शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भाजपकडून माझ्या हत्येचा कट रचला जातोय; ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 20:37 IST

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (west bengal assembly election 2021) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापताना पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देममता बॅनर्जी यांचे भाजपवर गंभीर आरोपपैसे देऊन लोकांना सभेला आणले जातेय - ममता बॅनर्जीमला रोखणे कठीण आहे, हे भाजपला माहिती आहे - ममता बॅनर्जी

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (west bengal assembly election 2021) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापताना पाहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे सरकार खालसा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) जोरदार कंबर कसली आहे. भाजपचे नेते, मंत्री, मुख्यमंत्री पश्चिम बंगाल दौऱ्यावर असून, विविध ठिकाणच्या रॅलीत सहभागी होताना दिसत आहेत. तर, दुसरीकडे पायाला फ्रॅक्चर झाले असतानाही, ममता दीदी मागे हटताना दिसत नाहीएत. अशातच भाजपकडून माझ्या हत्येचा कट रचला जातोय, असा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. (west bengal assembly election 2021 mamata banerjee slams bjp over various issues) 

ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका रॅलीत जनतेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर जोरदार टीका केली. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना छळण्याचे काम भाजपकडून केले जात आहे, असा हल्लाबोल ममत बॅनर्जी यांनी केला.

भाजपवाले पैसे देत असतील तर घ्या, पण मतदान तृणमूल काँग्रेसला करा: ममता बॅनर्जी

भाजपकडून माझ्या हत्येचा कट रचला जातोय

भाजपकडून माझ्या हत्येचा कट रचला जातोय. निवडणूक आयोग भाजपच्या तालावर नाचतोय. माझे सुरक्षा संचालक विवेक सहाय यांना हटवण्यात आले. नंदीग्राम येथील घटनेला भाजप जबाबदार आहे, असा आरोप करत, भाजपविरोधातील लढाई सुरूच ठेवणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 

पैसे देऊन लोकांना सभेला आणले जातेय

भाजपच्या रॅलीत कोणीही जायला तयार नाही. यामुळे अमित शहांचा तिळपापड होतोय. म्हणूनच भाजपकडून पैसे देऊन लोकांना सभेला आणले जात आहे, असा दावा करत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी बंगाल निवडणुकांपेक्षा देशाकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे, असा टोला लगावला. 

ममता बॅनर्जींना रोखणे कठीण

डॉक्टरांनी मला आराम करण्यास सांगितले आहे. परंतु, तरीही मी बसून राहिले नाही. कारण मी आराम केला, तर भाजप जनतेला जे दुःख देईल, ते सहन करण्यापलीकडील असेल. ममता बॅनर्जी यांना रोखणे कठीण आहे, हे भाजपला माहिती आहे, असे सांगत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी चक्रीवादळ, कोरोना संकटात पश्चिम बंगालची योग्य पद्धतीने मदत केली नाही, असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीAmit Shahअमित शहाPoliticsराजकारणBJPभाजपा