शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

रामनवमी हिंसाचाराची चौकशी NIA द्वारे व्हावी, भाजपा नेत्याचे राज्यपालांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 12:58 IST

West Bengal Ram Navami clashes : मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीबाबत भाजपाने पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांना पत्र लिहिले आहे.

West Bengal Ram Navami clashes:  पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात बुधवारी रामनवमीनिमित्त आयोजित मिरवणुकीवर दगडफेक झाली. या घटनेवरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीबाबत भाजपाने पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांना पत्र लिहिले आहे. मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीची चौकशी 'राष्ट्रीय तपास यंत्रणे' (NIA) द्वारे करण्यात यावी, असे भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच या मुद्द्यावरून सुवेंदू अधिकारी यांनी राज्यातील टीएमसी सरकारलाही धारेवर धरले आहे.

सुवेंदू अधिकारी यांनी पत्रात लिहिले आहे की, "मला तुम्हाला (राज्यपालांना) पश्चिम बंगालमधील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेची जाणीव करून द्यायची आहे. बंगालमध्ये सण साजरे करणाऱ्या हिंदूंवर हल्ले करून जातीय तेढ निर्माण करण्याची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. राज्यात धार्मिक सण साजरे करणाऱ्या हिंदूंवर दगडफेक आणि बॉम्ब फेकणे ही एक सामान्य घटना बनत चालली आहे. २०२३ मध्ये सुद्धा अशा प्रकारची घटना पाहायला मिळाली. यावर्षी देखील मुर्शिदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आहे."

भाजपा नेते सुवेंदू अधिकारी पुढे म्हणाले की, "मुर्शिदाबादमध्ये एका विशिष्ट समुदायाने हल्ला केला होता. कारवाई करण्याऐवजी तेथे उपस्थित पोलिसांनी मिरवणुकीवरच अश्रुधुराचे नळकांडे डागले, जेणेकरून आरोपींना वाचवता येईल. माझी तुम्हाला (राज्यपाल) विनंती आहे की, तुम्ही प्रभावित भागांना भेट द्या आणि तेथील तणाव समजून घ्या, या प्रकरणाची NIA मार्फत चौकशी करण्यात यावी, कारण दगडफेकीसोबतच मिरवणुकीवर बॉम्बही फेकण्यात आले आहेत."

परिसरात कलम १४४ लागू दरम्यान, मुर्शिदाबादच्या शक्तीपूर भागात रामनवमीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली, ज्यात २० जण जखमी झाले. या घटनेचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये काही लोक आपल्या घराच्या छतावरून मिरवणुकीवर दगडफेक करत असल्याचे दिसत आहेत. मिरवणुकीदरम्यान स्फोट झाला, त्यात एक महिला जखमी झाली. हा बॉम्बस्फोट होता की अन्य काही कारणामुळे झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालRam Navamiराम नवमी