शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
4
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
5
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
6
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
7
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
8
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
9
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
10
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
11
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
12
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
13
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
14
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
15
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
16
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
17
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
18
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
19
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
20
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?

आंबेडकरांवर हक्क कुणाचा?

By admin | Updated: April 13, 2015 23:49 IST

सरदार पटेल यांच्यानंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरून काँग्रेस आणि भाजप समोरासमोर उभे ठाकले आहेत. डॉ. आंबेडकर यांची १२४ वी जयंती संपूर्ण वर्षभर साजरी करणार,

आज १२४ वी आंबेडकर जयंती : काँग्रेस आणि सत्ताधारी भाजप आमने-सामनेशीलेश शर्मा - नवी दिल्लीसरदार पटेल यांच्यानंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरून काँग्रेस आणि भाजप समोरासमोर उभे ठाकले आहेत. डॉ. आंबेडकर यांची १२४ वी जयंती संपूर्ण वर्षभर साजरी करणार, असे काँग्रेसने जाहीर केल्याबरोबर भाजपनेही डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्याचा आपला कार्यक्रम घोषित केला. त्यामुळे सरदार पटेलांवर हक्क कुणाचा यावरून काँग्रेस-भाजपत सुरू झालेल्या लढाईच्या धर्तीवर आता डॉ. आंबेडकर कुणाचे, यावरून लढाई सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी सोमवारी काँग्रेसच्या डॉ. आंबेडकर जयंती महोत्सव कमिटीची एक बैठक घेण्यात आली. डॉ. आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम महू येथे प्रारंभ करून त्याचा नागपूर येथे समारोप करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मेच्या अखेरीस महू येथे राष्ट्रीय स्तरावर डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रमाचा शुभारंभ केला जाईल. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे या कार्यक्रमाला हजर राहतील. त्यासोबतच सर्व राज्यांमध्ये अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातील.मंगळवारी डॉ. आंबेडकर यांची जयंती आहे. या दिवशी केवळ सांकेतिक कार्यक्रम घेण्यात येतील. त्यासाठी आयोजन कमिटीचे उपाध्यक्ष सुशीलकुमार शिंदे हे महू येथे जाणार आहेत.बाबासाहेबांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरविणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे, असा दावा या बैठकीनंतर शिंदे, मल्लिकार्जुन खरगे, ए. के. अँथोनी आणि के. राजू यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यातून डॉ. आंबेडकरांचा वारसा काबीज करण्याच्या शर्यतीत भाजपला मागे टाकण्याची पूर्ण तयारी काँग्रेसने केल्याचे संकेत मिळाले.१४ एप्रिल २०१५ ते १४ एप्रिल २०१६ पर्यंत चालणाऱ्या आंबेडकर जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमावर काँग्रेसच्या या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. काँग्रेसने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दलितांच्या सक्षमीकरणासाठी तयार केलेला जाहीरनामा हा या जयंती महोत्सवाचे मार्गदर्शक तत्त्व म्हणून काम करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. या जयंती महोत्सवाअंतर्गत महू, मुंबई आणि नागपूर येथे राष्ट्रीय स्तरावरचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. मुंबईत चिंतन बैठक घेण्यात येईल आणि दलितांविरुद्धचा भेदाभेद नष्ट करण्याबाबत त्यात चर्चा केली जाईल, अशी माहिती काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष के. राजू यांनी दिली.