शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

...तर जेलमध्ये राहणं पसंत करेन, ममता बॅनर्जींचा केंद्रावर थेट निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 16:50 IST

पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा जागांवर पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.

 मिदनापूर -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कृषी कायद्यांवरून पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. ममतांनी म्हटले आहे, की भाजप सरकारने लवकरात लवकर कृषी कायदे परत घ्यावेत. अथवा सत्ता सोडावी. पश्चिम मिदनापूर येथे एका रॅलीला संबोधित करताना ममता म्हणाल्या, ‘‘बीजेपीच्या वाईट कारभारावर शांत रहण्याऐवजी अथवा ते सहन करण्याऐवजी, जेलमध्ये राहणे पसंत करेल.’’

ममतांनी दावा केला, की ‘‘भाजप सरकारने लवकरात लवकर कृषी कायदे परत घ्यावेत अथवा सत्ता सोडावी. शेतकऱ्यांच्या अधिकारांवर घाला घातल्यानंतर सत्तेत राहणे योग्य नाही.’’ भाजपला ‘‘बाहेरील लोकांचा पक्ष’’ म्हणत ममतांनी, त्या बंगालमध्ये कधीही भगव्या पक्षाचा कब्जा होऊ देणार नाही, असे म्हटले आहे. एवढेच नाही, तर लोकांनाही आवाहन केले, की त्यांनीही अशा प्रयत्नांना विरोध करावा.

त्या म्हणाल्या, त्यांचा पक्ष तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास, पुढच्या वर्षी जून महिन्यानंतरही मोफत रेशन देण्यात येईल. पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा जागांवर पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.

...त्यांनी तृणमूल सोडले तरी चालेल; निवडणुकीआधी ममता बॅनर्जींनी भरला दम -तत्पूर्वी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील स्थानिक पक्ष असलेल्या तृणमूलमध्ये पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. एक आमदार आधीच भाजपात डेरेदाखल झाला. तर काही दिवसांपूर्वी पक्षाचे संस्थापक सदस्यांपैकी एक आणि ममतांचे मंत्री अधिकारी यांनी राजीनामा दिला होता. त्याच्यासोबतची शिष्टाई यशस्वी ठरल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षातील नेत्यांना दम भरला होता.

ममता यांनी पक्षाच्या कोणत्याही नेत्याचे नाव न घेता, जे लोक पक्ष विरोधी कारवाया करत आहेत, विरोधी पक्षाच्या संपर्कात आहेत ते पक्ष सोडण्यासाठी स्वतंत्र आहेत, असे म्हटले होते. ममता यांनी नाव घेतले नसले तरीही त्यांचा हा इशारा नाराज असलेले नेते शुभेंदू अधिकारी आणि पक्षाच्या विरोधात बोलणारे काही नेते, आमदार यांच्यासाठी होता.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाFarmer strikeशेतकरी संप