शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

West Bengal Election 2021: द्वेष आणि हिंसेशिवाय भाजपकडे देण्यासारखे काहीच नाही; राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 19:13 IST

west bengal assembly election 2021: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी प्रचारसभांना हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देराहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोलभाजप, RSS सह तृणमूल काँग्रेसवरही टीकास्त्रभाजप द्वेष आणि हिंसा पसरवतंय - राहुल गांधी

दार्जिलिंग: पश्चिम बंगाल विधानसभा (west bengal assembly election 2021) निवडणुकींच्या पाचव्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग आला आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. सुरुवातीच्या चार टप्प्यांनंतर आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी प्रचारसभांना हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. दार्जिलिंग येथे आयोजित रॅलीत बोलताना राहुल गांधी यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. (rahul gandhi criticised bjp over sonar bangla)

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपसह पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसवरही टीका केली आहे. पश्चिम बंगालचे विभाजन करून येथील संस्कृती नष्ट करण्याचा भाजपचा डाव आहे. आसाम आणि तामिळनाडूमध्ये भाजपने हेच केले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

Break The Chain: ठाकरे सरकार व केंद्रातील मोदी सरकारच्या पॅकेजमधील फरक आणि साम्य काय? पाहा, डिटेल्स

भाजप द्वेष आणि हिंसा पसरवतंय

द्वेष आणि हिंसेशिवाय भाजपकडे देण्यासारखे काहीच नाही. या गोष्टी पसरवण्याचे काम भाजप करत आहे, असा घणाघातही राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केला. तसेच पश्चिम बंगालमध्ये भाजप सोनार बांगलाच्या गोष्टी करत आहेत. मात्र, संपूर्ण देशाची वाट लावून ठेवली आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. तर, पश्चिम बंगाल असे एकमेव राज्य आहे, जिथे नोकऱ्यांसाठी कटमनी द्यावं लागतं, असा दावाही राहुल गांधी यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका करताना केला.

भाजप आणि RSS घृणा पसरवतात

आसाममधील जनता संस्कृती आणि इतिहासावर हल्ला होत असल्याचे सांगितले जात आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS जिथे जाईल, तिथे घृणा आणि द्वेष पसरवण्याचे काम करतात, असा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे. 

गुजरात: कोरोना बचावासाठी सरकारी रुग्णालयात यज्ञ; पण, अंतिम संस्काराची व्यवस्था अपुरी

दरम्यान, भाजपला विधानसभा निवडणुकीत ७० जागाही मिळणार नाहीत, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. भाजप एकाच मुद्द्यावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भाष्य करत खोटे बोलत आहे. तृणमूल पुन्हा सत्तेत आल्यास पश्चिम बंगालमध्ये वादग्रस्त राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनआरसी) लागू होऊ देणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१PoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस