शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अजित पवार-शरद पवारांची भेट ठाकरे गटाला खटकली?; संजय राऊतांनी केलं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 12:49 IST

दिल्लीत जेवढे कपट कारस्थान चालते तेवढे जगात कुठे चालत नसेल. भाजपा सरकार हे सगळे मुद्दाम करते असा आरोप राऊतांनी केला. 

नवी दिल्ली - हे निर्ढावलेले लोक आहेत. शुभेच्छा देणे ही आपली संस्कृती आहे. माझ्यासारख्या माणसाने जर माझ्या वडिलधाऱ्यांच्या पाठित खंजीर खुपसला असता तर डोळ्याला डोळे भिडवण्याची हिंमत झाली नसती. आम्ही असं काम केले असते तर आमचा धीर झाला नसता असं सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी नेते मंडळीच्या शरद पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवारांची भेट उद्धव ठाकरे गटाला खटकली का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अजित पवारांनी आज दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली. या भेटीवेळी प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, सुनेत्रा पवार, पार्थ पवार उपस्थित होते. या भेटीवर संजय राऊत म्हणाले की, आम्ही आमच्या स्वार्थासाठी चूक केली असती तर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या नजरेला नजर भिडवायची हिंमत झाली नसती. मला लाजही वाटली असती. परंतु हे माझे वैयक्तिक मत आहे. मी त्या नेत्यांविषयी व्यक्तिगत बोलत नाही. मी माझ्या भावना आणि आमच्या पक्षातल्या भावना सांगितल्या. आपण महान माणसाविरोधात प्रचार केला. चिखलफेक केली आणि परत शुभेच्छा द्यायला येता हे माझे मत सांगतोय, महाराष्ट्राला किती आवडेल माहिती नाही पण माझे मन झाले नसते आणि मी नजरेला नजर भिडवू शकलो नसतो असं त्यांनी सांगितले.

तसेच शरद पवारांचा आज वाढदिवस, ते महाराष्ट्राचा आधारवड आहेत. देशाच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात जे पवारांचे योगदान आहे ते अतुल्यनीय आहे.आम्हाला त्यांचे मार्गदर्शन अनेकदा मिळाले आहे. एकत्रित काम करतो. त्यामुळे त्यांना दिर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावे ही सगळ्यांची इच्छा असते. दरवेळी ते महाराष्ट्रात वाढदिवस साजरा करतात. यावेळी संसदेच्या अधिवेशनामुळे ते दिल्लीत आहेत. आम्ही शिवसेनेचे सगळेच खासदार, काँग्रेसचे खासदार इतर नेते यांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्यात असं संजय राऊतांनी म्हटलं.

दरम्यान, आम्ही जेव्हा पहिल्यांदा खासदार झालो तेव्हा साधे घर दिले होते. सुनेत्रा पवारांना ११ जनपथवर टाईप VII चं घर देऊन अजित पवारांची दिल्लीत येण्याजाण्याची सोय केली आहे. भाजपा सरकार हे सगळे मुद्दाम करते. नेत्यांना कमी लेखण्यासाठी हे करते. दिल्ली ही कारस्थानाची राजधानी आहे. दिल्लीत जेवढे कपट कारस्थान चालते तेवढे जगात कुठे चालत नसेल. त्यामुळे हे जे काही घर दिलंय ते मुद्दाम दिलंय असा आरोप संजय राऊतांनी केला.

सरकारला लाज वाटली पाहिजे

येत्या २० तारखेला महिना होईल तरीही मंत्रिमंडळ बनत नसेल आणि महाराष्ट्रात रोज हत्या सुरू आहेत. सरकारला लाज वाटली पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे नाकाने कांदे सोलतायेत. देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना महाराष्ट्रात काय सुरू आहे माहिती आहे का, राज्यात रोज खून होतायेत, दंगली होतायेत आणि ते आम्हाला अक्कल शिकवतायेत असा टोला संजय राऊतांनी महायुतीला लगावला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवारsunil tatkareसुनील तटकरेAjit Pawarअजित पवारPraful Patelप्रफुल्ल पटेल