शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
4
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
5
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
6
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
7
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
8
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
9
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
10
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
11
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
12
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
13
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
14
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
15
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
16
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
17
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
18
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
19
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
20
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 06:19 IST

तुम्ही या समस्येबद्दल विचार केला आहे का? तुम्ही कोणती पावले उचलली आहेत?

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: आयआयटी खरगपूर आणि ग्रेटर नोएडा येथील शारदा विद्यापीठातील आत्महत्यांच्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी प्रश्न उपस्थित केले. येथे काय गडबड सुरू आहे? विद्यार्थी आत्महत्या का करत आहेत? असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाचा तपास वेगाने पुढे नेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

शैक्षणिक संस्थांमध्ये आत्महत्येमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती जेबी पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या खंडपीठासमोर सुरू आहे. चौथ्या वर्षाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या घटनेवर, खंडपीठाने आयआयटी खरगपूरच्या वकिलाला विचारले की, तुमच्या आयआयटी खरगपूरमध्ये नेमकी काय गडबड सुरू आहे. विद्यार्थी आत्महत्या का करत आहेत? तुम्ही या समस्येबद्दल विचार केला आहे का? तुम्ही कोणती पावले उचलली आहेत?

शारदा विद्यापीठातील एका विद्यार्थिनीशी संबंधित अशीच एक घटना खंडपीठासमोर आली तेव्हा, घटनांचा तपास जलदगतीने पुढे नेऊ द्या असे आदेश न्यायालयाने  दिले. वरिष्ठ वकील अपर्णा भट न्यायमित्र म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी दोन्ही प्रकरणांतील तपशील आणि चौकशीची सद्य:स्थिती न्यायालयाला दिली. शारदा विद्यापीठ प्रकरणावरील ३० पानांच्या स्टेटस रिपोर्टचा हवाला देत, भट म्हणाले की एक सुसाईड नोट सापडली असून, दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

पालकांना माहिती देणे हे तुमचे कर्तव्य नव्हते का? 

खंडपीठाने विद्यापीठात घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल कठोर भूमिका घेतली आणि वकिलाला विचारले, तुम्ही आमच्या निर्देशांचे पालन का करत नाही? आम्ही यापूर्वीच सविस्तर निर्णय दिला आहे. हे आपण आपल्या मुलांसाठी करतो... पोलिसांना आणि पालकांना लगेच माहिती देणं हे तुमचं कर्तव्य नव्हतं का? आयआयटी खरगपूरच्या वकिलांनी सांगितले की १० सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे आणि १२ सदस्यांचे समुपदेशन केंद्रदेखील स्थापन करण्यात आले आहे.

कोणीतरी एफआयआर दाखल केला, पण कुणी? 

कोर्टाने विचारले की शारदा विद्यापीठ प्रकरणात कोणतीही एफआयआर दाखल झाली आहे का, तेव्हा भट यांनी होकारार्थी उत्तर दिलं. यावर न्यायालयाने विचारलं, कोणीतरी एफआयआर दाखल केला, पण नेमका कुणी? भट यांनी सांगितलं की मृत विद्यार्थिनीच्या वडिलांनी एफआयआर दाखल केला, तेव्हा न्यायालयाने प्रश्न केला, वडिलांना हे कसं कळलं की त्यांची मुलगी मरण पावली आहे? त्यांना कोणी कळवले? 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयStudentविद्यार्थीStudentविद्यार्थी