शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 09:46 IST

Simhachalam Temple Incident: श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची लांबच लांब रांग लागलेली होती. त्याचवेळी भाविकांवर नव्यानेच बांधकाम करण्यात आलेली भिंत कोसळली. रात्री अडीच वाजता ही घटना घडली. 

Simhachalam Temple Latest News Today: आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध मंदिरात दुर्दैवी घटना घडली. चंदनोत्सवानिमित्ताने देवाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांच्या अंगावर भिंत कोसळली. रात्री अडीच वाजता ही घटना घडली. यात ८ भाविकांचा मृत्यू झाला. तर अनेक भाविक जखमी झाले आहेत. श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर या आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध मंदिराच्या परिसरात ही घटना घडली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

विशाखापट्टणम येथील श्री वराह लक्ष्मी नरसिंह मंदिरामध्ये दरवर्षी चंदनोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे भगवान नरसिंहाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक याठिकाणी येतात. यावर्षीही भाविक मोठ्या संख्येने आले आहेत. हे मंदिर सिंहाचलम मंदिर म्हणूनही ओळखले जाते. 

नव्यानेच बांधलेली भिंत कोसळली

 चंदनोत्सवामुळे मंदिराबाहेर भाविकांची लांब रांग लागलेली होती. मंदिर परिसरात असलेल्या एका दुकानाची नव्यानेच बांधलेली भिंत भाविकांची रांग असलेल्या बाजूला कोसळली. यात आठ भाविकांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना घडण्याच्या काही वेळापूर्वी मुसळधार पाऊस झाला होता.

 वाचा >>MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत 

पावसाचे पाणी भिंतीमध्ये मुरले आणि त्यामुळे भिंत ढिसूळ होऊन कोसळली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. रात्री अडीच ते ३ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. जिल्हाधिकारी हरेंद्र प्रसाद यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळाल्यानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या बोलवण्यात आल्या. वेगाने मदत कार्य सुरु करण्यात आले. 

गृहमंत्री घटनास्थळी पोहोचले

दुर्घटनेबद्दल कळल्यानंतर आंध्र प्रदेशचे गृहमंत्री वंगलापुडी अनिता यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेची माहिती घेऊन अधिकाऱ्यांना मदतकार्यासंदर्भात सूचना दिल्या. 

मुसळधार पावसामुळे आणि भाविकांचा भार पडल्यामुळे ही घटना घडली असावी, असे त्यांनी सांगितले. भाविका ३०० रुपयांच्या विशेष दर्शन पाससह रांगेत उभे होते. पावसांचे पाणी मुरल्यामुळे भिंत कमकुवत झाली होती. त्यामुळे ती कोसळली, अशी माहिती त्यांनी दिली. 

चंदनोत्सवाचे महत्त्व काय?

नरसिंह मंदिरात दरवर्षी चंदनोत्सव होतो. अशी पौराणिक कथा आहे की, या काळात श्री वराह लक्ष्मी नरसिंह जागृत अवस्थेत असतात आणि भक्तांना दर्शन देतात. त्यामुळे इथे या काळाच जास्त गर्दी असते. 

टॅग्स :AccidentअपघातTempleमंदिरReligious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रमPoliceपोलिस