शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

...तर जेलमध्ये राहणं पसंत करेन, ममता बॅनर्जींचा केंद्रावर थेट निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 16:50 IST

पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा जागांवर पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.

 मिदनापूर -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कृषी कायद्यांवरून पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. ममतांनी म्हटले आहे, की भाजप सरकारने लवकरात लवकर कृषी कायदे परत घ्यावेत. अथवा सत्ता सोडावी. पश्चिम मिदनापूर येथे एका रॅलीला संबोधित करताना ममता म्हणाल्या, ‘‘बीजेपीच्या वाईट कारभारावर शांत रहण्याऐवजी अथवा ते सहन करण्याऐवजी, जेलमध्ये राहणे पसंत करेल.’’

ममतांनी दावा केला, की ‘‘भाजप सरकारने लवकरात लवकर कृषी कायदे परत घ्यावेत अथवा सत्ता सोडावी. शेतकऱ्यांच्या अधिकारांवर घाला घातल्यानंतर सत्तेत राहणे योग्य नाही.’’ भाजपला ‘‘बाहेरील लोकांचा पक्ष’’ म्हणत ममतांनी, त्या बंगालमध्ये कधीही भगव्या पक्षाचा कब्जा होऊ देणार नाही, असे म्हटले आहे. एवढेच नाही, तर लोकांनाही आवाहन केले, की त्यांनीही अशा प्रयत्नांना विरोध करावा.

त्या म्हणाल्या, त्यांचा पक्ष तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास, पुढच्या वर्षी जून महिन्यानंतरही मोफत रेशन देण्यात येईल. पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा जागांवर पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.

...त्यांनी तृणमूल सोडले तरी चालेल; निवडणुकीआधी ममता बॅनर्जींनी भरला दम -तत्पूर्वी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील स्थानिक पक्ष असलेल्या तृणमूलमध्ये पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. एक आमदार आधीच भाजपात डेरेदाखल झाला. तर काही दिवसांपूर्वी पक्षाचे संस्थापक सदस्यांपैकी एक आणि ममतांचे मंत्री अधिकारी यांनी राजीनामा दिला होता. त्याच्यासोबतची शिष्टाई यशस्वी ठरल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षातील नेत्यांना दम भरला होता.

ममता यांनी पक्षाच्या कोणत्याही नेत्याचे नाव न घेता, जे लोक पक्ष विरोधी कारवाया करत आहेत, विरोधी पक्षाच्या संपर्कात आहेत ते पक्ष सोडण्यासाठी स्वतंत्र आहेत, असे म्हटले होते. ममता यांनी नाव घेतले नसले तरीही त्यांचा हा इशारा नाराज असलेले नेते शुभेंदू अधिकारी आणि पक्षाच्या विरोधात बोलणारे काही नेते, आमदार यांच्यासाठी होता.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाFarmer strikeशेतकरी संप