शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 09:46 IST

Simhachalam Temple Incident: श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची लांबच लांब रांग लागलेली होती. त्याचवेळी भाविकांवर नव्यानेच बांधकाम करण्यात आलेली भिंत कोसळली. रात्री अडीच वाजता ही घटना घडली. 

Simhachalam Temple Latest News Today: आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध मंदिरात दुर्दैवी घटना घडली. चंदनोत्सवानिमित्ताने देवाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांच्या अंगावर भिंत कोसळली. रात्री अडीच वाजता ही घटना घडली. यात ८ भाविकांचा मृत्यू झाला. तर अनेक भाविक जखमी झाले आहेत. श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर या आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध मंदिराच्या परिसरात ही घटना घडली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

विशाखापट्टणम येथील श्री वराह लक्ष्मी नरसिंह मंदिरामध्ये दरवर्षी चंदनोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे भगवान नरसिंहाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक याठिकाणी येतात. यावर्षीही भाविक मोठ्या संख्येने आले आहेत. हे मंदिर सिंहाचलम मंदिर म्हणूनही ओळखले जाते. 

नव्यानेच बांधलेली भिंत कोसळली

 चंदनोत्सवामुळे मंदिराबाहेर भाविकांची लांब रांग लागलेली होती. मंदिर परिसरात असलेल्या एका दुकानाची नव्यानेच बांधलेली भिंत भाविकांची रांग असलेल्या बाजूला कोसळली. यात आठ भाविकांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना घडण्याच्या काही वेळापूर्वी मुसळधार पाऊस झाला होता.

 वाचा >>MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत 

पावसाचे पाणी भिंतीमध्ये मुरले आणि त्यामुळे भिंत ढिसूळ होऊन कोसळली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. रात्री अडीच ते ३ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. जिल्हाधिकारी हरेंद्र प्रसाद यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळाल्यानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या बोलवण्यात आल्या. वेगाने मदत कार्य सुरु करण्यात आले. 

गृहमंत्री घटनास्थळी पोहोचले

दुर्घटनेबद्दल कळल्यानंतर आंध्र प्रदेशचे गृहमंत्री वंगलापुडी अनिता यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेची माहिती घेऊन अधिकाऱ्यांना मदतकार्यासंदर्भात सूचना दिल्या. 

मुसळधार पावसामुळे आणि भाविकांचा भार पडल्यामुळे ही घटना घडली असावी, असे त्यांनी सांगितले. भाविका ३०० रुपयांच्या विशेष दर्शन पाससह रांगेत उभे होते. पावसांचे पाणी मुरल्यामुळे भिंत कमकुवत झाली होती. त्यामुळे ती कोसळली, अशी माहिती त्यांनी दिली. 

चंदनोत्सवाचे महत्त्व काय?

नरसिंह मंदिरात दरवर्षी चंदनोत्सव होतो. अशी पौराणिक कथा आहे की, या काळात श्री वराह लक्ष्मी नरसिंह जागृत अवस्थेत असतात आणि भक्तांना दर्शन देतात. त्यामुळे इथे या काळाच जास्त गर्दी असते. 

टॅग्स :AccidentअपघातTempleमंदिरReligious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रमPoliceपोलिस