शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीची भेट घेताय?; मग 'या' तीन गोष्टींची काळजी नक्की घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 16:41 IST

कोरोनावर मात केलेल्या व्यक्तीला कमीत कमी ३ दिवसांपासून ताप येत तर नाही ना याची विचारपूस करा.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशामध्ये गुरुवारी एकाच दिवसात कोरोनाचे ३२ हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळून आले असून, इतकी विक्रमी वाढ प्रथमच झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ९ लाख ६८ हजारपेक्षा जास्त झाली आहे. तसेच गुरुवारी २० हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोना संसर्गातून पूर्ण बरे झाले आहेत, अशा रुग्णांचे प्रमाण ६३.२४ टक्के झाले असून तेदेखील आजवरचे सर्वांत जास्त प्रमाण आहे.

कोरोनामुळे गुरुवारी आणखी ६०६ लोक मरण पावले असून, त्यामुळे एकूण बळींची संख्या २४, ९१५ झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. राष्ट्रीय स्तरावर एकाच दिवसात कोरोनाचे ३२,६९५ नवे रुग्ण आढळले आहेत.  देशभरात कोरोनाच्या आजारातून ६,१२,८१४ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, सध्या ३,३१,१४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

देशात दिवसेंदिवस अनेक लोक कोरोनावर मात करत आहेत. कोरोनावर यशस्वी झालेल्या रुग्णांचे ठिकठिकाणी टाळ्या, पुष्पगुष्छ देऊन स्वागत घरी, सोसायटी याठिकाणी स्वागत केले जात आहे. मात्र कोरोनावर मात केल्यानंतरही रुग्णाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिवेंशननूसार, जर तुमचा एखादा नातेवाईक किंवा मित्राने कोरोनावर मात केली असेल. त्यानंतर तुम्हाला त्या संबंधित व्यक्तीला भेटायचे असेल तर पुढील तीन गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे.

कोरोनावर मात केलेल्या व्यक्तीला कमीत कमी ३ दिवसांपासून ताप येत तर नाही ना याची विचारपूस करा. तसेच दूसरी गोष्ट म्हणजे संबंधित व्यक्तीला खोकला आणि श्वासोच्छवासाचा त्रास आता होत नाही ना, याची खातरजमा करा. त्याचप्रमाणे रुग्णालयातून घरी परतल्यानंतर संबंधित व्यक्ती १० दिवस होम क्वारंटाईन राहिल्यानंतरच त्या व्यक्तीची भेट घ्या, या सर्व अटींचे पालन केल्यानंतर कोणतीच समस्या उद्भवणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यIndiaभारत