शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

'चलो दिल्ली' मोडमध्ये ममता दीदी; दर दोन महिन्याला करणार दिल्ली वारी; 2024 साठी दिली अशी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 16:37 IST

Mamata Banerjee Delhi Visit: ममता म्हणाल्या, मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलले. पुढच्या वेळी त्यांची भेट घेईल. तसेच कोरोनामुळेही अनेक नेत्यांशी भेट होऊ शकली नाही.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पाच दिवसांचा दिल्ली दौरा संपवून आज कोलकात्याला परतत आहेत. यापूर्वी त्या म्हणाल्या, की त्यांनी दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यांचा दिल्ली दौरा यशस्वी झाला आहे. ममता बॅनर्जी विरोधी पक्षांच्या एकतेवर बोलता म्हणाल्या, की आता आपली घोषणा, 'लोकशाही वाचवा, देश वाचवा', अशी आहे.

ममता म्हणाल्या, मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलले. पुढच्या वेळी त्यांची भेट घेईल. तसेच कोरोनामुळेही अनेक नेत्यांशी भेट होऊ शकली नाही. आता मी दर दोन महिन्याला दिल्लीत येईल. याच वेळी ममतांनी कृषी कायदे आणि पेट्रोल डिझेलच्या मुद्द्यावरही भाष्य केले. तसेच शेतकऱ्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असेही त्या म्हणाल्या.

बंगाल निवडणुकीनंतर ममता पहिल्यांदाच 26 जुलैला दिल्लीत आल्या होत्या. यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत कोरोना लस आणि पश्चिम बंगालचे नाव बदलण्यावर चर्चा केली. याच बरोबर त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, कमलनाथ, आनंद शर्मा, अभिषेक मनू सिंघवी, राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आदी नेत्यांचीही भेट घेतली. 

ममता बॅनर्जी 2024 च्या दृष्टीने विरोधी पक्षांना एकत्रित आणण्यावर जोर देत आहेत. सोनिया गांधीची भेट घेतल्यानंतर त्या म्हणाल्या होत्या, सर्व स्थानिक पक्ष एकत्रित आल्यास, एका पक्षाला भारी ठरतील. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची एकजूट आणि चेहरा, यांवर बोलताना त्या म्हणाल्या, मी काही राजकीय ज्योतिषी नाही. त्यावेळच्या स्थितीवर सर्व अवलंबून असेल. जर कुणी दुसऱ्यानेही नेतृत्व केले, तरी समस्या नाही. त्या म्हणाल्या, कुणाला तरी नेतृत्व करावेच लागेल. वेळ आली, की चर्चा करू. मत थोपवण्याची माझी इच्छा नाही. कालच लालू यादवने फोनवर चर्चा केली. आम्ही रोज चर्चा करत आहोत. आणखी तीन वर्ष आहेत. आम्ही चर्चा करत आहोत.

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसwest bengalपश्चिम बंगालSharad Pawarशरद पवारSonia Gandhiसोनिया गांधी