शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

पाकिस्तानमधून भारताकडे येतंय संकट; दिल्लीसह अनेक राज्यांतील जनतेचं टेन्शन वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 13:22 IST

मंगळवारी देशाची राजधानी दिल्लीचे कमाल तापमान 41 अंशाच्या वर गेले होते. उष्णतेचा ही लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नवी दिल्लीः कोरोनानं जगभरात धुमाकूळ घातलेला असून, त्याचा प्रभाव वाढतच चालला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतीच असल्यानं सरकारही चिंताक्रांत झालं आहे. त्यातच आता पाकिस्तानकडून भारताकडे नवं संकट येणार असल्याचं संकेत मिळत आहेत. डिसेंबरचा हिवाळा आणि मार्चमध्ये पाऊस पडल्यानंतर आता एप्रिलचा उन्हाळादेखील नवा विक्रम नोंदवू शकतो, अशी शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. मंगळवारी देशाची राजधानी दिल्लीचे कमाल तापमान 41 अंशाच्या वर गेले होते. उष्णतेचा ही लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.शेजारील पाकिस्तानकडून येत असलेल्या उष्ण लाटांमुळे या महिन्यात तापमान 46 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. ही गरम हवा दिल्लीसह कोट्यवधी लोकांसाठी त्रासदायक ठरणार आहे. केवळ दिल्लीच नव्हे तर उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश, बिहारमधील लोकांना या उष्म्याचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे.हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, एप्रिलमधला हा तापमानाचा उच्चांक 29 एप्रिल 1941 या वर्षासारखाच आहे, जेव्हा कमाल तापमान 45.6 डिग्री सेल्सिअस एवढे नोंदवले गेले होते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच उष्णतेचा आलेख हळूहळू वाढत चालला आहे, पण दोन-तीन दिवसांपासून त्यानं वेग पकडल्याचं दिसत आहे. येत्या काही दिवसांत उत्तर भारताला तीव्र उष्णता आणि उष्मा सहन करावा लागू शकतो. एकंदरीत एप्रिलच्या शेवटी भारतात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा उत्तर-पश्चिमेकडून हवेच्या लहरी येत होत्या. पर्वतांवरील शीत लहरीदेखील त्याच्याबरोबर मिसळत होत्या. आता वाऱ्यानं दिशा बदललेली असून, तो दक्षिण-पश्चिमेकडून वाहत येतो आहे. त्यामुळे पाकिस्तानची उष्ण हवा राजस्थानमार्गे दिल्लीत पोहोचत आहे. कोणतंही प्रदूषण नसल्यानं ही उष्णतेची काहिली जाणवू लागली असून, आगामी काळात उष्णता आणि तापमानात झपाट्याने वाढ होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानweatherहवामान