शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'भ्रष्टाचार केल्यास तुरुंगात टाकत आहोत, म्हणून ते चिंतित'; PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 22:24 IST

आज मी अभिमाने सांगू शकतो की, दलालांना रोखण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. सुधारणा करून दलालांना व्यवस्थेतून दूर करत पारदर्शक व्यवस्था निर्माण केली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

भ्रष्टाचाराला अंकुश लावण्यासाठी आम्ही अनेक कामे केली आहेत. 2014 पूर्वी भ्रष्टाचाराने देश बर्बाद केला होता. मात्र आज मी अभिमाने सांगू शकतो की, दलालांना रोखण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. सुधारणा करून दलालांना व्यवस्थेतून दूर करत पारदर्शक व्यवस्था निर्माण केली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते मंगळवारी जी-20 युनिव्हर्सिटी कनेक्ट फिनाले कार्यक्रमात लोकांना संबोधित करत होते. 

विरोधकांवर हल्ला चढवताना नाव न घेता मोदी म्हणाले, "बेईमान लोकांना शिक्षा होत आहे, तर प्रामाणिक लोकांचा सन्मान केला जात आहे. माझ्यावर आरोप केला जात आहे की, मोदी लोकांना तुरुंगात टाकत आहेत, याचे मला आश्चर्य वाटते. पण, देशाची संपत्ती चोरीली असेल तर कुठे रहायला हवे? शोधून-शोधून पाठवायला हवे  की नाही? तुम्हाला हवे, तेच काम मी करत आहे. काही लोक मोठ्या चिंतेत आहेत."

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसीचाही केला उल्लेख - पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गेल्या 30 दिवसांत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग, गरीब तसेच मध्यम वर्गीयांना  सशक्त बनवण्यासाठी विविध पावले उचलण्यात आली आहेत. महत्वाचे म्हणजे, सरकारने कारागिरांसाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.

2047 वर काय म्हणाले मोदी? -पीएम मोदी म्हणाले, जर आपण ठरवले, तर 2047 पर्यंत भारताला विकसित देश होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग आज आपल्याकडे पाहत आहे. देशाला अशक्य वाटणारी हमी आज मी देऊ शकतो, कारण यामागे तुमची ताकद आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCorruptionभ्रष्टाचारjailतुरुंगBJPभाजपा