शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 15:21 IST

लडाखसाठी आजचा लढा संपूर्ण देशाचा उद्याचा लढा बनू शकतो. जेव्हा सरकार लोकशाहीचा आवाज दाबते तेव्हा लोकांचे कर्तव्य आहे की त्यांनी आपला आवाज आणखी वाढवावा, असं विधान केजरीवाल यांनी केले.

मागील काही दिवसापासून लड्डाखमध्ये आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाने काल हिंसक वळण घेतले. दरम्यान, यावर राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली. 'लडाखमधील आजचा लढा उद्या देशव्यापी लढाईत बदलू शकतो. जेव्हा सरकार लोकशाहीचा आवाज दाबते तेव्हा जनतेचे कर्तव्य आहे की त्यांनी आवाज उठवावा', असं विधान त्यांनी केले. 

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत

काल लड्डाखमध्ये आंदोलनाने हिंसक वळण घेतले. यामध्ये मोठी जाळपोळ झाली. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. लडाखमधील आंदोलनावर अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. "आज लडाखमध्ये जे घडत आहे ते अत्यंत चिंताजनक आहे. प्रत्येक खऱ्या देशभक्ताने लडाखच्या लोकांना पाठिंबा दिला पाहिजे. आपण ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवले होते का जेणेकरून लोक ब्रिटिशांऐवजी भाजपचे गुलाम बनतील? भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद सारख्या क्रांतिकारकांनी लोकशाहीसाठी आपले प्राण दिले जेणेकरून प्रत्येक भारतीयाला स्वतःचे सरकार निवडण्याचा अधिकार मिळेल', असे पोस्टमध्ये केजरीवाल यांनी म्हटले आहे.

सत्तेच्या नशेत असलेला भाजप एकामागून एक राज्य केंद्रशासित प्रदेशात रूपांतरित करत आहे, संविधानाने दिलेले अधिकार हिरावून घेत आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला. पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, "लडाखचे लोक काय मागत आहेत? ते फक्त त्यांचा मतदानाचा अधिकार, सरकार निवडण्याचा अधिकार मागत आहेत. पण भाजप त्यांचा आवाज दाबत आहे. वारंवार आश्वासने देऊनही, ते त्यांना मतदानाचा अधिकार देत नाही."

'आता मौन बाळगणे शक्य नाही आणि ही लढाई देशव्यापी होऊ शकते. लोकशाही हा लोकांचा आवाज आहे आणि जेव्हा सरकार तो आवाज दाबू लागते, तेव्हा लोकांचे कर्तव्य आहे की त्यांनी आणखी मोठ्याने बोलावे. जर आपल्याला देशाची लोकशाही वाचवायची असेल, तर आपण या हुकूमशाहीविरुद्ध गप्प राहू शकत नाही. आज, लडाखचा लढा उद्या संपूर्ण देशाचा लढा बनू शकतो", असंही या पोस्टमध्ये केजरीवाल यांनी म्हटले आहे.

लडाखमध्ये काय घडले आहे?

लडाखला राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीचा विस्तार करण्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागले. लेह एपेक्स बॉडी नेतृत्त्वाखालील आंदोलनाला हिंसक वळण लागले जेव्हा निदर्शकांनी भाजप कार्यालय आणि अनेक वाहनांना आग लावली आणि शेकडो लोक रस्त्यावर उतरले. लडाखची राजधानी पूर्ण बंद असताना ज्वाला आणि काळा धूर दिसत होता. लेहमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात चार जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. प्रशासनाने लडाखच्या लेह जिल्ह्यात भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ladakh situation concerning; every patriot should support people: Kejriwal

Web Summary : Arvind Kejriwal expressed concern over the Ladakh protests turning violent, urging support for the people's demand for voting rights and statehood. He criticized the BJP, warning that suppressing voices could lead to a nationwide movement for democracy.
टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालladakhलडाख