शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

असे काय घडले, ज्यामुळे नितीश कुमार पुन्हा भाजपसाेबत गेले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 06:52 IST

Nitish Kumar: प्राण गेले तरी चालतील, मात्र भाजपसाेबत पुन्हा जाणे मान्य नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले होते. या वक्तव्याला अजून एक वर्षही पूर्ण व्हायचे आहे. मात्र, नितीशकुमार यांनी पुन्हा भाजपचीच साथ घेत मुख्यमंत्रिपदाची नव्याने शपथ घेतली.

]पाटणा : प्राण गेले तरी चालतील, मात्र भाजपसाेबत पुन्हा जाणे मान्य नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले होते. या वक्तव्याला अजून एक वर्षही पूर्ण व्हायचे आहे. मात्र, नितीशकुमार यांनी पुन्हा भाजपचीच साथ घेत मुख्यमंत्रिपदाची नव्याने शपथ घेतली. गेल्या काही दिवसांपासून अशा घडामाेडींबाबत जाेरदार चर्चा सुरू हाेती.

 इंडिया आघाडीत ते खूश नव्हते. तसेच पक्षात फुटीची भीती, ही दाेन मुख्य कारणे नितीश कुमारांच्या पुन्हा भाजपसाेबत जाण्यामागे बाेलली जात आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले हाेते आणि नितीश कुमार मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले हाेते. मात्र, दीड वर्षांपूर्वी लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडीसाेबत महाआघाडीत सहभागी हाेत नितीश कुमार यांनी सरकार स्थापन केले. ही आघाडी पुन्हा एकदा नितीशकुमार यांनी ताेडली. जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने आयाेजित भाेजन समारंभात ते पंतप्रधान नरेंद्र माेदींना भेटले आणि तेथून त्यांची भूमिका बदलताना पाहायला मिळाली.

कशामुळे पुन्हा एनडीएमध्ये वापसी?लाेकसभेच्या आगामी निवडणुकीत अपेक्षित यश मिळणार नाही, असे पक्षातील नेत्यांना वाटत हाेते. गेल्या निवडणुकीत जेडीयूचे १६ खासदार निवडून गेले हाेते. यावेळी तेवढे यश मिळू शकणार नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच जागावाटपामध्ये जेडीयूच्या वाट्याला किती जागा मिळतील, याचीही खात्री नव्हती. 

पक्षफुटीची भीतीजेडीयूचे माजी अध्यक्ष राजीव रंजन सिंह यांना वगळता पक्षातील बहुतांश ज्येष्ठ नेते भाजपसाेबत युती करण्याच्या बाजूने हाेते. जेडीयूचे किमान ७-८ खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे लाेकसभा निवडणुकीपूर्वीच पक्षात फूट पडण्याची भीती हाेती. 

‘इंडिया’ आघाडीत अपेक्षाभंग?विराेधी पक्षांची इंडिया आघाडी स्थापन करण्यात नितीश कुमार यांची प्रमुख भूमिका हाेती. विराेधी पक्षांची पहिली बैठक त्यांनीच पाटण्यात आयाेजित केली हाेती. मात्र, इंडिया आघाडीत त्यांना अपेक्षित महत्त्व न मिळाल्याने ते नाराज हाेते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

तेजस्वी यांच्यासाठी लालुंचा वाढता दबावबिहारमध्ये घेण्यात आलेल्या प्रत्येक निर्णयाचे श्रेय आरजेडी घेण्याचा प्रयत्न करीत हाेती. त्यातच तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी लालूप्रसाद यादव यांचा नितीश कुमार यांच्यावर दबाव वाढत हाेता.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारBJPभाजपाRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल