शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

हे काही आभाळातून नाही आले, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 04:16 IST

आधुनिक भारताच्या शिल्पकारांच्या नियोजनामुळे भारत आज सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर आरूढ आहे, हे मात्र सोईस्कर विसरतात.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ५५ वर्षांच्या राजवटीवर परखड टीका करणारे स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारत कोठे होता? आधुनिक भारताच्या शिल्पकारांच्या नियोजनामुळे भारत आज सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर आरूढ आहे, हे मात्र सोईस्कर विसरतात. २०२४ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरची होणार असेल, तर पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. मनमोहन सिंग आणि पी.व्ही. नरसिंह राव यांच्या केलेल्या भक्कम पायाभरणीमुळेच. हे काही आभाळातून आले नाही. ब्रिटिशांनी नव्हे तर भारतीयांनी स्वातंत्र्यानंतर यासाठी भक्कम पायाभरणी केली, असे परखड मत व्यक्त करीत माजी राष्टÑपती प्रणव मुखर्जी यांंनी काँग्रेसच्या ५५ वर्षांच्या राजवटीवर आसूड ओढणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब आॅफ इंडियाच्या मालवण सभागृहात गुरुवारी त्यांचे व्याख्यान झाले. अन्य सरकारचेही भारताच्या जडणघडणीत योगदान आहे. काँग्रेसच्या ५५ वर्षांच्या राजवटीवर टीका करणाऱ्यांनी हे जरूर ध्यानात घेतले पाहिजे की, स्वातंत्र्याच्या वेळी भारत कोठे होता आणि आम्ही त्याला कोणत्या उंचीवर नेले.स्वातंत्र्याच्या वेळी अर्थव्यवस्था शून्य होती. आधुनिक भारताच्या शिल्पकारांनी घातलेल्या पायामुळे काँग्रेसच्या राजवटीत भारतीय अर्थव्यवस्था १.८ अब्ज ट्रिलियन डॉलरवर झाली.सार्वजनिक उपदेश सर्व प्रकारचा हिंसाचार, द्वेषापासून मुक्त असावा. सामाजिक आणि राजकीय विपर्यास आणि भरकटलेपणा टाळण्यासाठी राजकारण आणि जनतेपुढील समस्या समजावून घेण्यासाठी प्रामाणिक संवाद करण्याची गरज आहे.भारतीय संविधानामुळे विभिन्न धर्म, पंथ, जाती असताना सर्वांसाठी सामाजिक-आर्थिक समानता मिळाली आहे, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.>काँग्रेसनेच रचला भक्कम पायाभविष्यात ५ ट्रिलियन डॉलरच्या भारतीय अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या भक्कम पाया पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. मनमोहनसिंग आणि नरसिंह राव यांच्यासह आधीच्या सरकारांनी रचला. जवाहरलाल नेहरू आणि इतर धोरणी नेत्यांनी आयआयटी, इस्रो, बँकिंग जाळे आदी स्थापन केल्याने भारताचा विकासाचा वारू चौखूर धावत आहे. डॉ. मनमोहनसिंग आणि नरसिंह राव यांनी रोवलेल्या उदार अर्थव्यवस्थेच्या मुहूर्तमेढेवर भारताचा विकासाचा डोलारा उभारला आहे. याच भक्कम आधारावर विद्यमान वित्तमंत्री केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणात भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरची होईल, असा ठाम दावा करू शकतात, असे प्रणव मुखर्जी म्हणाले.

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जी