शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"मंदिर असल्याचे पुरावे मिळाले, आम्ही...", संभल प्रकरणावर स्वामी रामभद्राचार्य यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 11:38 IST

संभल मुद्द्यावर चिंता व्यक्त करत स्वामी रामभद्राचार्य महाराज म्हणाले, संभलमध्ये जे काही सुरू आहे, अत्यंत वाईट आहे. मात्र, यासर्वांत एक सकारात्मक गोष्ट म्हणजे, तेथे मंदिर असल्याचे मिळालेले पुरावे.

उत्तर प्रदेशातील संभल प्रकरण, बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार आणि मोहन भागवत यांचे अलिकडील विधान आदी विषयांवर जगत गुरु स्वामी रामभद्राचार्य महाराज यांनी नुकचे भाष्य केले आहे. संभल प्रकरणासंदर्भात बोलताना, मंदिरासंदर्भातील आपला संघर्ष सुरूच राहणार, असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संभल मुद्द्यावर चिंता व्यक्त करत स्वामी रामभद्राचार्य महाराज म्हणाले, संभलमध्ये जे काही सुरू आहे, अत्यंत वाईट आहे. मात्र, यासर्वांत एक सकारात्मक गोष्ट म्हणजे, तेथे मंदिर असल्याचे मिळालेले पुरावे. ते पुढे म्हणाले, आम्ही हे घेऊनच राहणार. मग ते मतांच्या माध्यमाने असो, न्यायालयाच्या माध्यमाने असो अथवा जनतेच्या सहकार्याने असो. मंदिराच्या मुद्यावर आपला संघर्ष सुरूच राहणार आणि यासाठी आपण शक्य ते सर्व प्रयत्न करणार. 

'वाट बघा, सर्वांचा सर्वनाश होईल' -बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात विचारले असता रामभद्राचार्य म्हणाले, "बांगलादेशचे अंतरिम सरकार हिंदूंवर अत्याचार करत आहे. बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान 'दुष्ट' आहेत. प्रतीक्षा करा, सर्वांचा नाश होईल. काळजी करू नका. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात आंतरराष्ट्रीय समुदायानेही गांभीर्याने पावले उचलणे गरजेचे आहे. आम्ही सरकारला बरेच काही सांगितले आहे, परंतु ही समस्या केवळ भारत सरकारसाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी हा चिंतेचा विषय आहे. 

'मोहन भागवत के बयान से सहमत नहीं'स्वामी रामभद्राचार्य महाराज यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानाशी आपण असहमत असल्याचे म्हटले आहे. मोहन भागवत म्हणाले होते की, "राम मंदिर उभे राहिल्यानंतर, आपणही नव्या ठिकानांवर अशाच पद्दतीने मुद्दे उपस्थित करून हिंदूंचे नेते बनू शकतो, असे काहींना वाटते आहे. मात्र, हे स्वीकारार्ह नाही." यावर स्वामी रामभद्राचार्य म्हणाले की, "मोहन भागवत यांच्या विधानाशी मी अजिबात सहमत नाही. मोहन भागवत अनुशासक राहिले आहेत. मात्र, त्यांचा विचार यावेळी त्यांच्याशी जुळत नाही." 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशTempleमंदिरHinduहिंदू