शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 16:37 IST

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी युरोपीय देशांना स्पष्ट संदेश दिला आहे.

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आहेत. भारतानेपाकिस्तानविरुद्ध सिंधू करार रद्द करण्यासारखी अनेक मोठी पाऊले उचलली आहेत. यामुळे तणाव इतका वाढला आहे की, दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. अशातच, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी युरोपसह संपूर्ण जगाला एक थेट संदेश दिला आहे. 

परराष्ट्र मंत्री युरोपवर का चिडले?भू-राजकीय मुद्द्यांवर भारताच्या भूमिकेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या युरोपीय देशांवर टीका करताना परराष्ट्रमंत्री म्हणाले की, भारताला मित्रांची गरज आहे, फक्त उपदेश देणाऱ्यांची नाही. भारताला परस्पर आदर आणि समजूतदारपणा दाखवणाऱ्या देशांसोबत काम करायचे आहे. काही युरोपीय देश अजूनही त्यांच्या मूल्ये आणि कृतींमधील दरीशी झुंजत आहेत. जेव्हा आपण जगाकडे पाहतो, तेव्हा आपण उपदेशकांचा नाही तर भागीदारांचा शोध घेतो. युरोप अजूनही या समस्येशी झुंजत आहे. 

डॉ. जयशंकर पुढे म्हणाले, जर आपल्याला भागीदारी विकसित करायची असेल, तर काही समज, संवेदनशीलता, परस्पर हित आणि जग कसे कार्य करते, याची जाणीव असली पाहिजे. याचा अर्थ असा की, भागीदारी यशस्वी होण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या गरजा आणि हितसंबंध समजून घेतले पाहिजेत. भारत अशा देशांसोबत काम करू इच्छितो, जे परस्पर आदर आणि समजूतदारपणा दाखवतात. युरोपच्या समस्या संपूर्ण जगाच्या समस्या आहेत, परंतु संपूर्ण जगाच्या समस्या युरोपच्या समस्या नाहीत, या मानसिकतेतून युरोपला बाहेर यावे लागेल, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाS. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतPakistanपाकिस्तान