शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 15:21 IST

लडाखसाठी आजचा लढा संपूर्ण देशाचा उद्याचा लढा बनू शकतो. जेव्हा सरकार लोकशाहीचा आवाज दाबते तेव्हा लोकांचे कर्तव्य आहे की त्यांनी आपला आवाज आणखी वाढवावा, असं विधान केजरीवाल यांनी केले.

मागील काही दिवसापासून लड्डाखमध्ये आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाने काल हिंसक वळण घेतले. दरम्यान, यावर राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली. 'लडाखमधील आजचा लढा उद्या देशव्यापी लढाईत बदलू शकतो. जेव्हा सरकार लोकशाहीचा आवाज दाबते तेव्हा जनतेचे कर्तव्य आहे की त्यांनी आवाज उठवावा', असं विधान त्यांनी केले. 

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत

काल लड्डाखमध्ये आंदोलनाने हिंसक वळण घेतले. यामध्ये मोठी जाळपोळ झाली. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. लडाखमधील आंदोलनावर अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. "आज लडाखमध्ये जे घडत आहे ते अत्यंत चिंताजनक आहे. प्रत्येक खऱ्या देशभक्ताने लडाखच्या लोकांना पाठिंबा दिला पाहिजे. आपण ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवले होते का जेणेकरून लोक ब्रिटिशांऐवजी भाजपचे गुलाम बनतील? भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद सारख्या क्रांतिकारकांनी लोकशाहीसाठी आपले प्राण दिले जेणेकरून प्रत्येक भारतीयाला स्वतःचे सरकार निवडण्याचा अधिकार मिळेल', असे पोस्टमध्ये केजरीवाल यांनी म्हटले आहे.

सत्तेच्या नशेत असलेला भाजप एकामागून एक राज्य केंद्रशासित प्रदेशात रूपांतरित करत आहे, संविधानाने दिलेले अधिकार हिरावून घेत आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला. पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, "लडाखचे लोक काय मागत आहेत? ते फक्त त्यांचा मतदानाचा अधिकार, सरकार निवडण्याचा अधिकार मागत आहेत. पण भाजप त्यांचा आवाज दाबत आहे. वारंवार आश्वासने देऊनही, ते त्यांना मतदानाचा अधिकार देत नाही."

'आता मौन बाळगणे शक्य नाही आणि ही लढाई देशव्यापी होऊ शकते. लोकशाही हा लोकांचा आवाज आहे आणि जेव्हा सरकार तो आवाज दाबू लागते, तेव्हा लोकांचे कर्तव्य आहे की त्यांनी आणखी मोठ्याने बोलावे. जर आपल्याला देशाची लोकशाही वाचवायची असेल, तर आपण या हुकूमशाहीविरुद्ध गप्प राहू शकत नाही. आज, लडाखचा लढा उद्या संपूर्ण देशाचा लढा बनू शकतो", असंही या पोस्टमध्ये केजरीवाल यांनी म्हटले आहे.

लडाखमध्ये काय घडले आहे?

लडाखला राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीचा विस्तार करण्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागले. लेह एपेक्स बॉडी नेतृत्त्वाखालील आंदोलनाला हिंसक वळण लागले जेव्हा निदर्शकांनी भाजप कार्यालय आणि अनेक वाहनांना आग लावली आणि शेकडो लोक रस्त्यावर उतरले. लडाखची राजधानी पूर्ण बंद असताना ज्वाला आणि काळा धूर दिसत होता. लेहमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात चार जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. प्रशासनाने लडाखच्या लेह जिल्ह्यात भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ladakh situation concerning; every patriot should support people: Kejriwal

Web Summary : Arvind Kejriwal expressed concern over the Ladakh protests turning violent, urging support for the people's demand for voting rights and statehood. He criticized the BJP, warning that suppressing voices could lead to a nationwide movement for democracy.
टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालladakhलडाख