शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

"...तर आम्ही चंद्रशेखर राव यांना कन्याकुमारीतील 3 समुद्रात बुडवू"; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 14:52 IST

Ramdas Athawale And K Chandrashekar Rao : के. चंद्रशेखर राव यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या टीकेला आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नवी दिल्ली - तेलंगणाचेमुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही म्हटलं आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदर्शी नेते नाहीत. भाजपाला केंद्रातून हटवून बंगालच्या खाडीत फेकून द्यायला हवं. आम्ही शांत बसणार नाहीत, देशाचं नेतृत्व बदलायला हवं" असं म्हणत चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांनी टीकास्त्र सोडलं. त्यांच्या या टीकेला आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "...तर आम्ही देखील चंद्रशेखर राव यांना कन्याकुमारीतील 3 समुद्रात बुडवू" असं म्हटलं आहे. 

रामदास आठवले यांनी "तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपाला बंगालच्या उपसागरात फेकून देण्याचं विधान केलं होतं. त्यांनी असं विधान करणं योग्य नाही. जर ते भाजपाला बंगालच्या खाडीत फेकून देऊ असं म्हणत असतील तर आम्ही देखील त्यांना कन्याकुमारीमधील 3 समुद्रात बुडवू" असं म्हटलं आहे. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी भारताचे संविधान पुन्हा लिहिण्याची गरज आहे. आपल्या क्रांतीकारी विचारांना पुढे नेत युवकांनी आपल्या गरजांसाठी लढण्याची आवश्यकता आहे. देशात गुणात्मक बदल अपेक्षित आहे. त्यासाठी, सर्वच पक्षाच्या नेत्यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं. यावेळी राव यांनी भाजपावर निशाणा साधला. 

"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदर्शी नेते नाहीत. भाजपाला केंद्रातून हटवून बंगालच्या खाडीत फेकून द्यायला हवं. आम्ही शांत बसणार नाहीत, देशाचं नेतृत्व बदलायला हवं. देशाला असमजूतदार नेते आणि पक्षापासून मुक्त करायला हवं. आपण, लवकरच  उद्धव ठाकरेंना भेटायला मुंबईला जाणार असल्याचेही" राव यांनी सांगितलं. 

भाजपाकडून सोशल मीडियाचा गैरवापर होत आहे. समाजात फूट पाडण्याचं आणि खोटा प्रचार, खोटा प्रसार करण्याचं कामही भाजपाकडून होत असल्याचे केसीआर यांनी म्हटलं आहे. राव यांनी मोदी सरकारच्या 2022 च्या अर्थसंकल्पावरही टीका केली. हे बजेट बेकार आणि उद्देशहीन असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, केसीआर यांनी केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध घेतलेली भूमिका आणि उद्धव ठाकरेंना भेटण्याची व्यक्त केलेली इच्छा पाहता, भाजपाचे अच्छे दिन धोक्यात असल्याचं दिसून येत आहे.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेTelanganaतेलंगणाChief Ministerमुख्यमंत्रीUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा