शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

रामनवमी हिंसाचाराची चौकशी NIA द्वारे व्हावी, भाजपा नेत्याचे राज्यपालांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 12:58 IST

West Bengal Ram Navami clashes : मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीबाबत भाजपाने पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांना पत्र लिहिले आहे.

West Bengal Ram Navami clashes:  पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात बुधवारी रामनवमीनिमित्त आयोजित मिरवणुकीवर दगडफेक झाली. या घटनेवरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीबाबत भाजपाने पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांना पत्र लिहिले आहे. मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीची चौकशी 'राष्ट्रीय तपास यंत्रणे' (NIA) द्वारे करण्यात यावी, असे भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच या मुद्द्यावरून सुवेंदू अधिकारी यांनी राज्यातील टीएमसी सरकारलाही धारेवर धरले आहे.

सुवेंदू अधिकारी यांनी पत्रात लिहिले आहे की, "मला तुम्हाला (राज्यपालांना) पश्चिम बंगालमधील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेची जाणीव करून द्यायची आहे. बंगालमध्ये सण साजरे करणाऱ्या हिंदूंवर हल्ले करून जातीय तेढ निर्माण करण्याची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. राज्यात धार्मिक सण साजरे करणाऱ्या हिंदूंवर दगडफेक आणि बॉम्ब फेकणे ही एक सामान्य घटना बनत चालली आहे. २०२३ मध्ये सुद्धा अशा प्रकारची घटना पाहायला मिळाली. यावर्षी देखील मुर्शिदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आहे."

भाजपा नेते सुवेंदू अधिकारी पुढे म्हणाले की, "मुर्शिदाबादमध्ये एका विशिष्ट समुदायाने हल्ला केला होता. कारवाई करण्याऐवजी तेथे उपस्थित पोलिसांनी मिरवणुकीवरच अश्रुधुराचे नळकांडे डागले, जेणेकरून आरोपींना वाचवता येईल. माझी तुम्हाला (राज्यपाल) विनंती आहे की, तुम्ही प्रभावित भागांना भेट द्या आणि तेथील तणाव समजून घ्या, या प्रकरणाची NIA मार्फत चौकशी करण्यात यावी, कारण दगडफेकीसोबतच मिरवणुकीवर बॉम्बही फेकण्यात आले आहेत."

परिसरात कलम १४४ लागू दरम्यान, मुर्शिदाबादच्या शक्तीपूर भागात रामनवमीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली, ज्यात २० जण जखमी झाले. या घटनेचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये काही लोक आपल्या घराच्या छतावरून मिरवणुकीवर दगडफेक करत असल्याचे दिसत आहेत. मिरवणुकीदरम्यान स्फोट झाला, त्यात एक महिला जखमी झाली. हा बॉम्बस्फोट होता की अन्य काही कारणामुळे झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालRam Navamiराम नवमी