शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
2
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
3
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
4
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
5
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
6
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
7
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
8
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
9
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
10
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
11
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
12
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
13
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
14
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
15
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
16
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
17
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
18
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
19
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
20
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 06:19 IST

तुम्ही या समस्येबद्दल विचार केला आहे का? तुम्ही कोणती पावले उचलली आहेत?

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: आयआयटी खरगपूर आणि ग्रेटर नोएडा येथील शारदा विद्यापीठातील आत्महत्यांच्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी प्रश्न उपस्थित केले. येथे काय गडबड सुरू आहे? विद्यार्थी आत्महत्या का करत आहेत? असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाचा तपास वेगाने पुढे नेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

शैक्षणिक संस्थांमध्ये आत्महत्येमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती जेबी पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या खंडपीठासमोर सुरू आहे. चौथ्या वर्षाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या घटनेवर, खंडपीठाने आयआयटी खरगपूरच्या वकिलाला विचारले की, तुमच्या आयआयटी खरगपूरमध्ये नेमकी काय गडबड सुरू आहे. विद्यार्थी आत्महत्या का करत आहेत? तुम्ही या समस्येबद्दल विचार केला आहे का? तुम्ही कोणती पावले उचलली आहेत?

शारदा विद्यापीठातील एका विद्यार्थिनीशी संबंधित अशीच एक घटना खंडपीठासमोर आली तेव्हा, घटनांचा तपास जलदगतीने पुढे नेऊ द्या असे आदेश न्यायालयाने  दिले. वरिष्ठ वकील अपर्णा भट न्यायमित्र म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी दोन्ही प्रकरणांतील तपशील आणि चौकशीची सद्य:स्थिती न्यायालयाला दिली. शारदा विद्यापीठ प्रकरणावरील ३० पानांच्या स्टेटस रिपोर्टचा हवाला देत, भट म्हणाले की एक सुसाईड नोट सापडली असून, दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

पालकांना माहिती देणे हे तुमचे कर्तव्य नव्हते का? 

खंडपीठाने विद्यापीठात घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल कठोर भूमिका घेतली आणि वकिलाला विचारले, तुम्ही आमच्या निर्देशांचे पालन का करत नाही? आम्ही यापूर्वीच सविस्तर निर्णय दिला आहे. हे आपण आपल्या मुलांसाठी करतो... पोलिसांना आणि पालकांना लगेच माहिती देणं हे तुमचं कर्तव्य नव्हतं का? आयआयटी खरगपूरच्या वकिलांनी सांगितले की १० सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे आणि १२ सदस्यांचे समुपदेशन केंद्रदेखील स्थापन करण्यात आले आहे.

कोणीतरी एफआयआर दाखल केला, पण कुणी? 

कोर्टाने विचारले की शारदा विद्यापीठ प्रकरणात कोणतीही एफआयआर दाखल झाली आहे का, तेव्हा भट यांनी होकारार्थी उत्तर दिलं. यावर न्यायालयाने विचारलं, कोणीतरी एफआयआर दाखल केला, पण नेमका कुणी? भट यांनी सांगितलं की मृत विद्यार्थिनीच्या वडिलांनी एफआयआर दाखल केला, तेव्हा न्यायालयाने प्रश्न केला, वडिलांना हे कसं कळलं की त्यांची मुलगी मरण पावली आहे? त्यांना कोणी कळवले? 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयStudentविद्यार्थीStudentविद्यार्थी