शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

शरद पवारांच्या मनात चाललंय काय?; १८ विरोधी पक्षाच्या मोर्चात ठाकरे सहभागी पण NCP नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 11:15 IST

विशेष म्हणजे देशातील विरोधी पक्षातील मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनं सहभाग घेतला नाही.

नवी दिल्ली - संसदेचं अधिवेशन दिल्लीत सुरू असून विरोधी पक्षांकडून सरकारला घेरण्याची एकही संधी सोडली जात नाही. बुधवारी दुपारी विरोधी पक्षातील नेत्यांनी अदानी हिंडनबर्ग प्रकरणात तपासाठी दबाव बनवण्यासाठी आणि सत्ताधारी भाजपावर निशाणा साधण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय तपास यंत्रणांचा होणारा दुरुपयोग यावर विरोधी पक्षांनी लक्ष्य ठेवून ईडीच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. 

विशेष म्हणजे देशातील विरोधी पक्षातील मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनं सहभाग घेतला नाही. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे विरोधी पक्षाच्या मोर्चात सहभागी होते. दिल्लीत संसदेपासून निघालेला मोर्चा दिल्ली पोलिसांनी वाटेतच अडवला त्यामुळे विरोधी नेत्यांना संसदेत पुन्हा परतावं लागले. विरोधी पक्षाने ईडी अधिकाऱ्यांकडे भेटण्याची वेळ मागितली असून लवकरच संयुक्त निवेदन जारी केले जाईल असं म्हटलं आहे. 

विरोधी पक्षांच्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसनं गैरहजेरी लावली त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. एकीकडे नागालँड इथं भाजपा-एनडीपीपी युतीला राष्ट्रवादीने न मागता पाठिंबा दिला. त्यामुळे महाराष्ट्रात त्याचे पडसाद पाहायला मिळाले. राष्ट्रवादीनं भाजपाला पाठिंबा दिला असा सूर राज्यात उमटला. परंतु आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला भाजपाला नाही असा बचावात्मक पवित्रा राष्ट्रवादीने घेतला. त्यानंतर बुधवारच्या विरोधी पक्षाच्या मोर्चात राष्ट्रवादीने गैरहजेरी लावली त्यामुळे शरद पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. 

दरम्यान, विरोधी पक्षांचा मोर्चा आवश्यक असून ईडी कार्यालयाकडे आम्ही निवेदन सादर करू. देशातील भाजपा ज्या प्रकारे आपल्या राजकीय विरोधकांना टार्गेट करत आहे. हे पाहिल्यावर सत्तेतील लोक दुधात धुतले आहेत ते आमच्या सारख्या प्रश्न विचारणाऱ्यांना टार्गेट करतात. त्यासाठी हा मोर्चा आवश्यक आहे असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मांडले होते. 

जेपीसीची मागणी काँग्रेससह विरोधी पक्षातील इतरांनी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) मार्फत अदानी यांच्या चौकशीचा आग्रह धरला. जेपीसी चौकशीची विरोधकांची मागणी आणि राहुल गांधी यांच्या लंडनमधील वक्तव्यावर केंद्र सरकारची आक्रमक भूमिका यामुळे संसदेत गोंधळ उडाला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या तीन दिवसांत वारंवार व्यत्यय आणि वारंवार तहकूब करण्यात आले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाcongressकाँग्रेस