शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशमध्ये घडतंय ते भारतातही होऊ शकतं, काँग्रेसच्या सलमान खुर्शिद यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 14:41 IST

Bangladesh Protests: भारतामध्ये वरवर पाहता परिस्थिती सामान्य दिसत असली तरी भारतातही बांगलादेशप्रमाणे सरकारविरोधात हिंसक आंदोलन होऊ शकते, असे विधान सलमान खुर्शिद (Salman Khurshid) यांनी म्हटलं आहे.  

बांगलादेशमध्ये आरक्षणाविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाची परिणती सत्तांतरामध्ये झाली होती. आंदोलकांनी सुरू केलेल्या हिंसक आंदोलनानंतर शेख हसिना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देशातून पलायन केलं होतं. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी बांगलादेशमध्ये घडत असलेल्या घडामोडींवरून एक वादग्रस्त विधान केलं आहे. जे बांगलादेशमध्ये घडत आहे, ते भारतातही घडू शकतं, असा दावा सलमान खुर्शिद यांनी केला आहे. भारतामध्ये वरवर पाहता परिस्थिती सामान्य दिसत असली तरी भारतातही बांगलादेशप्रमाणे सरकारविरोधात हिंसक आंदोलन होऊ शकते, असेही सलमान खुर्शिद यांनी म्हटलं आहे.  

एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये बोलताना काँग्रेस नेत सलमान खुर्शिद म्हणाले की, काश्मीरमध्ये सारं काही सामान्य दिसत आहे. येथेही सर्वकाही आलबेल आहे, असं वाटू शकतं. आपण विजयाचा आनंद साजरा करत आहोत. मात्र २०२४ मधील विजय किंवा यश हे अगदीच किरकोळ असेल, अजून बरंच काही करणं बाकी आहे. खरं सांगायचं झाल्यास येथे खाली खूप काही आहे. बांगलादेशमध्ये जे घडत आहे, ते भारतामध्येही घडू शकते. आपल्या देशामध्ये जो प्रसार होत आहे, तो बांगलादेशप्रमाणे घडणाऱ्या गोष्टींना पसरण्यापासून रोखत आहे.

सलमान खुर्शिद यांनी पुढे सांगितलं की, दक्षिण पूर्व दिल्लीमधील शाहीनबाह येथे महिलांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या सीएए-एनआरसीविरोधातील आंदोलन जवळपास १०० दिवस चाललं, त्या आंदोलनाने देशाला अशा प्रकारचं आंदोलन करण्याची प्रेरणा दिली.  मात्र हे एक अयशस्वी आंदोलन ठरले, कारण यामध्ये सहभागी होणारे अनेकजण अद्याप तुरुंगात आहेत. आज देशामध्ये शाहीनबागसारखं दुसरं आंदोलन होऊ शकत नाही. 

मी शाहीनबाग आंदोलन अयशस्वी झालं, असं म्हटल्यास तुम्हाला वाईट वाटेल? आपल्यापैकी अनेकजण शाहीन बाग आंदोलन यशस्वी झालं, असं मानतात. मात्र शाहिनबागशी संबंधित लोकांसोबत काय घडतंय हे मला माहिती आहे. त्यामधील किती लोक अद्याप तुरुंगात आहेत?  त्यामधील कितीजणांना जामीन मिळत नाही? यामधील किती लोकांनी देशाचं शत्रू ठरवण्यात आलं आहे, हे मला माहिती आहे. 

टॅग्स :salman khurshidसलमान खुर्शिदcongressकाँग्रेसBangladeshबांगलादेशIndiaभारत