शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

असे काय घडले, ज्यामुळे नितीश कुमार पुन्हा भाजपसाेबत गेले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 06:52 IST

Nitish Kumar: प्राण गेले तरी चालतील, मात्र भाजपसाेबत पुन्हा जाणे मान्य नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले होते. या वक्तव्याला अजून एक वर्षही पूर्ण व्हायचे आहे. मात्र, नितीशकुमार यांनी पुन्हा भाजपचीच साथ घेत मुख्यमंत्रिपदाची नव्याने शपथ घेतली.

]पाटणा : प्राण गेले तरी चालतील, मात्र भाजपसाेबत पुन्हा जाणे मान्य नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले होते. या वक्तव्याला अजून एक वर्षही पूर्ण व्हायचे आहे. मात्र, नितीशकुमार यांनी पुन्हा भाजपचीच साथ घेत मुख्यमंत्रिपदाची नव्याने शपथ घेतली. गेल्या काही दिवसांपासून अशा घडामाेडींबाबत जाेरदार चर्चा सुरू हाेती.

 इंडिया आघाडीत ते खूश नव्हते. तसेच पक्षात फुटीची भीती, ही दाेन मुख्य कारणे नितीश कुमारांच्या पुन्हा भाजपसाेबत जाण्यामागे बाेलली जात आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले हाेते आणि नितीश कुमार मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले हाेते. मात्र, दीड वर्षांपूर्वी लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडीसाेबत महाआघाडीत सहभागी हाेत नितीश कुमार यांनी सरकार स्थापन केले. ही आघाडी पुन्हा एकदा नितीशकुमार यांनी ताेडली. जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने आयाेजित भाेजन समारंभात ते पंतप्रधान नरेंद्र माेदींना भेटले आणि तेथून त्यांची भूमिका बदलताना पाहायला मिळाली.

कशामुळे पुन्हा एनडीएमध्ये वापसी?लाेकसभेच्या आगामी निवडणुकीत अपेक्षित यश मिळणार नाही, असे पक्षातील नेत्यांना वाटत हाेते. गेल्या निवडणुकीत जेडीयूचे १६ खासदार निवडून गेले हाेते. यावेळी तेवढे यश मिळू शकणार नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच जागावाटपामध्ये जेडीयूच्या वाट्याला किती जागा मिळतील, याचीही खात्री नव्हती. 

पक्षफुटीची भीतीजेडीयूचे माजी अध्यक्ष राजीव रंजन सिंह यांना वगळता पक्षातील बहुतांश ज्येष्ठ नेते भाजपसाेबत युती करण्याच्या बाजूने हाेते. जेडीयूचे किमान ७-८ खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे लाेकसभा निवडणुकीपूर्वीच पक्षात फूट पडण्याची भीती हाेती. 

‘इंडिया’ आघाडीत अपेक्षाभंग?विराेधी पक्षांची इंडिया आघाडी स्थापन करण्यात नितीश कुमार यांची प्रमुख भूमिका हाेती. विराेधी पक्षांची पहिली बैठक त्यांनीच पाटण्यात आयाेजित केली हाेती. मात्र, इंडिया आघाडीत त्यांना अपेक्षित महत्त्व न मिळाल्याने ते नाराज हाेते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

तेजस्वी यांच्यासाठी लालुंचा वाढता दबावबिहारमध्ये घेण्यात आलेल्या प्रत्येक निर्णयाचे श्रेय आरजेडी घेण्याचा प्रयत्न करीत हाेती. त्यातच तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी लालूप्रसाद यादव यांचा नितीश कुमार यांच्यावर दबाव वाढत हाेता.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारBJPभाजपाRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल