शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
4
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
5
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
6
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
7
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
8
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
9
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
10
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
11
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
12
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
13
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
14
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
15
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
16
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
17
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
18
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
19
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
20
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण

पश्चिम बंगाल धगधगतोय....एका फेसबूक पोस्टमुळे जातीय हिंसाचार

By admin | Published: July 05, 2017 11:36 AM

एका 17 वर्षीय विद्यार्थ्यांने फेसबूवर धार्मिक स्थळासंबंधी पोस्ट केल्याने तणाव निर्माण झाला होता

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 5 - एका फेसबूक पोस्टमुळे पश्चिम बंगालमध्ये जातीय हिंसाचार सुरु झाला आहे. परिस्थिती हाताबाहेर चालली असून केंद्राने सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना सुरक्षेसाठी पाठवलं आहे. नॉर्थ 24 परगणा येथील ही घटना आहे. शुक्रवारी ही फेसबूक पोस्ट करण्यात आली होती. त्यानंतर नॉर्थ 24 परगणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी लोकांनी एकमेकांवर हल्लेही केले असल्याची माहिती मिळाली आहे. 
 
आणखी वाचा - 
500 रूपयांचा जिओ 4G मोबाइल बाजारात येण्याची शक्यता
त्यांच्या प्रेमाची गोष्ट ! बंगळुरुत "तिने" केलं "तिच्याशी" लग्न
इथेच तुला ठार करेन, GSTला विरोध करणा-या आमदाराला धमकी
 
 
एका 17 वर्षीय विद्यार्थ्यांने शुक्रवारी फेसबूवर धार्मिक स्थळासंबंधी पोस्ट केल्याने तणाव निर्माण झाला होता. हा विद्यार्थी बदुरिया येथील राहणार आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 
 
परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून संतप्त जमावाने अनेक ठिकाणी रस्ते जाम केले होते. तसंच इतर जाती, धर्मातील लोकांवरही हल्ले होत असून, दुकानांची जाळपोळ करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सोमवारी जमावाने कोलकाताजवळील अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वेमार्गावर चक्का जाम आंदोलन केलं. कोलकातापासून 70 किमी अंतरावर सुरु झालेलं आंदोलन इतर ठिकाणी पसरत असून आता नॉर्थ 24 परगणा जिल्ह्यात पोहोचलं आहे. 
 
दरम्यान पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून लोकांना अफवा न पसरवण्याचं तसंच शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. "कृपया अफवा पसरवू नका. सोशल मीडियावरील खोटे मेसेज पसरवणे धोकादायक ठरु शकतं. आपलं शहर शांततामय असून ते राखण्यास मदत करा. संशयित गोष्ट आढळल्यास 100 क्रमांकावर संपर्क साधा" असं पोलिसांनी ट्विट केलं आहे. दरम्यान जातीय हिंसाचारानंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बदुरिया येथील इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली आहे.
 
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांनी फोन करुन परिस्थितीची माहिती घेतली. फोनवरुन बातचीत झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल एखाद्या भाजपा नेत्याप्रमाणे माझ्याशी बोलत असल्याचा आरोप केला आहे. "मला खूपच अपमानास्पद वाटलं. पदाचा त्याग करण्याचा विचारही माझ्या मनात आला होता", असं ममता बॅनर्जी बोलल्या आहेत. 
यावर प्रतिक्रिया देताना राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांनी आपण ममता बॅनर्जीशीं बोलताना त्यांचा अपमान होईल असं काहीच बोललो नसल्याचा दावा केला आहे. 
 
दुसरीकडे भाजपाने बदुरिया हिंसाचारात केंद्राने दखल घेण्याची मागणी केली आहे. नॉर्थ 24 परगणा जिल्ह्यात दोन हजाराहून जास्त मुस्लिमांनी हिंदू कुटुंबावर हल्ला केला असल्याचा दावा भाजपाने केला आहे. आपल्या कार्यालयांनाही जाणुनबुजून आग लावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.