शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शाब्बास मुली! बालविवाह माेडला अन् १२ वीत टॉपर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 05:21 IST

जर तुमच्यात काही करण्याची जिद्द असेल, तर यश नक्कीच तुमच्या मागे येईल.

जर तुमच्यात काही करण्याची जिद्द असेल, तर यश नक्कीच तुमच्या मागे येईल. अशीच एका धाडसी मुलीची गोष्ट असून, तिने घरी बालविवाहाची तयारी सुरू असताना तो थांबविला आणि प्रचंड अभ्यास करून ती आंध्र प्रदेशमध्ये बारावीच्या परीक्षेत टॉपर आली आहे. त्यामुळे ती देशातील मुलींसाठी हीरो बनली आहे. आई-वडील गरीब असल्याने त्यांच्याकडे शिक्षणासाठी पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यांची मुलगी एस. निर्मला हिचा बालविवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र, निर्मलाने बालविवाह थांबवला आणि अभ्यास करून ती टॉपर आली. आई-वडिलांनी तिच्या ३ बहिणींचे यापूर्वी लग्न लावून दिले होते आणि निर्मलाचेही लग्न करून आपल्या डोक्यावरील ओझे हलके करायचे होते; पण निर्मलाने हिंमत सोडली नाही. ती खंबीरपणे उभी राहिली आणि तिच्या स्वप्नांसाठी लढली.

निर्मलाने १२ वीच्या परीक्षेत टॉप केले असून, पहिल्या वर्षाच्या इंटरमिजिएट बोर्डाच्या परीक्षेत तिला ९५.७% गुण मिळाले. निर्मलाला ४४० पैकी ४२१ गुण मिळाले आहेत. निर्मलाच्या गावात आणि आसपास एकही ज्युनिअर कॉलेज नव्हते. तरीही तिने कॉलेजला जाण्यासाठी अनेक किलोमीटरचा प्रवास केला. पालकांना शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने तिने शिकवणी घेत खर्च केला. 

आता आयपीएस अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न असून, तिला बालविवाह रोखण्यासाठी काम करायचे आहे.  मुलींना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करून त्यांना सक्षम बनवण्याचा माझा प्रयत्न असेल असे तिने सांगितले. जेव्हा तिचे आई-वडील तिचे लग्न करण्यावर ठाम होते, तेव्हा तिने थेट स्थानिक आमदाराची भेट घेतली. यानंतर जिल्हाधिकारी जी. सृजना यांनी हस्तक्षेप करत बालविवाह रोखला होता.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी