शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

कडक सॅल्यूट! शहीद दिनानिमित्त 6 तासांचा 42 किमी पायी प्रवास करत 42 वेळा केलं 'रक्तदान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 12:12 IST

Blood Donation : रक्तदान करण्यासाठी एका व्यक्तीने तब्बल 42 किमी अंतर पायी प्रवास केला आहे. विनोद जाखड असं या व्यक्तीचं नाव आहे.

नवी दिल्ली - शहीद दिनानिमित्त देशातील काही ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान रक्तदान करण्यासाठी एका व्यक्तीने तब्बल 42 किमी अंतर पायी प्रवास केला आहे. विनोद जाखड असं या व्यक्तीचं नाव आहे. त्यांनी त्यांच्या गावापासून 42 किमी अंतरावर असलेल्या रक्तदान शिबिराला जाऊन पुन्हा एकदा रक्तदान केलं आहे. यासाठी त्यांनी सहा तास सलग पायी प्रवास केल्याची माहिती मिळत आहे. 'रक्तदान करणारी व्यक्ती' अशी विनोदची नवीन ओळख निर्माण झाली असून त्यांनी आतापर्यंत 42 वेळा रक्तदान केलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद जाखड़ हे 39 वर्षांचे आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 42 वेळा रक्तदान केलं आहे. आज शहीद दिनानिमित्त त्यांनी लोकांना रक्तदानाबद्दल जागरूक करण्यासाठी एक पदयात्रा काढली होती. त्याच निमित्ताने ते रक्तदान करण्यासाठी सलग सहा तास 42 किलोमीटर पायी प्रवास केला आहे. याच दरम्यान गावकऱ्यांच्या वतीने अनेक ठिकाणी फुलांचा माळा घालून विनोद यांचं यासाठी स्वागत करण्यात आलं. ग्रामीण भागातील लोकांमध्ये त्यांनी रक्तदानासाठी जागरूकता निर्माण केली असून रक्तदान करण्याचं आवाहन देखील केलं आहे. 

काही ठिकाणी रक्तदानाबाबत अफवा आणि गैरसमज आहेत. त्यामुळेच अनेक जण रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. मात्र असं काहीही नसल्याचं विनोद यांनी म्हटलं आहे. संकटाच्या काळात एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज असल्यास त्याला यामुळे मदत मिळू शकते. अनेकदा वेळीच रक्त न मिळाल्याने काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे रक्तदान करून लोकांचा जीव वाचवा, त्यांना मदत करा असं विनोद यांनी म्हटलं आहे. 101 वेळा रक्तदान करण्याची विनोद जाखड यांची इच्छा आहे. 

101 वेळा रक्तदान करण्याचा संकल्प

वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रातून रक्तदान करण्याची प्रेरणा मिळाल्याची माहिती विनोद यांनी दिली आहे. 101 वेळा रक्तदान करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी ते स्वत: तर रक्तदान करतातच पण इतरांनाही रक्तदान करण्यासाठी प्रेरित करतात. रक्तदान केल्यानं आपण फक्त आजारी व्यक्तीचा जीव वाचवू शकतो. तसेच स्वतःच्या शरीरासाठी देखील खूप आवश्यक आहे. म्हणूनच लोकांनी रक्तदानाबाबत कोणत्याही प्रकारचा गैरसमज बाळगू नये असं विनोद यांनी म्हटलं आहे. विनोद यांचं सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीIndiaभारत