शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

शरद पवारांच्या मनात चाललंय काय?; १८ विरोधी पक्षाच्या मोर्चात ठाकरे सहभागी पण NCP नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 11:15 IST

विशेष म्हणजे देशातील विरोधी पक्षातील मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनं सहभाग घेतला नाही.

नवी दिल्ली - संसदेचं अधिवेशन दिल्लीत सुरू असून विरोधी पक्षांकडून सरकारला घेरण्याची एकही संधी सोडली जात नाही. बुधवारी दुपारी विरोधी पक्षातील नेत्यांनी अदानी हिंडनबर्ग प्रकरणात तपासाठी दबाव बनवण्यासाठी आणि सत्ताधारी भाजपावर निशाणा साधण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय तपास यंत्रणांचा होणारा दुरुपयोग यावर विरोधी पक्षांनी लक्ष्य ठेवून ईडीच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. 

विशेष म्हणजे देशातील विरोधी पक्षातील मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनं सहभाग घेतला नाही. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे विरोधी पक्षाच्या मोर्चात सहभागी होते. दिल्लीत संसदेपासून निघालेला मोर्चा दिल्ली पोलिसांनी वाटेतच अडवला त्यामुळे विरोधी नेत्यांना संसदेत पुन्हा परतावं लागले. विरोधी पक्षाने ईडी अधिकाऱ्यांकडे भेटण्याची वेळ मागितली असून लवकरच संयुक्त निवेदन जारी केले जाईल असं म्हटलं आहे. 

विरोधी पक्षांच्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसनं गैरहजेरी लावली त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. एकीकडे नागालँड इथं भाजपा-एनडीपीपी युतीला राष्ट्रवादीने न मागता पाठिंबा दिला. त्यामुळे महाराष्ट्रात त्याचे पडसाद पाहायला मिळाले. राष्ट्रवादीनं भाजपाला पाठिंबा दिला असा सूर राज्यात उमटला. परंतु आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला भाजपाला नाही असा बचावात्मक पवित्रा राष्ट्रवादीने घेतला. त्यानंतर बुधवारच्या विरोधी पक्षाच्या मोर्चात राष्ट्रवादीने गैरहजेरी लावली त्यामुळे शरद पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. 

दरम्यान, विरोधी पक्षांचा मोर्चा आवश्यक असून ईडी कार्यालयाकडे आम्ही निवेदन सादर करू. देशातील भाजपा ज्या प्रकारे आपल्या राजकीय विरोधकांना टार्गेट करत आहे. हे पाहिल्यावर सत्तेतील लोक दुधात धुतले आहेत ते आमच्या सारख्या प्रश्न विचारणाऱ्यांना टार्गेट करतात. त्यासाठी हा मोर्चा आवश्यक आहे असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मांडले होते. 

जेपीसीची मागणी काँग्रेससह विरोधी पक्षातील इतरांनी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) मार्फत अदानी यांच्या चौकशीचा आग्रह धरला. जेपीसी चौकशीची विरोधकांची मागणी आणि राहुल गांधी यांच्या लंडनमधील वक्तव्यावर केंद्र सरकारची आक्रमक भूमिका यामुळे संसदेत गोंधळ उडाला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या तीन दिवसांत वारंवार व्यत्यय आणि वारंवार तहकूब करण्यात आले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाcongressकाँग्रेस