शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

कडक सॅल्यूट! शहीद दिनानिमित्त 6 तासांचा 42 किमी पायी प्रवास करत 42 वेळा केलं 'रक्तदान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 12:12 IST

Blood Donation : रक्तदान करण्यासाठी एका व्यक्तीने तब्बल 42 किमी अंतर पायी प्रवास केला आहे. विनोद जाखड असं या व्यक्तीचं नाव आहे.

नवी दिल्ली - शहीद दिनानिमित्त देशातील काही ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान रक्तदान करण्यासाठी एका व्यक्तीने तब्बल 42 किमी अंतर पायी प्रवास केला आहे. विनोद जाखड असं या व्यक्तीचं नाव आहे. त्यांनी त्यांच्या गावापासून 42 किमी अंतरावर असलेल्या रक्तदान शिबिराला जाऊन पुन्हा एकदा रक्तदान केलं आहे. यासाठी त्यांनी सहा तास सलग पायी प्रवास केल्याची माहिती मिळत आहे. 'रक्तदान करणारी व्यक्ती' अशी विनोदची नवीन ओळख निर्माण झाली असून त्यांनी आतापर्यंत 42 वेळा रक्तदान केलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद जाखड़ हे 39 वर्षांचे आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 42 वेळा रक्तदान केलं आहे. आज शहीद दिनानिमित्त त्यांनी लोकांना रक्तदानाबद्दल जागरूक करण्यासाठी एक पदयात्रा काढली होती. त्याच निमित्ताने ते रक्तदान करण्यासाठी सलग सहा तास 42 किलोमीटर पायी प्रवास केला आहे. याच दरम्यान गावकऱ्यांच्या वतीने अनेक ठिकाणी फुलांचा माळा घालून विनोद यांचं यासाठी स्वागत करण्यात आलं. ग्रामीण भागातील लोकांमध्ये त्यांनी रक्तदानासाठी जागरूकता निर्माण केली असून रक्तदान करण्याचं आवाहन देखील केलं आहे. 

काही ठिकाणी रक्तदानाबाबत अफवा आणि गैरसमज आहेत. त्यामुळेच अनेक जण रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. मात्र असं काहीही नसल्याचं विनोद यांनी म्हटलं आहे. संकटाच्या काळात एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज असल्यास त्याला यामुळे मदत मिळू शकते. अनेकदा वेळीच रक्त न मिळाल्याने काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे रक्तदान करून लोकांचा जीव वाचवा, त्यांना मदत करा असं विनोद यांनी म्हटलं आहे. 101 वेळा रक्तदान करण्याची विनोद जाखड यांची इच्छा आहे. 

101 वेळा रक्तदान करण्याचा संकल्प

वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रातून रक्तदान करण्याची प्रेरणा मिळाल्याची माहिती विनोद यांनी दिली आहे. 101 वेळा रक्तदान करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी ते स्वत: तर रक्तदान करतातच पण इतरांनाही रक्तदान करण्यासाठी प्रेरित करतात. रक्तदान केल्यानं आपण फक्त आजारी व्यक्तीचा जीव वाचवू शकतो. तसेच स्वतःच्या शरीरासाठी देखील खूप आवश्यक आहे. म्हणूनच लोकांनी रक्तदानाबाबत कोणत्याही प्रकारचा गैरसमज बाळगू नये असं विनोद यांनी म्हटलं आहे. विनोद यांचं सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीIndiaभारत