शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

विहिरीत पडलेल्या बैलास वाचवण्यास गेले; भीषण दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 16:52 IST

विहिरीजवळ असलेला बैल गुरुवारी सायंकाळी ४ वाजता विहिरीत पडला

रांची - विहिरीत पडलेल्या एका बैलाला वाचविण्याच्या प्रयत्नात ६ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. झारखंडच्या रांचीपासून ७० किमी अंतरावर असलेल्या पिस्का गावात ही घटना घडली. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले लोकं एकाच गावातील होते, त्यामुळे या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. गावात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत होता. त्यामुळे, विहिरीतील माती ढासळत होती. 

विहिरीजवळ असलेला बैल गुरुवारी सायंकाळी ४ वाजता विहिरीत पडला. याबाबत माहिती मिळताच गावातील ९ लोक बैलाला बाहेर काढण्यासाठी विहिरीजवळ आले, काही विहिरीतही उतरले. बैलाला रस्सीने बांधून ते वरी काढण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान, विहिरीची ढासळत असलेली माती मोठ्या प्रमाणात ढासळली आणि विहीरच खचली. त्यामुळे, या विहिरीवर उभारलेला सर्वजण विहिरीच्या मातीखाली गाडले गेले. त्यामुळे, तात्काळ स्थानिक प्रशासनाला यासंदर्भात माहिती देण्यात आली. 

एनडीआरएफच्या पथकाने आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, रात्री उशिरापर्यंत मदत व बचावकार्य सुरू होते. सर्वांच्या मदतीने ३ जणांना जिवंतपणे बाहेर काढण्यात यश आले. मात्र, दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला. 

विक्रांत मांझी नावाच्या व्यक्तीला वाचवण्यात आलं आहे. मात्र, त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. विक्रांतच्या डोक्याला जखम झाली आहे. दरम्यान, माझे वडील शेतात काम करत होते. त्यावेळी माझा लहान भाऊ त्यांच्याकडे आला होता. एक बैल विहिरीत पडल्याचे त्याने वडिलांनी सांगितले. त्यामुळे, वडील विहिरीकडे मदतीसाठी धावले. मीही त्यांच्यामागे गेलो. त्यावेळी तिथे ही दुर्घटना घडली. जवानांनी अनेक तासांनंतर मला बाहेर काढलं. पण, दुर्घटनेत वडिलांचा मृत्यू झाल्याची आपबिती विक्रांत यांनी सांगितली.

 

टॅग्स :AccidentअपघातRainपाऊसranchi-pcरांचीDeathमृत्यू