शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

'आम्ही एक-दोनदा नव्हे, तर तब्बल 12 वेळा कलम 370ची तीव्रता कमी केली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 11:23 IST

कलम 370बद्दल काँग्रेसचा मोठा दावा

देहरादून: कलम 370 बद्दल भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान देणाऱ्या भाजपालाकाँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही कलम 370 मधील तरतुदींची तीव्रता 12 वेळा कमी केली. मात्र यामुळे एकदाही वाद निर्माण झाला नाही, असा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा यांनी केला. आम्ही एक-दोनदा नव्हे, तर 12 वेळा कलम 370ची तीव्रता कमी केली. त्यातल्या तरतुदी सौम्य केल्या. मात्र यामुळे एकदाही वादंग निर्माण झाला नाही, असं खेडा यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. देश वादातून नव्हे, तर संवादातून चालतो. काँग्रेसला या गोष्टीची कल्पना आहे. मात्र भाजपाला ही बाब समजत नाही. कारण त्यांचं संपूर्ण राजकारणच वादावर चालतं, अशी टीका खेडा यांनी केली. काँग्रेस पक्षाची कलम 370बद्दलची भूमिका जराही बदललेली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. भाजपा सरकारनं ज्याप्रकारे कलम 370 हटवलं, त्यावर आम्ही प्रश्न उपस्थित करत आहोत. कारण कलम 370 काढून काढण्यासाठी ज्या मार्गाचा अवलंब करण्यात आला, त्याबद्दल आम्हाला आक्षेप आहे, असं खेडांनी म्हटलं. कलम 370 सोबतच वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीवरुनही खेडांनी भाजपाला लक्ष्य केलं. जीएसटी लागू करताना भाजपा सरकारनं घिसडघाई केली. त्यामुळे छोटे व्यापारी, उत्पादक आणि शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत, असं खेडा म्हणाले. नोटबंदीमुळे भारताची अर्थव्यवस्था ढासळली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनीदेखील नोटबंदी केली होती. मात्र त्यामुळे कोणताही वाद निर्माण झाला नव्हता. त्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेला फटका बसला नव्हता. मात्र मोदींनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयानं अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला, अशी टीका खेडा यांनी केली.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370congressकाँग्रेसBJPभाजपा