शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

तीव्र विरोधानंतर वक्फ बाेर्ड विधेयक जेपीसीकडे; विरोधी पक्षांसोबतच सरकारमधील तेलुगू देसमचीही मागणी; जनता दलाने दिला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 06:21 IST

सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून संयुक्त संसदीय समिती स्थापन करणार असल्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले...

नवी दिल्ली : सरकारने गुरुवारी लोकसभेत वक्फ बोर्डांचे संचालन करणाऱ्या कायद्यातील दुरुस्तीशी संबंधित विधेयक मांडले. मात्र, विरोधी सदस्यांनी या विधेयकाला कडाडून विरोध करत हा राज्यघटना, संघराज्य आणि अल्पसंख्याकांवर हल्ला असल्याचे म्हटले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे दोन प्रमुख घटक पक्ष असलेल्या जनता दल (युनायटेड) आणि तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. तथापि, टीडीपीने ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याची मागणी केली. त्यानंतर हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठवण्याची शिफारस करण्याचा निर्णय सरकारने घेतला.

सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून संयुक्त संसदीय समिती स्थापन करणार असल्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले. त्यापूर्वी केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी ‘वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२४’ सभागृहात सादर केले. विरोधानंतर ते म्हणाले, विधेयकावर चर्चा करण्यासाठी शक्य तितक्या भागधारकांना निमंत्रित करा, त्यांची मते ऐका. ते समितीकडे पाठवा. भविष्यात आम्ही त्यांच्या (सदस्यांच्या) सूचना मोकळ्या मनाने ऐकू.

अप्रभावी वक्फ कायदा रद्द करण्याचे विधेयक मंजूर- आधुनिक भारतात वक्फ मालमत्तेचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी, कालबाह्य आणि प्रभावहीन झालेला मुस्लीम वक्फ कायदा, १९२३ रद्द करण्याचे विधेयक गुरुवारी लोकसभेत सादर करण्यात आले. - मुस्लीम वक्फ दुरुस्ती विधेयक जेपीसीकडे पाठवण्याची शिफारस पाहता विरोधी सदस्यांनी हे विधेयक मांडण्यावर प्रश्न उपस्थित केले. - यावर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी संसदीय कामकाजाशी संबंधित नियम ६७ चा हवाला देत सांगितले की, या नियमानुसार दोन समान विधेयकांपैकी एक मागे घेता येईल. त्यानंतर सभागृहाने आवाजी मतदानाने ते मंजूर केले.

सरकारच्या म्हणण्यानुसार विधेयकात काय?रिजिजू म्हणाले की, हे विधेयक कोणत्याही धार्मिक स्वातंत्र्यात हस्तक्षेप करत नाही आणि घटनेच्या कोणत्याही कलमाचे उल्लंघन करत नाही.वक्फ दुरुस्ती पहिल्यांदाच सभागृहात मांडण्यात आलेली नाही. स्वातंत्र्यानंतर हे विधेयक पहिल्यांदा १९५४ मध्ये मांडण्यात आले. यानंतर अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या.हे दुरुस्ती विधेयक व्यापक चर्चेनंतर आणले आहे, ज्याचा फायदा मुस्लीम महिला आणि मुलांच्या कल्याणासाठी होईल.काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात स्थापन करण्यात आलेल्या सच्चर समिती आणि संयुक्त संसदीय समितीच्या शिफारशींवरच हे विधेयक आधारित आहे. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाParliamentसंसद