शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 16:37 IST

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी युरोपीय देशांना स्पष्ट संदेश दिला आहे.

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आहेत. भारतानेपाकिस्तानविरुद्ध सिंधू करार रद्द करण्यासारखी अनेक मोठी पाऊले उचलली आहेत. यामुळे तणाव इतका वाढला आहे की, दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. अशातच, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी युरोपसह संपूर्ण जगाला एक थेट संदेश दिला आहे. 

परराष्ट्र मंत्री युरोपवर का चिडले?भू-राजकीय मुद्द्यांवर भारताच्या भूमिकेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या युरोपीय देशांवर टीका करताना परराष्ट्रमंत्री म्हणाले की, भारताला मित्रांची गरज आहे, फक्त उपदेश देणाऱ्यांची नाही. भारताला परस्पर आदर आणि समजूतदारपणा दाखवणाऱ्या देशांसोबत काम करायचे आहे. काही युरोपीय देश अजूनही त्यांच्या मूल्ये आणि कृतींमधील दरीशी झुंजत आहेत. जेव्हा आपण जगाकडे पाहतो, तेव्हा आपण उपदेशकांचा नाही तर भागीदारांचा शोध घेतो. युरोप अजूनही या समस्येशी झुंजत आहे. 

डॉ. जयशंकर पुढे म्हणाले, जर आपल्याला भागीदारी विकसित करायची असेल, तर काही समज, संवेदनशीलता, परस्पर हित आणि जग कसे कार्य करते, याची जाणीव असली पाहिजे. याचा अर्थ असा की, भागीदारी यशस्वी होण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या गरजा आणि हितसंबंध समजून घेतले पाहिजेत. भारत अशा देशांसोबत काम करू इच्छितो, जे परस्पर आदर आणि समजूतदारपणा दाखवतात. युरोपच्या समस्या संपूर्ण जगाच्या समस्या आहेत, परंतु संपूर्ण जगाच्या समस्या युरोपच्या समस्या नाहीत, या मानसिकतेतून युरोपला बाहेर यावे लागेल, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाS. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतPakistanपाकिस्तान