शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

वक्फ विधेयकाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध? हे विधेयक उद्योगपतींसाठी; आमचं ठरलंय, आम्ही...! संजय राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 11:17 IST

आम्हाला हिंदुत्व शिकवू नये; जेव्हा भाजपला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून...

आज लोकसभेत वक्फ दुस्ती विधेयक (Waqf Amendment Bill) सादर होणार आहे. यासंदर्भात संपूर्ण देशभरातच चर्चा सुरू आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही पक्षाची भूमिका मांडली आहे. "वक्फ विधेयकाचा आणि हिंदुत्वाचा काहीही संबंध नाही. हे विधेयक एक सामान्य विधेयक आहे. याचा कुणी मेळ घालत असेल, तर तो मूर्खपणा आहे. या विधेयकाचा जर संबंध असेलच तर, वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर भविष्यात कब्जा मिळवण्यासाठी काही उद्योगपतींना सोपे जावे, त्यासाठी या विधेयकाचे स्पष्ट प्रयोजन दिसत आहे. आमची भूमिका ठरलेली आहे. तुम्हाला ती शेवटच्या क्षणी दिसेल. आम्ही संदिग्ध अजिबात नाही. काही गोष्टी फ्लोअरवर गेल्यानंतर करायच्या असतात आणि आम्ही त्या करू, असे राऊत यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.

भाजपवर निशाणा साधताना राऊत म्हणाले, "भारतीय जनता पक्षाला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून आम्ही या देशात हिंदुत्वाच्या मिशीला पीळ देत फिरत आहोत. त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. वक्फ विधेयकाचा आणि हिंदुत्वाचा काहीही संबंध नाही. हे विधेयक एक सामान्य विधेयक आहे. या विधेयकात काही सुधारणा करण्याची सरकारची इच्छा आहे. त्या सुधारणांना या देशात केवळ मुस्लिमांचाच विरोध आहे, असे नाही. माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही या विधेयकाला तसा पूर्ण पाठींबा नाही. भाजपने राज्यात औरंगजेबाची कबर तोडण्यासंदर्भात भूमिका घेतली होती. त्यांच्या या भूमिकेला, 'याची गरज नाही, उगाच वातावरण खराब करू नका,' असे म्हणत संघाने विरोध केला. या बिलासंदर्भातही संघाची भूमिका त्याच पद्धतीची आहे, अशी माझी माहिती आहे. यामुळे, हिंदुत्वाचा विषय आणि या बिलाचा विषय, याचा कुणी मेळ घालत असेल, तर तो मूर्खपणा आहे."

राऊत पुढे म्हणाले, "या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे, हे फडणवीस सांगू शकतील का? इतर सुधारणावादी जी विधेयके असता, तसेच हेही एक विधेयक आहे. या विधेयकाचा जर संबंध असेलच तर, वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर भविष्यात कब्जा मिळवण्यासाठी काही उद्योगपतींना सोपे जावे, त्यासाठी या विधेयकाचे स्पष्ट प्रयोजन दिसत आहे. शिवसेना ही प्रखर हिंदुत्ववादी आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे बगलबच्चे वक्फ बोर्डाच्या निमित्ताने जी बांग देत आहेत, हा मूर्खपणा आहे. हिंदुत्व हिंदुत्वाच्या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारची बिलं त्या ठिकाणी आहेत.

"आम्ही स्वतः विरोधी पक्षात असताना, भारतीय जनता पक्षाने आणलेल्या कलम ३७० च्या विधेयकाला पाठिंबा दिला आहे ना. कारण तो विषय, राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रिय एकात्मता आणि हिंदुत्वाच्या संदर्भात होता. आम्ही तिहेरी तलाकच्या विधेयकालाही विरोध केला नाही. कारण तो विषय गरीब मुस्लीम महिलांच्या संदर्भात होता. मात्र, वक्फ बोर्ड विधेयकाचा जो विषय आहे, तो त्यांच्या लाखो कोटी रुपयांच्या पॉपर्टी संदर्भातील विषय आहे. भविष्यात त्या प्रॉपर्ट्या आपल्या लाडक्या उद्योगपतींना देता येतील का?  त्यासाठी झालेली ही पायाभरणी असल्याचे आम्हाला स्पष्ट दिसते," असा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आम्ही सर्व खासदारांनी रात्री येथेच बसून चर्चा केली. आता पुन्हा आम्ही आमच्या पक्ष कार्यालयात बसणार आहोत. आमची भूमिका ठरलेली आहे. तुम्हाला ती शेवटच्या क्षणी दिसेल. असे राऊत यांनी सांगितले. यावेळी, विरोध की पाठींबा अजूनही संदिग्धता आहे? असे विचारले असता, राऊत म्हणाले, संदिग्ध अजिबात नाही. काही गोष्टी फ्लोअरवर गेल्यानंतर करायच्या असतात आणि आम्ही त्या करू.

 

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतwaqf board amendment billवक्फ बोर्डBJPभाजपाShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMuslimमुस्लीम