शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Property: ED, IT च्या धाडींमध्ये जप्त करण्यात आलेल्या कोट्यवधीच्या संपत्तीचं पुढे काय होतं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 16:26 IST

Property seized in ED, IT Raids: इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआय यांच्याकडून घालण्यात येणाऱ्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आलेल्या ऐवजाचं नंतर काय होतं, हा पैसा कुठे जातो, त्यावर कुणाची मालकी होते, याचा विचार तुम्ही कधी केलाय का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

आपल्याकडे प्राप्तिकर विभाग (इन्कम टॅक्स), सीबीआय, ईडी आधी संस्थांकडून घालण्यात येणाऱ्या धाडींच्या बातम्या सातत्याने येत असतात. तुम्हीही हजारो कोटींच्या नोटा, दागदागिने जप्त केल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या आणि पाहिल्याही असतील, मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आलेल्या ऐवजाचं नंतर काय होतं, हा पैसा कुठे जातो, त्यावर कुणाची मालकी होते, याचा विचार तुम्ही कधी केलाय का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

२०१९ मध्ये प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्ट लागू झाल्यापासून देशभरात ईडीकडून होणारी छापेमारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परदेशातून गैरमार्गाने पैसे कमावण्याचा विषय असो वा हवालाच्या माध्यमातून होणारी देवाणघेवाण असो. ईडी प्रत्येक केस आपल्या हातात घेते. एका अंदाजानुसार ईडीने आतापर्यंत देशभरात केलेल्या छापेमारीमधून १.०४ लाख कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. तर शेकडो किलो सोने आणि चांदीचे दागदागिनेसुद्धा जप्त करण्यात आले आहेत.

ईडी किंवा सीबीआय जेव्हा कुणावरही छापेमारीची कारवाई करते, तेव्हा जप्त केलेले सामान, रुपये, दागदागिने स्थावर आणि जंगम मालमत्ता यांचा पंचनामा केला जातो. तसेच सर्व वस्तूंची यादी बनवून ती आपल्या ताब्यात घेते. पंचनामा आणि जप्त केलेल्या वस्तूंच्या यादीवर ज्याच्याकडे धाड टाकण्यात आली आहे, त्या व्यक्तीची सही घेतली जाते. सोबतच दोन साक्षीदारांच्या सह्याही घेतल्या जातात.

ईडीकडून जप्त करण्यात आलेली संपत्ती सरकारच्या वेअरहाऊसमध्ये ठेवली जाते. अनेकदा जप्त केलेले पैसे रिझर्व्ह बँक किंवा एसबीआयमध्ये सरकारच्या खात्यात जमा केले जातात. त्यामुळे ते पैसे खराब होण्याची शक्यता उरत नाही. ईडी जप्त केलेले पैसे आणि संपत्ती कमाल १८० दिवसांपर्यंतच आपल्याकडे ठेवू शकते. यादरम्यान, त्यांना कोर्टामध्ये या संपत्तीशी संबंधित आरोप योग्य असल्याचे सिद्ध करावे लागते.

जप्त केलेल्या संपत्तीशी संबंधित आरोप सहा महिन्यांच्या आत सिद्ध करावेत, यासाठई ईडीवर दबाव असतो. कोर्टात आरोप योग्य असल्याचे सिद्ध झाल्यावर संपत्ती सरकारजवळ जमा होते. जर इडीला हे आरोप सिद्ध करण्यात अपयश आलं तर संपत्ती ज्याच्यावर कारवाई करून जप्त करण्याल आलेली होती त्या व्यक्तीला परत दिली जाते. जर प्रकरण केंद्र सरकारशी संबंधित असेल तर पैसे केंद्र सरकारच्या खात्यामध्ये जमा केले जातात. तर राज्याशी संबंधित विषय असल्यास ही रक्कम राज्याच्या खात्यात जमा केली जाते. काही प्रकरणांमध्ये कोर्ट जप्त केलेले पैसे दंडात्मक कारवाई करून संबंधित व्यक्तीला परत करते.

मात्र जप्त केलेली संपत्ती त्याने वैध मार्गाने मिळवलेली आहे, हे तो सिद्ध करतो तेव्हाच ही संपत्ती त्या व्यक्तीला परत दिली जाते. कमर्शियल संपत्तीच्या बाबतीत कायदा थोडा सौम्य भूमिका घेतो. तसेच जप्तीची कारवाई झाल्यानंतरही प्रकरण कोर्टात असेपर्यंत या संपत्तीचा वापर करता येतो.  

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCBIगुन्हा अन्वेषण विभागMONEYपैसा