शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

26/11चे पुरावे दिले, काय कारवाई केली?; सीतारामन यांचा पाकिस्तानला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 21:49 IST

संरक्षणमंत्र्यांकडून पाकिस्तानचा खरपूस समाचार

नवी दिल्ली: पुलवामासारखा दहशतवादी हल्ला पुन्हा होऊ नये यासाठी आवश्यक ती पावलं उचलू, असं संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं. पुलवामातील हल्ल्यानंतर आम्ही माहिती गोळा करत आहोत, असं त्या म्हणाल्या. मात्र याबद्दल अधिक काही बोलण्यास त्यांनी नकार दिला. बंगळुरुत उद्यापासून एअर शो सुरू होणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला सीतारामन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. 2008 मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचा हात होता. त्याचे पुरावेदेखील तत्कालीन सरकारनं पाकिस्तानला दिले होते. त्याचं पाकिस्ताननं काय केलं, असा सवाल सीतारामन यांनी विचारला. 'दहा वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात होता. त्यावेळी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया भारतानं पाळली. हल्ल्यातील पाकिस्तानचा सहभाग दाखवणारे सर्व पुरावे दिले. भारतानं दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडलं. या प्रकरणाचा खटला भारतात चालवण्यात आला. कसाबला शिक्षा सुनावली गेली. मात्र पाकिस्तानच्या कनिष्ठ न्यायालयानंदेखील या प्रकरणात काहीच केलं नाही. त्यामुळे याबद्दल पाकिस्तानकडे बोलण्यासारखं काहीच नाही,' असं सीतारामन म्हणाल्या. मुंबईवरील हल्ल्यानंतर तत्कालीन सरकारनं सर्व पुरावे पाकिस्तानला दिले. आमच्या सरकारनंही आवश्यक ते सर्व पुरावे पाकिस्तान सरकारकडे सुपूर्द केलं. मात्र त्यांनी काय कारवाई केली, असा प्रश्न संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तानला विचारला. भारताकडून पाकिस्तानवर बेछूट आरोप केले जात आहेत, असा दावा इम्रान खान यांनी केला होता. याबद्दलच्या प्रश्नावर भाष्य करण्यास सीतारामन यांनी नकार दिला. संपूर्ण देशात आज संतापाची लाट आहे. प्रत्येक देशवासीयाच्या मनात प्रचंड राग आहे. हा राग व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. पाकिस्तानला जे काही उत्तर द्यायचं आहे, ते आता सैन्याकडून दिलं जाईल. त्यासाठी सैन्याला संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. त्यामुळे योग्य ती कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाImran Khanइम्रान खान26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनPakistanपाकिस्तान