शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
2
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
3
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
4
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
5
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
6
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
7
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
8
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
9
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
10
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
11
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
12
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
13
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
14
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
15
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
16
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
17
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
18
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
19
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
20
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!

ज्या व्यक्तीवरून गलवान खोऱ्याचे पडले नाव, त्याच्या वारसांनी भारत-चीन वादावर दिली अशी प्रतिक्रिया... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 16:36 IST

१५-१६ जूनच्या रात्री झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने आलेले आहेत, अशा तणावाच्या परिस्थितीत या गलवान खोऱ्याला ज्या गुलाम रसूल गलवानच्या नावाने ओळखले जाते त्याच्या वारसांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून गलवान खोऱ्यात खूप काही घटना घडत आहेतया भागाशी आमचा गेल्या दोनशे वर्षांपासूनच संबंध आहे. युद्ध हा या वादावरील पर्याय असू शकत नाही तर हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवला जावालडाखमधील गलवान खोरे आणि गलवान नदी भारतासाठी सामरिकदृष्ट्या खूप महत्वाची आहे

 लेह (लडाख) -  लडाखमधील गलवान खोऱ्यात सध्या भारत आणि चीनच्या सैन्यदलांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. १५-१६ जूनच्या रात्री झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने आलेले आहेत, अशा तणावाच्या परिस्थितीत या गलवान खोऱ्याला ज्या गुलाम रसूल गलवानच्या नावाने ओळखले जाते त्याच्या वारसांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

"गेल्या काही दिवसांपासून गलवान खोऱ्यात खूप काही घटना घडत आहेत. या भागाशी आमचा गेल्या दोनशे वर्षांपासूनच संबंध आहे. युद्ध हा या वादावरील पर्याय असू शकत नाही तर हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवला जावा," असे गुलाम रसूल गलवान याचे वारस अमिन गलवान यांनी सांगितले.

लडाखमधील गलवान खोरे आणि गलवान नदी भारतासाठी सामरिकदृष्ट्या खूप महत्वाची आहे. याच ठिकाणी 1962, 1975 आणि सोमवारी चीनसोबत संघर्ष झाला होता. गलवान खोऱ्याचा इतिहास 121 वर्षे जुना आहे. या खोऱ्याचे नावही भारतीय नागरिकावरून पडलेले आहे. लडाखमधील गुराखी गुलाम रसूल गलवान याने ही घाटी शोधली होती. गुलमाने त्याच्या पुस्तकातील "द फाइट ऑफ चाइनीज" या अध्यायामध्ये याबाबत सांगितले आहे.गुलामचा जन्म 1878 मध्ये झाला होता. वयाच्या 14 व्या वर्षी त्याने घर सोडले होते. त्याच्या डोक्यात केवळ नवीन जागा शोधण्याचे विचार घोळत असायचे. याच त्याच्या छंदाने त्याला इंग्रजांचा आवडता गाईड बनविले. खरे पाहता लडाखचा भाग इंग्रजांना आवडत नव्हता.

1899 मध्ये गुलामने लेहहून ट्रेकिंग सुरु केली. आणि लडाखच्या आसपासच्या अनेक नवीन भागांमध्ये पोहोचला. यामध्ये एक होती गलवान खोरे आणि नदी. ही एक ऐतिहासिक घटनाच मानावी लागेल कारण या नदीचे आणि खोऱ्याचे नाव एका गुराख्यावरून ठेवण्यात आले. गुलामने गलवान नावामागे त्याच्या आईने ऐकवलेली कहानी सांगितली आहे. तेव्हा काश्मीरच्या खोऱ्यामध्ये हिंदू महाराजांचे राज्य होते. त्याच्या वडिलांचे नाव कर्रा गलवान होते. कर्रा म्हणजे काळा आणि गलवान म्हणजे डाकू, दरोडेखोर. कर्रा त्याच्या टोळक्याचा म्होरक्या होता. तो फक्त श्रीमंतांना लुटत होता आणि मिळालेला पैसा गरीबांमध्ये वाटत होता.

काही काळानंतर गुलामच्या वडिलांना म्हणजेच कर्राला डोगरा राजाच्या शिपायांनी पकडले आणि मृत्यूदंड दिला. यानंतर गलवान टोळीचे लोक लेह आणि बाल्टिस्तानमध्ये स्थलांतरित झाले. तर काही गलवान हे चीनच्या शिंजियांग प्रांताच्या यारकन्दमध्ये स्थायिक झाले. फॉरसिकिंग पॅराडाईज पुस्तकानुसार गुलाम रसूल 15 महिन्यांमध्ये आशिया आणि तिबेटची कठीण यात्रा केली होती. लेहच्या चंस्पा योरतुंग रोडवर गुलाम रसूलच्या पूर्वजांचे घर आहे. त्यांच्या नावे गलवान गेस्ट हाऊसही आहे. आता त्यांची चौथी पीढी तिथे राहत आहे. त्यांचे वारसदार येणाऱ्या पाहुण्यांना रसूलचे किस्से सांगतात.

टॅग्स :ladakhलडाखIndiaभारतchinaचीन