शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 16:14 IST

Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात प्रचंड मतदान झाले. वाढलेल्या मतदानाचे वेगवेगळे अर्थ काढले जाताहेत. अंदाज मांडले जाताहेत. याबद्दल प्रशांत किशोर यांनी त्यांचे गणित मांडले आहे. 

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान पार पडले. मागील अनेक निवडणुकांत इतकं मतदान झालेले नाही. त्यामुळे याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहे. अंदाज मांडले जात आहे. या वाढलेल्या मतदानाच्या टक्क्याबद्दल प्रशांत किशोर यांनाही विचारण्यात आले. त्यांनी टक्का का वाढला आणि कोणता फॅक्टर महत्त्वाचा ठरला याबद्दलचे गणित मांडले.  

प्रशाांत किशोर म्हणाले, "३० वर्षांमध्ये नाही, स्वातंत्र्यानंतर बिहारमध्ये झालेल्या निवडणुकांमधील हे सर्वात जास्त मतदान आहे. यातून दोन गोष्टी दिसत आहे की, पहिले म्हणजे जी गोष्ट मी मागील एक-दोन वर्षांपासून सांगत आहे की, बिहारमध्ये सात टक्क्यांहून अधिक जनतेला बदल हवा आहे. मागील २५-३० वर्षात राजकीय पर्यायाअभावी राजकारण आणि निवडणुकीबद्दल उदासीनता तयार झाली होती. लोकांकडे पर्याय नव्हता. आता जन सुराज्य पक्ष आल्यामुळे लोकांना पर्याय मिळाला आहे. वाढलेला जो मतांचा टक्का आहे, बदल घडवण्यासाठी मतदान झाले आहे. 

कोणता फॅक्टर ठरला महत्त्वाचा

"दुसरा मुद्दा म्हणजे जे स्थलांतरित कामगार आहेत, जे छट सणानंतर थांबलेले आहेत. त्यांनी स्वतःचे, कुटुंबाचे आणि मित्रपरिवाराला मतदान करायला लावले आहे. त्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. जितके लोक म्हणत होते की, महिलांना दहा हजार दिले, त्यामुळे आम्ही जिंकू. पण, या निवडणुकीत महिला मतदार आहेच, पण त्यापेक्षा मोठा स्थलांतरित मजूर हा महत्त्वाचा फॅक्टर आहे", असे विश्लेषण प्रशांत किशोर यांनी केले. 

२ कोटी १० लाखांहून अधिक मतदान

"तुम्ही बघाल की, १४ नोव्हेंबरला इतिहास लिहिला जाईल. मोठंमोठे राजकीय पंडित हे सांगत नव्हते की, यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान होईल. २ कोटी १० लाखांहून अधिक मतदारांनी मतदान केलं आहे. अंदाज मांडणारे किती लोकांना भेटले असतील. कुणालाही माहिती नाही की, कुणी कुणाला मतदान केले. १४ तारखेला मतमोजणी होईल आणि तेव्हाच कळेल", असे प्रशांत किशोर म्हणाले. 

"इथे कोणीही सुरक्षित नाहीये. कायद्याचे राज्य नाहीये. ज्याची लाठी, त्याची म्हैस. जे आतापर्यंत लोकांना सहन करावं लागत होतं. निवडणुकीच्या काळात मंत्री आणि नेत्यांना त्याला सामोरे जावे लागले आहे", असेही प्रशांत किशोर यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar's Increased Voter Turnout: Prashant Kishor Explains the Factors

Web Summary : Prashant Kishor attributes Bihar's record voter turnout to a desire for change and the influence of migrant workers. He highlights voter frustration with limited political options and the significant impact of returning laborers participating in the election process.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Prashant Kishoreप्रशांत किशोरNitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादव