शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

नक्षलवादावर अखेरचा वार, केंद्राने आखली रणनिती; 4000 CRPF जवान निघाले निर्णायक लढाईला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 21:05 IST

War against naxalite : काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील नक्षलवादाचा नायनाट करण्याची घोषणा केली आहे.

War against naxalite : येत्या दोन वर्षात देशातून नक्षलवाद्यांचा समूळ नायनाट केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 15 दिवसांपूर्वी केली होती. या दिशेने केंद्रानेही आपली पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) हजारो सैनिक छत्तीसगडला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. नक्षलवाद्यांचा खात्मा करणे, हे एकच ध्येय त्यांचे असेल.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या महिन्यात छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये नक्षलवाद्यांना अंतिम मुदत जाहीर करताना, देशाला डाव्या विचारसरणीपासून मुक्त करण्यासाठी 'मजबूत आणि निर्दयी' कृती आवश्यक असल्याचे म्हटले होते. त्यानुसार, छत्तीसगडमधील सर्वाधिक नक्षल-हिंसाग्रस्त भाग असलेल्या बस्तरमध्ये सीआरपीएफ 4,000 हून अधिक जवानांसह चार बटालियन तैनात करणार आहे. मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद्यांना संपवण्याच्या केंद्र सरकारच्या घोषणेनंतर आता अखेरचा निर्णायक लढा सुरू झाला आहे. 

अधिकृत सूत्रांनी सांगितले की, केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) झारखंडमधून तीन आणि बिहारमधून एक बटालियन परत बोलावली आहे. राज्याची राजधानी रायपूरच्या दक्षिणेस सुमारे 450 ते 500 किलोमीटर अंतरावर असलेल्या बस्तर भागात या तुकड्या तैनात केल्या जातील. या दोन राज्यांमध्ये (झारखंड आणि बिहार) नक्षलवादी कारवाया बंद किंवा नगण्य झाल्या आहेत. त्यामुळे या बटालियनचा छत्तीसगडमध्ये अधिक चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. विशेष म्हणजे, सीआरपीएफच्या एका बटालियनमध्ये सुमारे एक हजार जवान आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील दंतेवाडा आणि सुकमा या दुर्गम जिल्ह्यांमध्ये, तसेच ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याच्या त्रि-सीमेवरील दुर्गम ठिकाणी या तुकड्या तैनात केल्या जात आहेत. सीआरपीएफच्या कोब्रा युनिट्ससह या बटालियन जिल्ह्यांच्या दुर्गम भागात अधिक फॉरवर्ड ऑपरेटिंग बेस (एफओबी) स्थापन करतील, जेणेकरून क्षेत्र सुरक्षित केल्यानंतर विकास कार्य सुरू करता येईल. या नवीन युनिट्सना चिलखती वाहने, UAVs (मानवरहित हवाई वाहने), श्वानपथक, दळणवळण संच आणि रेशन पुरवठ्याद्वारे रसद सहाय्य प्रदान केले जात आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीAmit Shahअमित शाहCentral Governmentकेंद्र सरकारChhattisgarhछत्तीसगड