शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हे काही आभाळातून नाही आले, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 04:16 IST

आधुनिक भारताच्या शिल्पकारांच्या नियोजनामुळे भारत आज सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर आरूढ आहे, हे मात्र सोईस्कर विसरतात.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ५५ वर्षांच्या राजवटीवर परखड टीका करणारे स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारत कोठे होता? आधुनिक भारताच्या शिल्पकारांच्या नियोजनामुळे भारत आज सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर आरूढ आहे, हे मात्र सोईस्कर विसरतात. २०२४ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरची होणार असेल, तर पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. मनमोहन सिंग आणि पी.व्ही. नरसिंह राव यांच्या केलेल्या भक्कम पायाभरणीमुळेच. हे काही आभाळातून आले नाही. ब्रिटिशांनी नव्हे तर भारतीयांनी स्वातंत्र्यानंतर यासाठी भक्कम पायाभरणी केली, असे परखड मत व्यक्त करीत माजी राष्टÑपती प्रणव मुखर्जी यांंनी काँग्रेसच्या ५५ वर्षांच्या राजवटीवर आसूड ओढणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब आॅफ इंडियाच्या मालवण सभागृहात गुरुवारी त्यांचे व्याख्यान झाले. अन्य सरकारचेही भारताच्या जडणघडणीत योगदान आहे. काँग्रेसच्या ५५ वर्षांच्या राजवटीवर टीका करणाऱ्यांनी हे जरूर ध्यानात घेतले पाहिजे की, स्वातंत्र्याच्या वेळी भारत कोठे होता आणि आम्ही त्याला कोणत्या उंचीवर नेले.स्वातंत्र्याच्या वेळी अर्थव्यवस्था शून्य होती. आधुनिक भारताच्या शिल्पकारांनी घातलेल्या पायामुळे काँग्रेसच्या राजवटीत भारतीय अर्थव्यवस्था १.८ अब्ज ट्रिलियन डॉलरवर झाली.सार्वजनिक उपदेश सर्व प्रकारचा हिंसाचार, द्वेषापासून मुक्त असावा. सामाजिक आणि राजकीय विपर्यास आणि भरकटलेपणा टाळण्यासाठी राजकारण आणि जनतेपुढील समस्या समजावून घेण्यासाठी प्रामाणिक संवाद करण्याची गरज आहे.भारतीय संविधानामुळे विभिन्न धर्म, पंथ, जाती असताना सर्वांसाठी सामाजिक-आर्थिक समानता मिळाली आहे, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.>काँग्रेसनेच रचला भक्कम पायाभविष्यात ५ ट्रिलियन डॉलरच्या भारतीय अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या भक्कम पाया पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. मनमोहनसिंग आणि नरसिंह राव यांच्यासह आधीच्या सरकारांनी रचला. जवाहरलाल नेहरू आणि इतर धोरणी नेत्यांनी आयआयटी, इस्रो, बँकिंग जाळे आदी स्थापन केल्याने भारताचा विकासाचा वारू चौखूर धावत आहे. डॉ. मनमोहनसिंग आणि नरसिंह राव यांनी रोवलेल्या उदार अर्थव्यवस्थेच्या मुहूर्तमेढेवर भारताचा विकासाचा डोलारा उभारला आहे. याच भक्कम आधारावर विद्यमान वित्तमंत्री केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणात भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरची होईल, असा ठाम दावा करू शकतात, असे प्रणव मुखर्जी म्हणाले.

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जी