...अच्छा हुआ ग्यानदासने मान लिया !

By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:31+5:302015-08-26T23:32:31+5:30

नरेंद्रगिरी महाराज : नरमाईच्या भूमिकेने संभ्रम दूर

Well done Ganadasena! | ...अच्छा हुआ ग्यानदासने मान लिया !

...अच्छा हुआ ग्यानदासने मान लिया !

ेंद्रगिरी महाराज : नरमाईच्या भूमिकेने संभ्रम दूर
त्र्यंबकेश्वर : 'सत्य सत्य होता है. सत्य की ही विजय होती है. अच्छा हुआ की ग्यानदासजी ने मान लिया की वे अध्यक्ष नही है. अच्छी बात है की अब लोगोंके मन में भी भ्रम नही रहेगा,' अशा शब्दांत आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज यांनी ग्यानदासजींच्या नरमाईच्या भूमिकेवर प्रतिक्रिया व्यक्त केली.
ग्यानदास हे निर्वाणी आखाड्याचे महंत असून, त्यांनी शाहीस्नानात सहभागी व्हावे की होऊ नये हा त्यांचा आणि त्यांच्या आखाड्याचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याविषयी आपण काही बोलणार नाही. पण ग्यानदासजींनी सत्याचा स्वीकार केला हे ऐकून बरे वाटले, अशा शब्दांत नरेंद्रगिरींनी समाधान व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, साधू-महंत कधी भांडत नाहीत. त्यांचे आपापसात वाद-विवाद असू शकतात. पण आखाड्यांपैकी कुणी परंपरा मोडली तर मात्र वाद निर्माण होतात. नाशिकमधील वैष्णव आखाड्यांमध्ये सध्या सुरू असलेले वादविवाद त्याचेच प्रतीक आहेत. चतु:संप्रदायाचे प्रमुख एकत्र बसून हे सर्व वादविवाद मिटवतील याची आपल्याला खात्री असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमच्यातील भांडणे ही पाण्यात काठी मारण्यासारखी आहेत. तरंग निघून गेल्यावर पाणी शांत होऊन जाते. तसेच आम्ही सर्व तेरा आखाडे एक आहोत. भविष्यात तेरा आखाडे एकाच ठिकाणी शाहीस्नान करतील अशी मला पूर्ण खात्री वाटते. यासाठी आम्ही संपूर्ण प्रयत्न करीत आहोत, असेही ते म्हणाले.
सर्वसामान्य लोक ज्या व्यक्तीला संत-महात्मा म्हणतात अशा व्यक्तीची वाणी नेहमी संयमित असते. बोलताना ते जबाबदारीने बोलतात. माध्यमांद्वारे जेव्हा गोष्टी समोर येतात तेव्हा त्याचे काय परिणाम होतील याची त्यांना जाणीव असते, अशा शब्दांत त्यांनी कुणाचेही नाव न घेता भाष्य केले.

Web Title: Well done Ganadasena!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.