नायगावला पाणीपुरवठा करणार्या तलावातील पाणी संपले
By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST
नायगाव बाजार : नायगावला पाणीपुरवठा करणार्या कांडाळा तलावातील पाणी संपल्याने चार दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा बंद असून मानारचे पाणी सोडणे गरजेचे झाले आहे़
नायगावला पाणीपुरवठा करणार्या तलावातील पाणी संपले
नायगाव बाजार : नायगावला पाणीपुरवठा करणार्या कांडाळा तलावातील पाणी संपल्याने चार दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा बंद असून मानारचे पाणी सोडणे गरजेचे झाले आहे़नायगावला पाणीपुरवठा करण्यासाठी काही दशकांपूर्वी एकच पाण्याची टाकी होती़ याद्वारे पूर्ण गावाला दोन वेळेस पाणीपुरवठा होत होता़ ती अपुरी पडू लागल्याने बसस्थानकाजवळ दुसरी टाकी उभारून त्याचा पाणीपुरवठा करण्यात येत होता़ कालांतराने ती देखील कमी पडू लागल्याने तिच्याजवळ तिसरी व दत्तनगरला चौथी पाण्याची टाकी उभारण्यात आली व शहराला पाणीपुरवठा करण्यात येवू लागला़ कालांतराने ती देखील कमी पडू लागल्याने तिच्याजवळ तिसरी व दत्तनगरला चौथी पाण्याची टाकी उभारण्यात आली व शहराला पाणीपुरवठा करण्यात येवू लागला़ या जलकुंभाला कांडाळा येथील तलावातून पाणीपुरवठा करण्यात येतो़ कांडाळा तलावाला पाणलोट क्षेत्र कमी असल्याने व पावसाचे प्रमाण कमी झाल्याने हा तलाव भरला नाही़ दिवाळीच्या आसपास तलावातील पाणी संपल्याने मानारचे पाणी या तलावात सोडण्यात आले होते़ त्यामुळे शहरवासियांची तहान भागत होती़ तलावातील पाणी लवकर संपू नये म्हणून दिवसाआड शहराला पाणीपुरवठा करण्यात येत होता़ तलावातील पाणी संपले, त्यामुळे चार दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा बंद आहे़ त्यातच पाण्याअभावी शहरातील बहुतांश बोअर देखील बंद पडले आहेत़ त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ तेव्हा मानार जलाशयातील पाणी कांडाळा तलावात सोडणे गरजेचे झाले आहे़