शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

असे काय घडले, ज्यामुळे नितीश कुमार पुन्हा भाजपसाेबत गेले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 06:52 IST

Nitish Kumar: प्राण गेले तरी चालतील, मात्र भाजपसाेबत पुन्हा जाणे मान्य नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले होते. या वक्तव्याला अजून एक वर्षही पूर्ण व्हायचे आहे. मात्र, नितीशकुमार यांनी पुन्हा भाजपचीच साथ घेत मुख्यमंत्रिपदाची नव्याने शपथ घेतली.

]पाटणा : प्राण गेले तरी चालतील, मात्र भाजपसाेबत पुन्हा जाणे मान्य नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले होते. या वक्तव्याला अजून एक वर्षही पूर्ण व्हायचे आहे. मात्र, नितीशकुमार यांनी पुन्हा भाजपचीच साथ घेत मुख्यमंत्रिपदाची नव्याने शपथ घेतली. गेल्या काही दिवसांपासून अशा घडामाेडींबाबत जाेरदार चर्चा सुरू हाेती.

 इंडिया आघाडीत ते खूश नव्हते. तसेच पक्षात फुटीची भीती, ही दाेन मुख्य कारणे नितीश कुमारांच्या पुन्हा भाजपसाेबत जाण्यामागे बाेलली जात आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले हाेते आणि नितीश कुमार मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले हाेते. मात्र, दीड वर्षांपूर्वी लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडीसाेबत महाआघाडीत सहभागी हाेत नितीश कुमार यांनी सरकार स्थापन केले. ही आघाडी पुन्हा एकदा नितीशकुमार यांनी ताेडली. जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने आयाेजित भाेजन समारंभात ते पंतप्रधान नरेंद्र माेदींना भेटले आणि तेथून त्यांची भूमिका बदलताना पाहायला मिळाली.

कशामुळे पुन्हा एनडीएमध्ये वापसी?लाेकसभेच्या आगामी निवडणुकीत अपेक्षित यश मिळणार नाही, असे पक्षातील नेत्यांना वाटत हाेते. गेल्या निवडणुकीत जेडीयूचे १६ खासदार निवडून गेले हाेते. यावेळी तेवढे यश मिळू शकणार नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच जागावाटपामध्ये जेडीयूच्या वाट्याला किती जागा मिळतील, याचीही खात्री नव्हती. 

पक्षफुटीची भीतीजेडीयूचे माजी अध्यक्ष राजीव रंजन सिंह यांना वगळता पक्षातील बहुतांश ज्येष्ठ नेते भाजपसाेबत युती करण्याच्या बाजूने हाेते. जेडीयूचे किमान ७-८ खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे लाेकसभा निवडणुकीपूर्वीच पक्षात फूट पडण्याची भीती हाेती. 

‘इंडिया’ आघाडीत अपेक्षाभंग?विराेधी पक्षांची इंडिया आघाडी स्थापन करण्यात नितीश कुमार यांची प्रमुख भूमिका हाेती. विराेधी पक्षांची पहिली बैठक त्यांनीच पाटण्यात आयाेजित केली हाेती. मात्र, इंडिया आघाडीत त्यांना अपेक्षित महत्त्व न मिळाल्याने ते नाराज हाेते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

तेजस्वी यांच्यासाठी लालुंचा वाढता दबावबिहारमध्ये घेण्यात आलेल्या प्रत्येक निर्णयाचे श्रेय आरजेडी घेण्याचा प्रयत्न करीत हाेती. त्यातच तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी लालूप्रसाद यादव यांचा नितीश कुमार यांच्यावर दबाव वाढत हाेता.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारBJPभाजपाRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल