शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

इथे ओशाळली माणुसकी! वायनाडमध्ये भूस्खलनानंतर लोकांनी सोडलं घर; आता होतेय चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 12:07 IST

Wayanad Landslide : भूस्खलनाचा फटका बसलेल्या अनेक कुटुंबांना आपली घरं सोडावी लागली आहेत. मात्र आता जीव वाचवण्यासाठी त्यांनी सोडलेल्या घरांमध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलं असल्याच्या घटना वाढल्या आहेत.

केरळमधील वायनाडमध्ये एकीकडे निसर्गाने कहर केला आहे, तर दुसरीकडे माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर येत आहेत. भूस्खलनाचा फटका बसलेल्या अनेक कुटुंबांना आपली घरं सोडावी लागली आहेत. मात्र आता जीव वाचवण्यासाठी त्यांनी सोडलेल्या घरांमध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलं असल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे. 

चोरी होत असल्यामुळे पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली आहे. या दुर्घटनेचा फायदा घेऊन चोरटे लोकांच्या मौल्यवान वस्तू चोरत असल्याचं म्हटलं जात आहे. या परिसरात गस्त वाढवून चोरट्यांना पकडून शिक्षा करावी अशी विनंती लोकांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे. चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

एका व्यक्तीने सांगितलं की, आम्ही असे लोक आहोत ज्यांनी या दुर्घटनेत सर्वस्व गमावलं आहे. आमची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही आमचं घर सोडलं. मात्र त्यानंतर आम्ही आमच्या घराची स्थिती पाहण्यासाठी परत आलो तेव्हा दरवाजा तुटलेला दिसला. तसेच ते सध्या राहत असलेल्या रिसॉर्टमधील त्याच्या खोलीलाही चोरट्यांनी लक्ष्य करून त्यांचे कपडे चोरल्याची तक्रार त्यांनी केली.

चूरलमाला आणि मुंडक्काईसह आपत्तीग्रस्त भागात पोलीस गस्त घालत असल्याचं अधिकाऱ्यांनी शनिवारी संध्याकाळी एका निवेदनात सांगितलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाधित भागात किंवा पीडितांच्या घरात रात्री विना परवानगी प्रवेश करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. बचावकार्याच्या नावाखाली रात्रीच्या वेळी पोलिसांच्या परवानगीशिवाय प्रभावित भागात किंवा घरांमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही.

वायनाडमध्ये झालेल्या भीषण भूस्खलनानंतर बाधित भागात बचावकार्य सुरू आहे. या अपघातातील मृतांची संख्या ३५० हून अधिक झाली आहे, तर २०६ लोक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे. दुसरीकडे, आयएमडीने वायनाडमध्ये सहा ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे. अशा परिस्थितीत बचावकार्यावर परिणाम होऊ शकतो.

टॅग्स :landslidesभूस्खलनKeralaकेरळtheftचोरीRainपाऊसPoliceपोलिस