शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजपने बाहेरच्या लोकांना आणले आणि कोरोनाचा अधिक फैलाव झाला; ममता दीदींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 20:49 IST

west bengal assembly election 2021: ममता बॅनर्जी यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे.

ठळक मुद्देममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोलकोरोना परिस्थितीवरून साधला निशाणाबाहेरील लोकांच्या चाचण्या होत नसल्याचा दावा

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा (west bengal assembly election 2021) निवडणुकींच्या पाचव्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग आला आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. त्यातच आता कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. भाजपने बाहेरच्या लोकांना आणले आणि कोरोना अधिक प्रमाणावर फैलावला, असा दावा ममता दीदींना केला आहे. (mamata banerjee criticised bjp over corona situation)

नौपाडा येथील एका प्रचारसभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी सदर टीका केली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यावरूनही ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त करत निशाणा साधला.

 निवडणुकांमध्ये कोरोनाची ‘रॅली’; बंगालमध्ये ४२० टक्के, तर आसामामध्ये ५३२ टक्के रुग्णवाढ

बाहेरून आलेल्यांच्या चाचण्या नाही

पाच महिन्यांपासून कोरोना नियंत्रणात होता. मात्र, भाजपने बाहेरून लोकांना आणले आणि कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला. इतकेच नव्हे, तर त्या लोकांची कोरोना चाचणीही करण्यात आलेली नाही. लोकं बाहेरून येऊन कोरोना पसरवत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये निवडणूक रॅली, प्रचारसभा यांमध्ये कोरोनाचे कोणतेही नियम पाळले जात नाही, असे स्पष्ट निरीक्षण नोंदवून कोलकाता उच्च न्यायालयाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना राजकीय कार्यक्रमात कोरोनाच्या नियमांचे होणारे पालन यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

बंगालमध्ये ४२० टक्के कोरोना रुग्णवाढ

पाच राज्यांतील निवडणुकांपैकी सर्वाधिक चर्चा आहे, ती पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांची. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून अनेकांनी बंगालमध्ये तळ ठोकल्याचे पाहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. निवडणुकांच्या रणधुमाळीत कोरोना संसर्गालाही मोठा जोर आल्याचे चित्र आहे. १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत बंगालमध्ये ८ हजार कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर, ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र, १ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत बंगालमध्ये ४१ हजार ९२७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून, १२७ जणांचा मृत्यू झाला आहे. 

“खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे”: जितेंद्र आव्हाड

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी गरज असेल, तेथे कोरोना नियमांचे पालन व्हावे, यासाठी कलम १४४ लागू करावे, असे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले आहेत. पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगावर असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१corona virusकोरोना वायरस बातम्याMamata Banerjeeममता बॅनर्जीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाPoliticsराजकारण