शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

हरयाणा निकालाने राहुल गांधींना झटका, महाराष्ट्रात काँग्रेससमोर सर्वात मोठं आव्हान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 13:56 IST

हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे.

Congress Haryana Election Results :हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या ताज्या आकडेवारीनुसार काँग्रेसचा पराभव होत असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मजमोजणी सुरु होताच काँग्रेसने मोठी आघाडी घेतल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला होता. मात्र काही वेळातच चित्र पालटलं आणि भाजपने मोठी आघाडी घेतली. निवडणूक आयोगाच्या कलानुसार ९० जागांच्या हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ३५ जागा मिळताना दिसत आहेत. दुसरीकडे, भाजप तिसऱ्यांदा विजय मिळवत हरयाणामध्ये इतिहास घडवणार आहे.

विधानसभा निवडणुकीत हरयाणातील हा पराभव काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो, असे म्हटलं जात आहे. या पराभवामुळे राहुल यांच्या निवडणूक रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, असेही बोलले जात आहे. त्यामुळे आगामी महाराष्ट्र आणि झारखंडच्या महत्त्वाच्या विधानसभा निवडणुकांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं होतं. त्यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे मनोबल उंचावले आहे. मात्र या निकालाने चित्र बदलण्याची शक्यता आहे.

काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीर आणि हरयाणाच्या निवडणुका जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. दुसरीकडे, वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांचा काँग्रेससाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जात होते. मात्र हरियाणातील निकालाची परिस्थिती पाहता तिथल्या निकालाने कदाचित कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचू शकते. तसेच याचा परिणाम दोन्ही राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकांवरही होऊ शकतो. 

हरयाणा विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळणार असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात होता. भाजपच्या १० वर्षांच्या सत्तेनंतर तिथे सत्तापरिवर्तन होईल, असेही म्हटलं जात होतं. भाजप सरकारचे दिवस आता गेले आहेत आणि आता हरयाणात काँग्रेसचे सरकार येणार असल्याचे राहुल आपल्या सभांमध्ये सांगत होते. मात्र आता भाजप इथे इतिहास रचणार असून तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्रावर होणार परिणाम?

काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी सातत्याने महाराष्ट्रात प्रचार करत आहेत. त्यांनी अनेक सभांना घेतल्या आहेत. तसेच भाजपलाही महाराष्ट्रा कोणत्याही किंमतीत स्वतःकडे ठेवायचे आहे. यासाठी भाजपही महाराष्ट्रातही आपली ताकद वापरत आहे. त्यामुळे यावेळी महाराष्ट्रात होणारी विधानसभा निवडणुकीची लढत चुरशीची होणार आहे. हरयाणामधील विजयामुळे भाजप महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये आपली ताकद कितीतरी पटीने वेगाने वाढवू शकतो.

दरम्यान, यावेळी हरयाणात काँग्रेसच्या विजयाचे दावे सातत्याने केले जात होते आणि तसा प्रचारही केला जात होता. राहुल गांधी स्वतः या निवडणुकीत खूप सक्रिय होते. पण, या पराभवामुळे काँग्रेसचे मनोधैर्य खचण्याची शक्यता आहे. यामुळे राहुल गांधींच्या निवडणूक रणनीतीवरही प्रश्न उपस्थित होऊ शकतात, असेही म्हटलं जात आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसHaryanaहरयाणाRahul Gandhiराहुल गांधी