शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानमधून भारताकडे येतंय संकट; दिल्लीसह अनेक राज्यांतील जनतेचं टेन्शन वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 13:22 IST

मंगळवारी देशाची राजधानी दिल्लीचे कमाल तापमान 41 अंशाच्या वर गेले होते. उष्णतेचा ही लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नवी दिल्लीः कोरोनानं जगभरात धुमाकूळ घातलेला असून, त्याचा प्रभाव वाढतच चालला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतीच असल्यानं सरकारही चिंताक्रांत झालं आहे. त्यातच आता पाकिस्तानकडून भारताकडे नवं संकट येणार असल्याचं संकेत मिळत आहेत. डिसेंबरचा हिवाळा आणि मार्चमध्ये पाऊस पडल्यानंतर आता एप्रिलचा उन्हाळादेखील नवा विक्रम नोंदवू शकतो, अशी शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. मंगळवारी देशाची राजधानी दिल्लीचे कमाल तापमान 41 अंशाच्या वर गेले होते. उष्णतेचा ही लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.शेजारील पाकिस्तानकडून येत असलेल्या उष्ण लाटांमुळे या महिन्यात तापमान 46 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. ही गरम हवा दिल्लीसह कोट्यवधी लोकांसाठी त्रासदायक ठरणार आहे. केवळ दिल्लीच नव्हे तर उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश, बिहारमधील लोकांना या उष्म्याचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे.हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, एप्रिलमधला हा तापमानाचा उच्चांक 29 एप्रिल 1941 या वर्षासारखाच आहे, जेव्हा कमाल तापमान 45.6 डिग्री सेल्सिअस एवढे नोंदवले गेले होते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच उष्णतेचा आलेख हळूहळू वाढत चालला आहे, पण दोन-तीन दिवसांपासून त्यानं वेग पकडल्याचं दिसत आहे. येत्या काही दिवसांत उत्तर भारताला तीव्र उष्णता आणि उष्मा सहन करावा लागू शकतो. एकंदरीत एप्रिलच्या शेवटी भारतात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा उत्तर-पश्चिमेकडून हवेच्या लहरी येत होत्या. पर्वतांवरील शीत लहरीदेखील त्याच्याबरोबर मिसळत होत्या. आता वाऱ्यानं दिशा बदललेली असून, तो दक्षिण-पश्चिमेकडून वाहत येतो आहे. त्यामुळे पाकिस्तानची उष्ण हवा राजस्थानमार्गे दिल्लीत पोहोचत आहे. कोणतंही प्रदूषण नसल्यानं ही उष्णतेची काहिली जाणवू लागली असून, आगामी काळात उष्णता आणि तापमानात झपाट्याने वाढ होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानweatherहवामान