शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal Election 2021: द्वेष आणि हिंसेशिवाय भाजपकडे देण्यासारखे काहीच नाही; राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 19:13 IST

west bengal assembly election 2021: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी प्रचारसभांना हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देराहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोलभाजप, RSS सह तृणमूल काँग्रेसवरही टीकास्त्रभाजप द्वेष आणि हिंसा पसरवतंय - राहुल गांधी

दार्जिलिंग: पश्चिम बंगाल विधानसभा (west bengal assembly election 2021) निवडणुकींच्या पाचव्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग आला आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. सुरुवातीच्या चार टप्प्यांनंतर आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी प्रचारसभांना हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. दार्जिलिंग येथे आयोजित रॅलीत बोलताना राहुल गांधी यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. (rahul gandhi criticised bjp over sonar bangla)

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपसह पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसवरही टीका केली आहे. पश्चिम बंगालचे विभाजन करून येथील संस्कृती नष्ट करण्याचा भाजपचा डाव आहे. आसाम आणि तामिळनाडूमध्ये भाजपने हेच केले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

Break The Chain: ठाकरे सरकार व केंद्रातील मोदी सरकारच्या पॅकेजमधील फरक आणि साम्य काय? पाहा, डिटेल्स

भाजप द्वेष आणि हिंसा पसरवतंय

द्वेष आणि हिंसेशिवाय भाजपकडे देण्यासारखे काहीच नाही. या गोष्टी पसरवण्याचे काम भाजप करत आहे, असा घणाघातही राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केला. तसेच पश्चिम बंगालमध्ये भाजप सोनार बांगलाच्या गोष्टी करत आहेत. मात्र, संपूर्ण देशाची वाट लावून ठेवली आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. तर, पश्चिम बंगाल असे एकमेव राज्य आहे, जिथे नोकऱ्यांसाठी कटमनी द्यावं लागतं, असा दावाही राहुल गांधी यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका करताना केला.

भाजप आणि RSS घृणा पसरवतात

आसाममधील जनता संस्कृती आणि इतिहासावर हल्ला होत असल्याचे सांगितले जात आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS जिथे जाईल, तिथे घृणा आणि द्वेष पसरवण्याचे काम करतात, असा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे. 

गुजरात: कोरोना बचावासाठी सरकारी रुग्णालयात यज्ञ; पण, अंतिम संस्काराची व्यवस्था अपुरी

दरम्यान, भाजपला विधानसभा निवडणुकीत ७० जागाही मिळणार नाहीत, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. भाजप एकाच मुद्द्यावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भाष्य करत खोटे बोलत आहे. तृणमूल पुन्हा सत्तेत आल्यास पश्चिम बंगालमध्ये वादग्रस्त राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनआरसी) लागू होऊ देणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१PoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस