शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

अजित पवार-शरद पवारांची भेट ठाकरे गटाला खटकली?; संजय राऊतांनी केलं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 12:49 IST

दिल्लीत जेवढे कपट कारस्थान चालते तेवढे जगात कुठे चालत नसेल. भाजपा सरकार हे सगळे मुद्दाम करते असा आरोप राऊतांनी केला. 

नवी दिल्ली - हे निर्ढावलेले लोक आहेत. शुभेच्छा देणे ही आपली संस्कृती आहे. माझ्यासारख्या माणसाने जर माझ्या वडिलधाऱ्यांच्या पाठित खंजीर खुपसला असता तर डोळ्याला डोळे भिडवण्याची हिंमत झाली नसती. आम्ही असं काम केले असते तर आमचा धीर झाला नसता असं सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी नेते मंडळीच्या शरद पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवारांची भेट उद्धव ठाकरे गटाला खटकली का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अजित पवारांनी आज दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली. या भेटीवेळी प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, सुनेत्रा पवार, पार्थ पवार उपस्थित होते. या भेटीवर संजय राऊत म्हणाले की, आम्ही आमच्या स्वार्थासाठी चूक केली असती तर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या नजरेला नजर भिडवायची हिंमत झाली नसती. मला लाजही वाटली असती. परंतु हे माझे वैयक्तिक मत आहे. मी त्या नेत्यांविषयी व्यक्तिगत बोलत नाही. मी माझ्या भावना आणि आमच्या पक्षातल्या भावना सांगितल्या. आपण महान माणसाविरोधात प्रचार केला. चिखलफेक केली आणि परत शुभेच्छा द्यायला येता हे माझे मत सांगतोय, महाराष्ट्राला किती आवडेल माहिती नाही पण माझे मन झाले नसते आणि मी नजरेला नजर भिडवू शकलो नसतो असं त्यांनी सांगितले.

तसेच शरद पवारांचा आज वाढदिवस, ते महाराष्ट्राचा आधारवड आहेत. देशाच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात जे पवारांचे योगदान आहे ते अतुल्यनीय आहे.आम्हाला त्यांचे मार्गदर्शन अनेकदा मिळाले आहे. एकत्रित काम करतो. त्यामुळे त्यांना दिर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावे ही सगळ्यांची इच्छा असते. दरवेळी ते महाराष्ट्रात वाढदिवस साजरा करतात. यावेळी संसदेच्या अधिवेशनामुळे ते दिल्लीत आहेत. आम्ही शिवसेनेचे सगळेच खासदार, काँग्रेसचे खासदार इतर नेते यांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्यात असं संजय राऊतांनी म्हटलं.

दरम्यान, आम्ही जेव्हा पहिल्यांदा खासदार झालो तेव्हा साधे घर दिले होते. सुनेत्रा पवारांना ११ जनपथवर टाईप VII चं घर देऊन अजित पवारांची दिल्लीत येण्याजाण्याची सोय केली आहे. भाजपा सरकार हे सगळे मुद्दाम करते. नेत्यांना कमी लेखण्यासाठी हे करते. दिल्ली ही कारस्थानाची राजधानी आहे. दिल्लीत जेवढे कपट कारस्थान चालते तेवढे जगात कुठे चालत नसेल. त्यामुळे हे जे काही घर दिलंय ते मुद्दाम दिलंय असा आरोप संजय राऊतांनी केला.

सरकारला लाज वाटली पाहिजे

येत्या २० तारखेला महिना होईल तरीही मंत्रिमंडळ बनत नसेल आणि महाराष्ट्रात रोज हत्या सुरू आहेत. सरकारला लाज वाटली पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे नाकाने कांदे सोलतायेत. देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना महाराष्ट्रात काय सुरू आहे माहिती आहे का, राज्यात रोज खून होतायेत, दंगली होतायेत आणि ते आम्हाला अक्कल शिकवतायेत असा टोला संजय राऊतांनी महायुतीला लगावला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवारsunil tatkareसुनील तटकरेAjit Pawarअजित पवारPraful Patelप्रफुल्ल पटेल