शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

पाकिस्तानमधून भारताकडे येतंय संकट; दिल्लीसह अनेक राज्यांतील जनतेचं टेन्शन वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 13:22 IST

मंगळवारी देशाची राजधानी दिल्लीचे कमाल तापमान 41 अंशाच्या वर गेले होते. उष्णतेचा ही लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नवी दिल्लीः कोरोनानं जगभरात धुमाकूळ घातलेला असून, त्याचा प्रभाव वाढतच चालला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतीच असल्यानं सरकारही चिंताक्रांत झालं आहे. त्यातच आता पाकिस्तानकडून भारताकडे नवं संकट येणार असल्याचं संकेत मिळत आहेत. डिसेंबरचा हिवाळा आणि मार्चमध्ये पाऊस पडल्यानंतर आता एप्रिलचा उन्हाळादेखील नवा विक्रम नोंदवू शकतो, अशी शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. मंगळवारी देशाची राजधानी दिल्लीचे कमाल तापमान 41 अंशाच्या वर गेले होते. उष्णतेचा ही लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.शेजारील पाकिस्तानकडून येत असलेल्या उष्ण लाटांमुळे या महिन्यात तापमान 46 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. ही गरम हवा दिल्लीसह कोट्यवधी लोकांसाठी त्रासदायक ठरणार आहे. केवळ दिल्लीच नव्हे तर उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश, बिहारमधील लोकांना या उष्म्याचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे.हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, एप्रिलमधला हा तापमानाचा उच्चांक 29 एप्रिल 1941 या वर्षासारखाच आहे, जेव्हा कमाल तापमान 45.6 डिग्री सेल्सिअस एवढे नोंदवले गेले होते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच उष्णतेचा आलेख हळूहळू वाढत चालला आहे, पण दोन-तीन दिवसांपासून त्यानं वेग पकडल्याचं दिसत आहे. येत्या काही दिवसांत उत्तर भारताला तीव्र उष्णता आणि उष्मा सहन करावा लागू शकतो. एकंदरीत एप्रिलच्या शेवटी भारतात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा उत्तर-पश्चिमेकडून हवेच्या लहरी येत होत्या. पर्वतांवरील शीत लहरीदेखील त्याच्याबरोबर मिसळत होत्या. आता वाऱ्यानं दिशा बदललेली असून, तो दक्षिण-पश्चिमेकडून वाहत येतो आहे. त्यामुळे पाकिस्तानची उष्ण हवा राजस्थानमार्गे दिल्लीत पोहोचत आहे. कोणतंही प्रदूषण नसल्यानं ही उष्णतेची काहिली जाणवू लागली असून, आगामी काळात उष्णता आणि तापमानात झपाट्याने वाढ होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानweatherहवामान