शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

Wayanad Landslides : वायनाड भूस्खलनात आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू, अनेकजण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 09:40 IST

Wayanad Landslides : केरळमधील वायनाडमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ३ हजार जणांना वाचवण्यात यश आले असून बचावकार्य अजूनही सुरू आहे.

Wayanad Landslides :केरळमधीलवायनाड जिल्ह्यात सोमवारी झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मोठ्या संख्येने लोक जखमीही झाल्याची माहिती आहे, अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत ३ हजार लोकांची सुटका करण्यात आली आहे. मुसळधार पावसात चिखल, खडक आणि झाडांचे मोठे तुकडे यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. 

लष्कराचे जवान चुरलमाला आणि मुंडक्काई दरम्यान कोसळलेल्या पुलाची पुनर्बांधणी करत आहेत. या पुलामुळे बचावकार्य जलद करता येईल. चुरलमळा ते मुंडक्काईला जोडणारा हा १९० फूट पूल आज दुपारपर्यंत पूर्ण होऊ शकतो.

हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी! दोन जिल्ह्यांतील ३० लोक वाहून गेले, एकाचा मृत्यू

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वायनाडला रवाना झाले आहेत. ते त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. याआधी दोन्ही नेते बुधवारी वायनाडला जाणार होते, मात्र खराब हवामानामुळे त्यांना जाता आले नाही.

चार गावांना मोठा फटका

वायनाडमध्ये भूस्खलनाने मोठं नुकसान झालं आहे. सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री वायनाडमध्ये अतिवृष्टी आपत्ती ठरली. पहाटे १ ते पहाटे ५ च्या दरम्यान तीन वेळा भूस्खलन झाले आणि डोंगराच्या खाली असलेल्या चेलियार नदीच्या पाणलोटात वसलेल्या चुरामाला, अट्टमला, नूलपुझा आणि मुंडक्काई या चार गावांमध्ये विध्वंस झाला. गावोगावी मोठमोठे दगड आणि ढिगाऱ्यांचा तडाखा बसला. काही वेळातच शेकडो घरांचे ढिगारे झाले. पुराच्या मार्गात जे आले ते वाहून गेले. झाडेही उन्मळून पडली. गावोगावी मोठमोठे दगड आणि ढिगाऱ्यांचा तडाखा बसला. काही वेळातच शेकडो घरांचे ढिगारे झाले.

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी बुधवारी सांगितले की, एनडीआरएफ, लष्कर आणि इतर एजन्सींनी केलेल्या समन्वित आणि मोठ्या प्रमाणात बचाव मोहिमेमुळे वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनग्रस्त भागातून १,५०० हून अधिक लोकांची सुटका करण्यात आली. 

विजयन म्हणाले, "दोन दिवसांच्या बचाव मोहिमेत १,५९२ लोकांची सुटका करण्यात आली. इतक्या कमी वेळेत इतक्या लोकांना वाचवण्याच्या समन्वित आणि व्यापक ऑपरेशनची ही उपलब्धी आहे. पहिल्या टप्प्यात आपत्तीच्या आजूबाजूच्या भागातील ६८ कुटुंबांतील २०६ लोकांना तीन छावण्यांमध्ये हलवण्यात आले, यात ७५ पुरुष, ८८ महिला आणि ४३ लहान मुलांचा समावेश आहे. भूस्खलनानंतर सुरू असलेल्या बचाव कार्यात अडकलेल्या १,३८६ लोकांना वाचवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 'यामध्ये ५२८ पुरुष, ५५९ महिला आणि २९९ मुलांचा समावेश आहे, या सर्वांना सात शिबिरांमध्ये पाठवण्यात आले आहे. दोनशे एक जणांना वाचवून रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी ९० जणांवर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :wayanad-pcवायनाडKeralaकेरळmonsoonमोसमी पाऊस