शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

टीआरएसच्या उत्साहावर एक्झिट पोलमुळे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 5:09 AM

मोदींबाबतचे आडाखे चुकल्याची भावना

हैदराबाद : लोकसभा निवडणुकांच्या निकालांत भाजपला सर्वाधिक जागा मिळणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुन्हा सत्तेवर येणार असा निष्कर्ष बहुतांश एक्झिट पोलमधून व्यक्त झाल्याने, तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) छावणीत निराशा पसरली आहे. निकालानंतर अधांतरी लोकसभा अस्तित्वात आल्यास सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी पूर्वतयारी करत असलेल्या या पक्षाच्या उत्साहावरच पाणी पडले आहे.

टीआरएसच्या ज्येष्ठ नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, लोकसभा निवडणुकांत यूपीए किंवा एनडीए यापैकी कोणालाच बहुमत मिळणार नाही, असे आम्हाला वाटत होते. मात्र, एक्झिट पोलचे निष्कर्ष पाहाता, आमचा विचार चुकीचा ठरेल, असे दिसत आहे. भाजपप्रणित एनडीए पुन्हा केंद्रात सत्तेत आल्यास तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांचे काँग्रेस व भाजपला वगळून प्रादेशिक पक्षांची आघाडी स्थापन करण्याचे स्वप्न विरून जाईल, असे दिसते.

तेलंगणामध्ये लोकसभेच्या१७ जागा आहेत. निवडणूक निकालानंतर टीआरएस राष्ट्रीय राजकारणात मोलाची भूमिका बजावणार, असे दावे केले जात होते. प्रादेशिक पक्षांची आघाडी स्थापन करण्याची कल्पना केसीआर यांनी गेल्या वर्षी मांडली होती. त्यासाठी त्यांनी ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, एम. के. स्टॅलिन, नवीन पटनायक, एच. डी. देवेगौडा आदी नेत्यांची भेट घेतली होती, पण त्या प्रयत्नांनाअर्थच राहणार नाही, असे दिसतआहे. (वृत्तसंस्था)स्थिती पाहूनच निर्णयटीआरएसच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या नाहीत, तर तो पक्ष सरकार स्थापनेचा दावाही करू शकणार नाही. एनडीए व यूपीए यापैकी कोणीही सरकार स्थापनेसाठी टीआरएसशी संपर्क साधला, तर त्या वेळची स्थिती पाहूनच निर्णय घेण्यात येईल.