शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांचं काय झालं ?, शुद्धीवर येताच मेजर अभिजीत यांनी विचारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 17:27 IST

सुंजवां येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले मेजर अभिजित शुद्धीवर आले आहेत. शुद्धीवर येताच त्यांनी दहशतवाद्यांचे काय झाले, असा प्रश्न उपस्थितांना विचारला आहे.

जम्मू-काश्मीर- सुंजवां येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले मेजर अभिजीत शुद्धीवर आले आहेत. शुद्धीवर येताच त्यांनी दहशतवाद्यांचे काय झाले, असा प्रश्न उपस्थितांना विचारला आहे. शनिवारी पहाटे जम्मूतील सुंजवां इथल्या लष्करी तळावर लष्कराच्या वेषात आलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात पाच जवान शहीद झालेत. लष्कराच्या जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय, हा हल्ला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केल्याचं उघड झालं होतं.सुंजवां इथल्या दहशतवादी हल्ल्यात मेजर अभिजीत जखमी झाले होते. त्यांच्यावर उधमपूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे शुद्धीत आल्यावर त्यांनी परिवार किंवा इतरांबद्दल काही विचारले नाही. स्वतः हल्ल्यात किती जखमी झाले आहेत, कुठला अवयव तर निकामी झाला नाही ना, अशा प्रकारेच प्रश्न न विचारता थेट दहशतवाद्यांचं काय झालं, असं विचारल्यामुळे त्यांच्या देशप्रेमानं सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. मला आता थोटं बरं वाटतं आहे. मी वारंवार डॉक्टरांशी संवाद साधतो आहे. येत्या दोन दिवसांत मी बसायला आणि चालायला लागेन. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये काय घडतंय, याबाबत मला काहीही कल्पना नाही, असंही मेजर अभिजित म्हणाले आहेत. त्यामुळे सीमा रेषेवर दहशतवाद्यांबरोबरच शेजारील सैन्याशी लढणा-या जवानांची भावना काय असते, हेसुद्धा स्पष्ट झालं आहे.जम्मूमधील सुंजवां लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला काही तासांतच दहशतवाद्यांनी काल पहाटे करणनगर येथील कॅम्पला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु सतर्क जवानांनी त्यांचा डाव उधळून लावला. त्यानंतर तिथून पळ काढणारे दहशतवादी कॅम्पजवळच्याच इमारतीत लपले असून त्यांच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला. भारतीय लष्कराने इमारतीला वेढा घातला असून ते दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहेत. पण श्रीनगरमध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे जवानांचं काम आणखी कठीण झालं होतं. अखेर जवानांनी त्या दहशतवाद्यांना 30 तासांनंतर कंठस्नान घातलं आहे. 

टॅग्स :Sunjuwan attackसुंजवा दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्ला