शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून माझ्या हत्येचा कट रचला जातोय; ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 20:37 IST

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (west bengal assembly election 2021) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापताना पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देममता बॅनर्जी यांचे भाजपवर गंभीर आरोपपैसे देऊन लोकांना सभेला आणले जातेय - ममता बॅनर्जीमला रोखणे कठीण आहे, हे भाजपला माहिती आहे - ममता बॅनर्जी

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (west bengal assembly election 2021) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापताना पाहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे सरकार खालसा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) जोरदार कंबर कसली आहे. भाजपचे नेते, मंत्री, मुख्यमंत्री पश्चिम बंगाल दौऱ्यावर असून, विविध ठिकाणच्या रॅलीत सहभागी होताना दिसत आहेत. तर, दुसरीकडे पायाला फ्रॅक्चर झाले असतानाही, ममता दीदी मागे हटताना दिसत नाहीएत. अशातच भाजपकडून माझ्या हत्येचा कट रचला जातोय, असा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. (west bengal assembly election 2021 mamata banerjee slams bjp over various issues) 

ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका रॅलीत जनतेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर जोरदार टीका केली. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना छळण्याचे काम भाजपकडून केले जात आहे, असा हल्लाबोल ममत बॅनर्जी यांनी केला.

भाजपवाले पैसे देत असतील तर घ्या, पण मतदान तृणमूल काँग्रेसला करा: ममता बॅनर्जी

भाजपकडून माझ्या हत्येचा कट रचला जातोय

भाजपकडून माझ्या हत्येचा कट रचला जातोय. निवडणूक आयोग भाजपच्या तालावर नाचतोय. माझे सुरक्षा संचालक विवेक सहाय यांना हटवण्यात आले. नंदीग्राम येथील घटनेला भाजप जबाबदार आहे, असा आरोप करत, भाजपविरोधातील लढाई सुरूच ठेवणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 

पैसे देऊन लोकांना सभेला आणले जातेय

भाजपच्या रॅलीत कोणीही जायला तयार नाही. यामुळे अमित शहांचा तिळपापड होतोय. म्हणूनच भाजपकडून पैसे देऊन लोकांना सभेला आणले जात आहे, असा दावा करत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी बंगाल निवडणुकांपेक्षा देशाकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे, असा टोला लगावला. 

ममता बॅनर्जींना रोखणे कठीण

डॉक्टरांनी मला आराम करण्यास सांगितले आहे. परंतु, तरीही मी बसून राहिले नाही. कारण मी आराम केला, तर भाजप जनतेला जे दुःख देईल, ते सहन करण्यापलीकडील असेल. ममता बॅनर्जी यांना रोखणे कठीण आहे, हे भाजपला माहिती आहे, असे सांगत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी चक्रीवादळ, कोरोना संकटात पश्चिम बंगालची योग्य पद्धतीने मदत केली नाही, असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीAmit Shahअमित शहाPoliticsराजकारणBJPभाजपा