शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
4
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
5
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
6
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
7
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
8
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
9
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
10
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
11
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
12
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
13
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
14
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
15
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
16
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
17
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
18
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले
19
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
20
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का

"ईव्हीएम नको, बॅलेट पेपर पाहिजे" : महाराष्ट्रातल्या पराभवानंतर मल्लिकार्जुन खरगेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 18:56 IST

आम्हाला ईव्हीएम नको तर बॅलेट पेपर पाहिजे अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे.

Mallikarjun Kharge: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार केव्हाही कोसळू शकतं असा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. मंगळवारी एका कार्यक्रमादरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीच्या जनगणनेला घाबरतात कारण त्यांना भीती आहे की मग प्रत्येकजण आपला वाटा मागू लागेल, असं खरगे यांनी म्हटलं. आम्हाला ईव्हीएम नको तर बॅलेट पेपरवर मतदान हवं असल्याची मागणी मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये संविधान रक्षक अभियान कार्यक्रमाला संबोधित करताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बोलत होते. महाराष्ट्रातल्या निकालानंतर मतदान बॅलेट पेपरद्वारे व्हायला असं खरगे यांनी म्हटलं आहे. या मागणीसाठी ‘भारत जोडो यात्रे’सारखी मोहीम सुरू करावी लागेल, असेही खरगेंनी म्हटलं. मला ईव्हीएम नको आहेत. बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची आमची मागणी असल्याचे मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितले.

"एससी, एसटी, ओबीसी, गरीब वर्गातील लोक पूर्ण ताकदीनिशी मतदान करत आहेत. पण त्यांची मते वाया जात आहेत. आम्हाला बॅलेट पेपरच्या माध्यमातून मते हवी आहेत. ईव्हीएम मशीन पंतप्रधान मोदीजींच्या घरात किंवा अमित शहांच्या घरात नाहीतर अहमदाबादच्या गोदामात ठेवून द्या. पण आमची बॅलेट पेपरची गरज आहे,” असाही टोला मल्लिकार्जुन खरगेंनी लगावला.

"काही लोक राज्यघटनेचे वरवरचं गुणगान गाता. आतून ते त्याला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. संविधानाच्या रक्षणासाठी राहुल गांधीनी भारत जोडो यात्रा सुरू केली आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्व अल्पसंख्याक पुढे आले. त्यामुळेच आम्ही पंतप्रधान मोदींना रोखू शकलो. आज त्यांचे सरकार बहुमताचे नसून अल्पमतातील सरकार आहे. पंतप्रधान मोदींचे सरकार टीडीपीचे चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पाठींब्याने उभे आहे. जर कोणी पाठिंबा काढला तर हे सरकार पडेल," असंही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

"तुम्ही सत्तेत आलात आणि लूट करून अदानी, अंबानी आणि त्यांच्यासारख्यांना देत आहात. या लोकांनी कधीही देशाचा विचार केला नाही. मोदी आणि ते एकमेकांबद्दल विचार करतात. महाराष्ट्राच्या निवडणुकीत अदानींनी महत्त्वाची भूमिका बजावली म्हणून मी हे म्हणत आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांना खूप संपत्ती दिली आणि ते थांबवू शकले नाहीत. निवडणुकीत ते भाजपच्या वतीने वाटप करत आहेत. त्यांच्यात संस्थात्मक एकात्मतेचा अभाव आहे," अशी टीका मल्लिकार्जुन खरगेंनी केली.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीEVM Machineईव्हीएम मशीन