोन मुली इंजिनिअर बनून नोकरी करत आहेत. 

उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील चंद्रसेन सागर आणि मीना देवी यांना पहिले कन्यारत्न प्राप्त झाले. त्यानंतर, एका पाठोपाठ एक अशा 5 मुली कुटुंबात जन्मास आल्या. फरीदपूर तालुक्यातील या कुटुंबात 5 मुलींचा जन्म झाल्यानंतरही आनंद होता. पण, गावातील आणि समाजातील काही लोकांकडून मुलींच्या जन्मामुळे टोमणे मारण्यात येत होते. 5 मुली झाल्यामुळे समाज व नातेवाईकांकडून खासगीत बोलताना, काय मुलींना आयएएस बनवणार आहात का? असंही बोललं जात. मात्र, कुटुंबीयांनी मुलींना उच्च शिक्षण देत ते खरं करुन दाखवलं. चंद्रसेन यांच्या 5 पैकी तीन मुलींनी युपीएससी परीक्षा पास केली आहे. 

चंद्रसेन सागर यांच्या 5 मुलींपैकी 3 मुलींनी युपीएससी परीक्षा पास केली असून दोन मुली आयएएस अधिकारी आहेत. तर, तिसरी मुलगी आयआरएस अधिकारी आहे. विशेष म्हणजे इतर दोन मुलींनीही इंजिनिअरची पदवी घेतली असून त्याही इंजिनिअर बनल्या आहेत. मुलींच्या आयएएस बनण्यात मुलींनी घेतलेल्या कष्टाचे आणि तिच्या आईने दिलेल्या काबाडकष्टाचं मोठं योगदान असल्याचं वडिल चंद्रसेन सागर यांनी म्हटलं. 

चंद्रसेन यांच्या मुलींच्या शिक्षणाची सुरुवात बरेली येथील सेंट मारिय कॉलेजमधून झाली. त्यानंतर, उत्तराखंड, इलाहाबाद आणि दिल्ली येथे जाऊन पुढील उच्च शिक्षण घेतले. तिन्ही बहिणींनी दिल्लीत राहून आपलं युपीएससी स्पर्धा परिक्षेचं शिक्षण घेतलं. चंद्रसेन यांची पहिली मुलगी अर्जित 2009 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यानंतर, मुंबईतील जॉईंट कमिश्नर कस्टम कार्यालयात रुजू झाली. अर्जित यांचे लग्न आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे झाली असून तिचे पतीही आयएएस अधिकारी आहेत. 6 वर्षानंतर म्हणजेच 2015 मध्ये चंद्रसेन यांच्या दुसऱ्या मुलीनेही आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली. अर्पित असं तिचे नाव असून त्या सध्या वालसाड येथे डीडीओ पदावर कार्यरत आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या नंबरच्या दोन्ही मुली इंजिनिअर असून त्या मुंबई आणि दिल्लीत जॉब करत आहेत. 

चंद्रसेन आणि मीना यांच्या 5 व्या नंबरच्या मुलीनेही युपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. आकृतीने 2016 साली दुसऱ्या प्रयत्नात ही परीक्षा पास केली. सध्या ती पाणी महामंडळाच्या संचालपदी रुजू आहेत. चंद्रसेन यांच्या मुलींना त्यांच्या मामापासूनच युपीएससी परीक्षा देण्याची प्रेरणा मिळाली. त्यांचे मामा अनिल कुमार हे 1995 सालच्या युपीएससी परीक्षेतून आयपीएस अधिकारी बनले होते. त्यामुळे, आपणही आपल्या मामाप्रमाणेच मोठं अधिकारी व्हायचं असं स्वप्न या मुलींनी पाहिलं होतं. मामा अनिल कुमार यांनीही आपल्या भाच्चींना मदत आणि मार्गदर्शन केले, त्यामुळेच मुलींनीही आई-वडिलांचं आणि त्यांचं स्वप्न सत्यात उतरवून दाखवलं.  

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगUttar Pradeshउत्तर प्रदेशWomenमहिलाexamपरीक्षा