शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 09:46 IST

Simhachalam Temple Incident: श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची लांबच लांब रांग लागलेली होती. त्याचवेळी भाविकांवर नव्यानेच बांधकाम करण्यात आलेली भिंत कोसळली. रात्री अडीच वाजता ही घटना घडली. 

Simhachalam Temple Latest News Today: आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध मंदिरात दुर्दैवी घटना घडली. चंदनोत्सवानिमित्ताने देवाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांच्या अंगावर भिंत कोसळली. रात्री अडीच वाजता ही घटना घडली. यात ८ भाविकांचा मृत्यू झाला. तर अनेक भाविक जखमी झाले आहेत. श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर या आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध मंदिराच्या परिसरात ही घटना घडली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

विशाखापट्टणम येथील श्री वराह लक्ष्मी नरसिंह मंदिरामध्ये दरवर्षी चंदनोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे भगवान नरसिंहाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक याठिकाणी येतात. यावर्षीही भाविक मोठ्या संख्येने आले आहेत. हे मंदिर सिंहाचलम मंदिर म्हणूनही ओळखले जाते. 

नव्यानेच बांधलेली भिंत कोसळली

 चंदनोत्सवामुळे मंदिराबाहेर भाविकांची लांब रांग लागलेली होती. मंदिर परिसरात असलेल्या एका दुकानाची नव्यानेच बांधलेली भिंत भाविकांची रांग असलेल्या बाजूला कोसळली. यात आठ भाविकांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना घडण्याच्या काही वेळापूर्वी मुसळधार पाऊस झाला होता.

 वाचा >>MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत 

पावसाचे पाणी भिंतीमध्ये मुरले आणि त्यामुळे भिंत ढिसूळ होऊन कोसळली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. रात्री अडीच ते ३ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. जिल्हाधिकारी हरेंद्र प्रसाद यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळाल्यानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या बोलवण्यात आल्या. वेगाने मदत कार्य सुरु करण्यात आले. 

गृहमंत्री घटनास्थळी पोहोचले

दुर्घटनेबद्दल कळल्यानंतर आंध्र प्रदेशचे गृहमंत्री वंगलापुडी अनिता यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेची माहिती घेऊन अधिकाऱ्यांना मदतकार्यासंदर्भात सूचना दिल्या. 

मुसळधार पावसामुळे आणि भाविकांचा भार पडल्यामुळे ही घटना घडली असावी, असे त्यांनी सांगितले. भाविका ३०० रुपयांच्या विशेष दर्शन पाससह रांगेत उभे होते. पावसांचे पाणी मुरल्यामुळे भिंत कमकुवत झाली होती. त्यामुळे ती कोसळली, अशी माहिती त्यांनी दिली. 

चंदनोत्सवाचे महत्त्व काय?

नरसिंह मंदिरात दरवर्षी चंदनोत्सव होतो. अशी पौराणिक कथा आहे की, या काळात श्री वराह लक्ष्मी नरसिंह जागृत अवस्थेत असतात आणि भक्तांना दर्शन देतात. त्यामुळे इथे या काळाच जास्त गर्दी असते. 

टॅग्स :AccidentअपघातTempleमंदिरReligious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रमPoliceपोलिस