शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

कडक सॅल्यूट! शहीद दिनानिमित्त 6 तासांचा 42 किमी पायी प्रवास करत 42 वेळा केलं 'रक्तदान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 12:12 IST

Blood Donation : रक्तदान करण्यासाठी एका व्यक्तीने तब्बल 42 किमी अंतर पायी प्रवास केला आहे. विनोद जाखड असं या व्यक्तीचं नाव आहे.

नवी दिल्ली - शहीद दिनानिमित्त देशातील काही ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान रक्तदान करण्यासाठी एका व्यक्तीने तब्बल 42 किमी अंतर पायी प्रवास केला आहे. विनोद जाखड असं या व्यक्तीचं नाव आहे. त्यांनी त्यांच्या गावापासून 42 किमी अंतरावर असलेल्या रक्तदान शिबिराला जाऊन पुन्हा एकदा रक्तदान केलं आहे. यासाठी त्यांनी सहा तास सलग पायी प्रवास केल्याची माहिती मिळत आहे. 'रक्तदान करणारी व्यक्ती' अशी विनोदची नवीन ओळख निर्माण झाली असून त्यांनी आतापर्यंत 42 वेळा रक्तदान केलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद जाखड़ हे 39 वर्षांचे आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 42 वेळा रक्तदान केलं आहे. आज शहीद दिनानिमित्त त्यांनी लोकांना रक्तदानाबद्दल जागरूक करण्यासाठी एक पदयात्रा काढली होती. त्याच निमित्ताने ते रक्तदान करण्यासाठी सलग सहा तास 42 किलोमीटर पायी प्रवास केला आहे. याच दरम्यान गावकऱ्यांच्या वतीने अनेक ठिकाणी फुलांचा माळा घालून विनोद यांचं यासाठी स्वागत करण्यात आलं. ग्रामीण भागातील लोकांमध्ये त्यांनी रक्तदानासाठी जागरूकता निर्माण केली असून रक्तदान करण्याचं आवाहन देखील केलं आहे. 

काही ठिकाणी रक्तदानाबाबत अफवा आणि गैरसमज आहेत. त्यामुळेच अनेक जण रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. मात्र असं काहीही नसल्याचं विनोद यांनी म्हटलं आहे. संकटाच्या काळात एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज असल्यास त्याला यामुळे मदत मिळू शकते. अनेकदा वेळीच रक्त न मिळाल्याने काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे रक्तदान करून लोकांचा जीव वाचवा, त्यांना मदत करा असं विनोद यांनी म्हटलं आहे. 101 वेळा रक्तदान करण्याची विनोद जाखड यांची इच्छा आहे. 

101 वेळा रक्तदान करण्याचा संकल्प

वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रातून रक्तदान करण्याची प्रेरणा मिळाल्याची माहिती विनोद यांनी दिली आहे. 101 वेळा रक्तदान करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी ते स्वत: तर रक्तदान करतातच पण इतरांनाही रक्तदान करण्यासाठी प्रेरित करतात. रक्तदान केल्यानं आपण फक्त आजारी व्यक्तीचा जीव वाचवू शकतो. तसेच स्वतःच्या शरीरासाठी देखील खूप आवश्यक आहे. म्हणूनच लोकांनी रक्तदानाबाबत कोणत्याही प्रकारचा गैरसमज बाळगू नये असं विनोद यांनी म्हटलं आहे. विनोद यांचं सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीIndiaभारत