शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

बांगलादेशमध्ये घडतंय ते भारतातही होऊ शकतं, काँग्रेसच्या सलमान खुर्शिद यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 14:41 IST

Bangladesh Protests: भारतामध्ये वरवर पाहता परिस्थिती सामान्य दिसत असली तरी भारतातही बांगलादेशप्रमाणे सरकारविरोधात हिंसक आंदोलन होऊ शकते, असे विधान सलमान खुर्शिद (Salman Khurshid) यांनी म्हटलं आहे.  

बांगलादेशमध्ये आरक्षणाविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाची परिणती सत्तांतरामध्ये झाली होती. आंदोलकांनी सुरू केलेल्या हिंसक आंदोलनानंतर शेख हसिना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देशातून पलायन केलं होतं. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी बांगलादेशमध्ये घडत असलेल्या घडामोडींवरून एक वादग्रस्त विधान केलं आहे. जे बांगलादेशमध्ये घडत आहे, ते भारतातही घडू शकतं, असा दावा सलमान खुर्शिद यांनी केला आहे. भारतामध्ये वरवर पाहता परिस्थिती सामान्य दिसत असली तरी भारतातही बांगलादेशप्रमाणे सरकारविरोधात हिंसक आंदोलन होऊ शकते, असेही सलमान खुर्शिद यांनी म्हटलं आहे.  

एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये बोलताना काँग्रेस नेत सलमान खुर्शिद म्हणाले की, काश्मीरमध्ये सारं काही सामान्य दिसत आहे. येथेही सर्वकाही आलबेल आहे, असं वाटू शकतं. आपण विजयाचा आनंद साजरा करत आहोत. मात्र २०२४ मधील विजय किंवा यश हे अगदीच किरकोळ असेल, अजून बरंच काही करणं बाकी आहे. खरं सांगायचं झाल्यास येथे खाली खूप काही आहे. बांगलादेशमध्ये जे घडत आहे, ते भारतामध्येही घडू शकते. आपल्या देशामध्ये जो प्रसार होत आहे, तो बांगलादेशप्रमाणे घडणाऱ्या गोष्टींना पसरण्यापासून रोखत आहे.

सलमान खुर्शिद यांनी पुढे सांगितलं की, दक्षिण पूर्व दिल्लीमधील शाहीनबाह येथे महिलांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या सीएए-एनआरसीविरोधातील आंदोलन जवळपास १०० दिवस चाललं, त्या आंदोलनाने देशाला अशा प्रकारचं आंदोलन करण्याची प्रेरणा दिली.  मात्र हे एक अयशस्वी आंदोलन ठरले, कारण यामध्ये सहभागी होणारे अनेकजण अद्याप तुरुंगात आहेत. आज देशामध्ये शाहीनबागसारखं दुसरं आंदोलन होऊ शकत नाही. 

मी शाहीनबाग आंदोलन अयशस्वी झालं, असं म्हटल्यास तुम्हाला वाईट वाटेल? आपल्यापैकी अनेकजण शाहीन बाग आंदोलन यशस्वी झालं, असं मानतात. मात्र शाहिनबागशी संबंधित लोकांसोबत काय घडतंय हे मला माहिती आहे. त्यामधील किती लोक अद्याप तुरुंगात आहेत?  त्यामधील कितीजणांना जामीन मिळत नाही? यामधील किती लोकांनी देशाचं शत्रू ठरवण्यात आलं आहे, हे मला माहिती आहे. 

टॅग्स :salman khurshidसलमान खुर्शिदcongressकाँग्रेसBangladeshबांगलादेशIndiaभारत