शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

विहिरीत पडलेल्या बैलास वाचवण्यास गेले; भीषण दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 16:52 IST

विहिरीजवळ असलेला बैल गुरुवारी सायंकाळी ४ वाजता विहिरीत पडला

रांची - विहिरीत पडलेल्या एका बैलाला वाचविण्याच्या प्रयत्नात ६ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. झारखंडच्या रांचीपासून ७० किमी अंतरावर असलेल्या पिस्का गावात ही घटना घडली. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले लोकं एकाच गावातील होते, त्यामुळे या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. गावात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत होता. त्यामुळे, विहिरीतील माती ढासळत होती. 

विहिरीजवळ असलेला बैल गुरुवारी सायंकाळी ४ वाजता विहिरीत पडला. याबाबत माहिती मिळताच गावातील ९ लोक बैलाला बाहेर काढण्यासाठी विहिरीजवळ आले, काही विहिरीतही उतरले. बैलाला रस्सीने बांधून ते वरी काढण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान, विहिरीची ढासळत असलेली माती मोठ्या प्रमाणात ढासळली आणि विहीरच खचली. त्यामुळे, या विहिरीवर उभारलेला सर्वजण विहिरीच्या मातीखाली गाडले गेले. त्यामुळे, तात्काळ स्थानिक प्रशासनाला यासंदर्भात माहिती देण्यात आली. 

एनडीआरएफच्या पथकाने आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, रात्री उशिरापर्यंत मदत व बचावकार्य सुरू होते. सर्वांच्या मदतीने ३ जणांना जिवंतपणे बाहेर काढण्यात यश आले. मात्र, दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला. 

विक्रांत मांझी नावाच्या व्यक्तीला वाचवण्यात आलं आहे. मात्र, त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. विक्रांतच्या डोक्याला जखम झाली आहे. दरम्यान, माझे वडील शेतात काम करत होते. त्यावेळी माझा लहान भाऊ त्यांच्याकडे आला होता. एक बैल विहिरीत पडल्याचे त्याने वडिलांनी सांगितले. त्यामुळे, वडील विहिरीकडे मदतीसाठी धावले. मीही त्यांच्यामागे गेलो. त्यावेळी तिथे ही दुर्घटना घडली. जवानांनी अनेक तासांनंतर मला बाहेर काढलं. पण, दुर्घटनेत वडिलांचा मृत्यू झाल्याची आपबिती विक्रांत यांनी सांगितली.

 

टॅग्स :AccidentअपघातRainपाऊसranchi-pcरांचीDeathमृत्यू