शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

'पुलवामा हल्ल्याला अपघात म्हणता, मग राजीव गांधींची हत्याही अपघातच होती का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 12:33 IST

पुलवामा हल्ल्याला अपघात म्हणणाऱ्या दिग्विजय सिंह यांना केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांचा सवाल

नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला अपघात म्हणणाऱ्या काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं. 'राजीव गांधींची हत्या दहशतवाद्यांची केलेली कारवाई होती की तीदेखील अपघात होती? असा प्रश्न मला दिग्विजय सिंह यांना विचारावासा वाटतो,' असं सिंह म्हणाले. राजीव गांधींबद्दल पूर्णपणे आदर बाळगून मी हा प्रश्न विचारत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. पुलवामा हल्ल्याला अपघात म्हटल्यानं आणि एअर स्ट्राइकबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानं भाजपानं दिग्विजय सिंह यांच्यावर टीकेची झोड उठवली. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी सरकारकडे एअर स्टाइकचे पुरावे मागितले. यानंतर आता दिग्विजय यांनीदेखील त्यांचीच री ओढली. 'पुलवामातील दुर्घटनेनंतर आपल्या हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकबद्दल परदेशी प्रसारमाध्यमांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे भारत सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे,' असं दिग्विजय यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.  हवाई दलानं 26 फेब्रुवारीला दहशतवादी तळांवर केलेल्या एअर स्ट्राइक केला. यामध्ये किती दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, याची आकडेवारी हवाई दल आणि सरकारनं दिलेली नाही. मात्र भाजपा नेत्यांनी मृत दहशतवाद्यांचे वेगवेगळे आकडे सांगितले आहेत. यावरुनही दिग्विजय सिंह यांनी मोदींनी लक्ष्य केलं. 'पंतप्रधान मोदीजी, तुमच्या सरकारमधले काही मंत्री म्हणतात 300 दहशतवादी मारले. भाजपा अध्यक्ष 250 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचं सांगतात. तर योगी आदित्यनाथ 400 दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचा दावा करतात. मात्र तुम्ही याबद्दल मौन बाळगलं आहे,' असा टोला दिग्विजय यांनी लगावला. मृत दहशतवाद्यांच्या आकड्यावरुन मोदींवर निशाणा साधणाऱ्या विधानावर व्ही. के. सिंह यांनी सरकारची बाजू स्पष्ट केली. 'बालाकोटवरील एअर स्ट्राइकमध्ये 250 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची आकडेवारी केवळ एकाच ठिकाणी आहे. ती इतरत्र कुठेही नाही. हवाई दलानं त्यांचं लक्ष्य अतिशय काळजीपूर्वक निवडलं होतं. ते लक्ष्य नागरी वस्तीपासून दूर होतं. त्यामुळे या हल्ल्लाची झळ नागरिकांना बसली नाही,' असं सिंग यांनी सांगितलं. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाDigvijaya Singhदिग्विजय सिंहindian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकBJPभाजपाAmit Shahअमित शहाyogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदी