शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? देशवासीयांना केलं मोठं आवाहन
2
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
3
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
4
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
5
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
6
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
7
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
8
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
9
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
10
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
11
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
12
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
13
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
14
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
15
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
16
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
17
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
18
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
19
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
20
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही आमचं जेवण सोबत आणलं आहे"; आंदोलक शेतकऱ्यांनी नाकारलं सरकारचं भोजन

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 3, 2020 17:37 IST

जर सरकारने हे तीनही कायदे मागे घेतले नाही, तर आपण दिल्‍लीचे रस्ते बंद करू, असा इशाराही या शेतकरी आंदोलकांनी सरकारला दिला आहे. 

नवी दिल्ली -केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या सात दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. आज या आंदोलक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधिमंडळाला केंद्र सरकारने चर्चेसाठी बोलावले आहे. दिल्ली येथील विज्ञान भवनात दुपारी 12 वाजल्यापासून चर्चा सुरू आहे. विज्ञान भवनात सुरू असलेल्या या बैठकीत शेतकरी आपल्या समस्या मुद्देसूदपणे मांडत आहेत. मीळालेल्या माहितीनुसार, सरकार आणि शेतकरी एका-एका मुद्द्यावर सविस्तर चर्चा करत आहेत. या बैठकीला कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल हेदेखील उपस्थित आहेत. चर्चेनंतर सकारात्मक निर्णय होईल अशी आशा नरेंद्र तोमर यांनी बैठकीपूर्वीच व्यक्त केली आहे.

चर्चेदरम्यान झालेल्या लंच ब्रेकमध्ये या शेतकऱ्यांनी सरकारने दिलेले जेवण आणि चहादेखील नाकारला. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या सोबत आणलेले जेवणच घेतले. एका शेतकरी नेत्याने म्हटले आहे, "सरकारने आम्हाला जेवण आणि चहा ऑफर केला होता, मात्र, आम्ही त्यास नकार दिला आणि आमच्या सोबत असलेले जेवणच घेतले."

विज्ञान भवनातील या व्हिडिओमध्ये, बैठकीसाठी आलेले शेतकरी, आपल्या सोबत आणलेले भेजन एकमेकांना वाढताना दिसत आहेत. हे शेतकरी आंदोलक राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत, नवे कृषी कायदे मागे घेण्याची मागणी सरकारकडे करत आहेत. यातील अधिकांश शेतकरी पंजबमधील आहेत. जर सरकारने हे तीनही कायदे मागे घेतले नाही, तर आपण दिल्‍लीचे रस्ते बंद करू, असा इशाराही या शेतकरी आंदोलकांनी सरकारला दिला आहे. 

शेतकऱ्यांच्या 6 मोठ्या मागण्या - 

  • तीनही कृषी कायदे तत्काळ मागे घ्यावेत. 
  • शेतकऱ्यांसाठी MSP कायदा बनवण्यात यावा. 
  • MSP निश्चित करण्यासाठी स्वामीनाथन फॉर्म्यूला लागू करण्यात यावा.
  • NCR रीजनमध्ये हवा प्रदूषण कायद्यातील बदल परत घेण्यात यावेत.
  • शेतीसाठी डिझेलचे दरात 50 टके कमी करावेत.
  • देशभरात शेतकरी नेते, कवी, वकील तथा इतर कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत.

    मार्ग निघेल?
    शेतकरी आणि सरकार यांच्यात आतापर्यंत चर्चेच्या तीन फेऱ्या झाल्या आहेत. यापूर्वी 1 डिसेंबरला सरकार आणि शेतकरी एका टेबलवर आले होते. मात्र, चर्चा पूर्ण होऊ शकली नव्हती. यामुळे आता सरकारने आपल्या मागण्या लेखी स्वरुपात दिल्या आहेत आणि त्यांना यासंदर्भात पूर्ण हमी हवी आहे. तसेच आजच्या बैठकीत कसल्याही प्रकारचा मार्ग निघाला नाही, तर शेतकरी आंदोलन आणखी तीव्र होईल आणि त्याचा शेवट काय असेल हे कुणालाही माहीत नाही, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीdelhiदिल्लीCentral Governmentकेंद्र सरकार